शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

इंदू मिलच्या जागेबाबत राजकारण

By admin | Updated: May 19, 2016 00:12 IST

आनंदराज आंबेडकर : शासनाने भूमिका जाहीर करण्याची मागणी

कणकवली : मुंबईतील इंदू मिलच्या जागेबाबत आंबेडकरी जनतेने केलेल्या आंदोलनाला यश आले. परंतु ही जागा राज्य शासनाच्या ताब्यात मिळालेली नाही. या जागेच्या हस्तांतरणाबाबत राजकारण करण्यात येत आहे. असा आरोप करतानाच या जागेच्या प्रश्नाबाबत निर्णय घ्यायला एक तर पंतप्रधान दुबळे आहेत किंवा राज्य शासन जाणीवपूर्वक हस्तांतरणाबाबत दिरंगाई करीत आहे, असे म्हणावे लागेल. त्यामुळे शासनाने याबाबतची आपली भूमिका आंबेडकरी जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली.रिपब्लिकन सेनेच्यावतीने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती, तसेच रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता मेळावा येथील बुद्ध विहाराच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या आनंदराज आंबेडकर यांनी येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे म्हणून आम्ही लढा दिला. त्याला यशही मिळाले. या जागेवर स्मारक उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आले. परंतु ही जागा राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यास वेळ काढण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या खात्यांकडून रोज वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत. त्यामुळे आंबेडकरी जनतेत असंतोष वाढत आहे. त्यासाठी शासनाने आपली नेमकी भूमिका स्पष्ट करायला हवी.रायगड ते सिंधुदुर्ग असा चार दिवसांचा कार्यकर्त्यांच्या भेटीचा कार्यक्रम आपण आखला आहे. मुंबईतून सिंधुदुर्गात येईपर्यंत राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाल्याचे आपल्या निदर्शनास आले. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. त्यामुळे शासनाने या महामार्गाच्या कामाला गती द्यावी.गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्गचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा. तसेच तशा सुविधा शासनाने येथे उपलब्ध करून द्याव्यात. कोकणातील शेतकरी, बागायतदार हवामानातील बदलामुळे हवालदिल झाले आहेत. त्यांना उसाप्रमाणे आर्थिक मदत देऊन शासनाने दिलासा द्यावा. अशा विविध मागण्याही आंबेडकर यांनी यावेळी केल्या. तसेच त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगितले. (वार्ताहर)