शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इंदू मिलच्या जागेबाबत राजकारण

By admin | Updated: May 19, 2016 00:12 IST

आनंदराज आंबेडकर : शासनाने भूमिका जाहीर करण्याची मागणी

कणकवली : मुंबईतील इंदू मिलच्या जागेबाबत आंबेडकरी जनतेने केलेल्या आंदोलनाला यश आले. परंतु ही जागा राज्य शासनाच्या ताब्यात मिळालेली नाही. या जागेच्या हस्तांतरणाबाबत राजकारण करण्यात येत आहे. असा आरोप करतानाच या जागेच्या प्रश्नाबाबत निर्णय घ्यायला एक तर पंतप्रधान दुबळे आहेत किंवा राज्य शासन जाणीवपूर्वक हस्तांतरणाबाबत दिरंगाई करीत आहे, असे म्हणावे लागेल. त्यामुळे शासनाने याबाबतची आपली भूमिका आंबेडकरी जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली.रिपब्लिकन सेनेच्यावतीने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती, तसेच रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता मेळावा येथील बुद्ध विहाराच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या आनंदराज आंबेडकर यांनी येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे म्हणून आम्ही लढा दिला. त्याला यशही मिळाले. या जागेवर स्मारक उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आले. परंतु ही जागा राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यास वेळ काढण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या खात्यांकडून रोज वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत. त्यामुळे आंबेडकरी जनतेत असंतोष वाढत आहे. त्यासाठी शासनाने आपली नेमकी भूमिका स्पष्ट करायला हवी.रायगड ते सिंधुदुर्ग असा चार दिवसांचा कार्यकर्त्यांच्या भेटीचा कार्यक्रम आपण आखला आहे. मुंबईतून सिंधुदुर्गात येईपर्यंत राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाल्याचे आपल्या निदर्शनास आले. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. त्यामुळे शासनाने या महामार्गाच्या कामाला गती द्यावी.गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्गचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा. तसेच तशा सुविधा शासनाने येथे उपलब्ध करून द्याव्यात. कोकणातील शेतकरी, बागायतदार हवामानातील बदलामुळे हवालदिल झाले आहेत. त्यांना उसाप्रमाणे आर्थिक मदत देऊन शासनाने दिलासा द्यावा. अशा विविध मागण्याही आंबेडकर यांनी यावेळी केल्या. तसेच त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगितले. (वार्ताहर)