शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट!
3
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
4
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
5
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
6
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
7
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
8
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
9
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
10
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
11
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
12
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
13
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
14
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
15
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
16
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
17
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
18
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
19
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
20
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल

पोलिसांनी रोखली बैलगाडी शर्यत

By admin | Updated: April 20, 2017 00:06 IST

पोलिसांनी रोखली बैलगाडी शर्यत

वैभववाडी : वैभववाडीनजीक कोकिसरे नारकरवाडी येथे आयोजित केलेली विनाफटका बैलगाडी शर्यत पोलिसांनी अर्ध्यावर बंद पाडली. त्यामुळे प्रेक्षक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची उडाली. गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. साळुंखे यांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला. राजेंद्र नारकर व हिराचंद मुरकर यांना गाडीत कोंबून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्या मागोमाग सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पोलिस निरीक्षकांचे दालन गाठले. त्यामुळे पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी होऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरा नारकर व मुरकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करून तत्काळ सोडले.कोकिसरे नारकरवाडी येथे श्री महालक्ष्मी मित्रमंडळातर्फे विनाफटका बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास या स्पर्धेला सुरुवात झाली. बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी सुमारे साडेतीन ते चार हजार शौकिनांची गर्दी झाली होती. शर्यतीत जिल्ह्यातील १७ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.जवळपास ९ गाड्यांची दौड पार पडल्यानंतर साडेपाचच्या सुमारास साहाय्यक पोलिस निरीक्षक ए. एन. साळुंखे पथकासह शर्यतस्थळी दाखल झाले. त्यांनी आयोजक कोण? अशी विचारणा करीत राजेंद्र (बाळा) नारकर व हिराचंद (बाबय) मुरकर यांना पोलिसांच्या गाडीत कोंबले. त्यावेळी उपस्थित शौकिनांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यावेळी जयेंद्र रावराणे यांनी पोलिसांच्या गाडीतील दोघा आयोजकांना खाली उतरण्यास सांगून पोलिसांना जाब विचारला.शर्यतस्थळी पोचल्यापासून पोलिसांनी चित्रिकरण सुरू केले होते. त्यामुळे जे जे चित्रिकरणात दिसतील त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा साळुंखे यांनी दिल्यामुळे सारे शांत झाले. त्यानंतर नारकर, मुरकर यांना पुन्हा गाडीत घालून पोलिस ठाण्यात नेले. त्यामुळे बैलगाडी शर्यत बंद पडल्याने उपस्थित हजारो शौकिनांचा हिरमोड झाला. पोलिस गाडीच्या मागोमाग शिवसेनेचे जयेंद्र रावराणे, भाजपचे राजेंद्र राणे, काँग्रेसचे कणकवली उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण, बंड्या मांजरेकर, रवी पाळेकर आदींनी सहाय्यक पोलिस निरीक्षक साळुंखे यांचे दालन गाठले.सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या दालनात असल्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यात आली आहे.