शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांनी ‘नॉलेज’ शेअर करावे

By admin | Updated: July 10, 2014 00:18 IST

प्रमोद जठार : भाजपा युवा मोर्चाच्यावतीने वैभववाडीत गुणवंतांचा गौरव

वैभववाडी : पैशाने ज्ञान मिळविता येत नाही. परंतु ज्ञानाच्या जोरावर भरपूर पैसा मिळविता येतो. त्यामुळे राजकारण्यांनी समाजात पैसा नव्हे तर नॉलेज ‘शेअर’ करण्याची गरज आहे, असे आवाहन करीत विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या पद्धतीने करा आणि स्वत:चा शोध घेऊन ध्येय निश्चित करा, असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी गुणवंतांच्या सत्कार समारंभात केले.भाजपा युवा मोर्चाच्यावतीने येथील तालुका संपर्क कार्यालयात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती मानाजी गुरव, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास सावंत, सरचिटणीस राजेंद्र राणे, युवा मोर्चा अध्यक्ष सुधीर नकाशे, उद्योजक गिरीश साठे, गजानन पाटील, संतोष हरयाण आदी उपस्थित होते. आमदार जठार म्हणाले, माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे अख्खे जग तळहातावर आले आहे आणि ते समजून घेण्याचे भाग्य आताच्या पिढीला लाभले आहे. जे आमच्या नशिबी नव्हते. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा वापर अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याची गरज आहे. याच वयात स्वत:ची क्षमता, कमकुवत बाजू, संधी आणि भीती यांचा शोध घेऊन ध्येय निश्चित केले पाहिजे. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते ती कधीही टळायला देऊ नका. जीवनाची दिशा ठरविण्यासाठी वेळ खूपच कमी लाभतो. त्यामुळे एक क्षणही वाया जावू देऊ नका. जठार पुढे म्हणाले, गरजेपेक्षा अधिक अडवून ठेवण्यापेक्षा आयुष्यात दुसऱ्याला जागा करून देण्याचा प्रयत्न करा. तेच मोठे सत्कर्म असते. आईवडील, पालक आणि गुुरुजनांच्या अपेक्षांचा आदर बाळगून अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न केले पाहिजेत. अपयश हे पुन्हा प्रयत्न करण्याची संधी देत असते. काहीच न करणाऱ्यांचा कधीच जयजयकार होत नसतो. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर अडचण आली तर साद घाला मी तुमच्या सोबत असेन असा विश्वास आमदार जठार यांनी विद्यार्थ्यांना दिला. (प्रतिनिधी)