शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

पोलिस कुटुंबियांची पाण्यासाठी धडपड

By admin | Updated: November 4, 2016 00:22 IST

मालवणातील समस्या : पोलिस-मुख्याधिकारी यांच्यात बाचाबाची, तहसीलदारांकडे मांडली कैफियत

 मालवण : पोलिस वसाहतीतील पाण्याची समस्या सोडविण्यात पालिकेचे लक्ष वेधूनही पालिका अपयशी ठरली आहे. याबाबत महिन्याच्या प्रदीर्घ अवधीनंतर पालिका प्रशासनाच्या विरोधात संतप्त बनलेल्या मालवण पोलिस व त्यांंच्या कुटुंबियांनी पुन्हा एकदा मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी पालिकेत धडक दिली. मात्र, आपल्याला निवडणुकीचे काम आहे, असे सांगून त्या तहसील कार्यालय येथे निघून गेल्या. त्यामुळे अधिकच आक्रमक बनलेल्या महिला पोलिस व कुटुंबियांनी पालिकेबाहेर ठिय्या मांडला. त्यांनतर पालिकेकडून ठोस भूमिका न आल्याने पोलिस कुटुंबियांनी तहसीलदार वीरधवल खाडे यांची भेट घेत महिनाभर पाणी नसल्याची कैफियत मांडली. यावेळी तहसीदार यांनी दोन दिवसांत पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तहसील कार्यालयात पोलिसांनी धडक दिल्यानंतर नेहमी शांत असलेल्या मुख्याधिकारी यांनी थेट पोलिसांकडे बोट दाखवत पालिका प्रशासनाची बाजू झटकण्याचा प्रयत्न केला. पोलिस वसाहतीला पालिकेकडून पाणीपुरवठा सुरु आहे. आम्हांला पाणीपुरवठा हे एकच काम नसून निवडणुकीची कामे आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा होत असतानाही पोलिसांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत, असे वादग्रस्त विधान मुख्याधिकारी रंजना गगे यांनी तहसीलदारांसमोर केले. याबाबत पोलिसांनी नाराजी व्यक्त करत पालिकेकडून पुरवठा केले जाणारे पाणी मुख्याधिकारी यांनी पिऊन दाखवावे, असे आव्हान केले. पोलिसांची तहसीलदारांकडे कैफियत पोलिस वसाहतीत महिनाभर पाणीपुरवठा होत नसल्याने पोलिस कुटुंबियांचे मोठे हाल झाले आहेत. पालिकेकडून तात्पुरत्या स्वरुपात देण्यात येणारे पाणी गढूळ असल्याने ते पिण्यायोग्य नाही. याकडे पालिकेचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात आहे. पोलिस वसाहतीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यास दिरंगाई करणाऱ्या पालिकेने तात्पुरते गढूळ पाणी देऊन पळवाट काढली आहे. वसाहतीत महिनाभर सुरु असलेला पाणीप्रश्न पालिकेकडून गांभिर्याने घेण्यात येत नसल्याचा आरोपही पोलिस कुटुंबियांनी केला. यावेळी तहसीलदार खाडे यांनी पोलिसांचे म्हणणे ऐकून घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. पोलिस कर्मचारी व कुटुंबियांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता तहसीलदार खाडे यांनी पोलिसांशी काहीकाळ चर्चा केली. संबंधितावर कारवाई का नाही? मालवण पोलिस वसाहतीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेच्या संकुलाच्या वीज मीटरवरून या वसाहतीला नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा होत होता. मात्र विहिरीवरून पाणी उपसा करणाऱ्या वीज पंपाचे बिल भरणा करण्याच्या प्रश्नावरून वीज वितरण व पालिका प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाल्याने गेले २५ दिवस वसाहतीतील ३० ते ३५ कुटुंबे पाणीटंचाईचा सामना करत आहेत. मुख्याधिकारी रंजना गगे यांनी दोन दिवसांत पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन देऊनही पाणी प्रश्न सुटला नाही. याबाबत पालिका प्रशासन सबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यास टाळाटाळ का करते, असाही सवाल उपस्थित करण्यात आला. (प्रतिनिधी) गृहराज्यमंत्री लक्ष देतील का? मालवण पोलिस वसाहतीत गेले २५ दिवस पाणीपुरवठा खंडित आहे. पालिकेला वारंवार सांगूनही हा प्रश्न सुटला नाही. पोलिसांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे व्यथा मांडताना तत्काळ प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे याची दखल घेत केसरकर पोलिसांना घरे देण्यापेक्षा मुलभूत समस्या मार्गी लावतील काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ४वसाहतीत पिण्याचे पाणी येत नसल्याने महिनाभर शांत बसलेला पोलिसांमधील ‘माणसा’चा उद्रेक झाला. पाणी पुरवठा सुरळीत न करता पर्यायी पाणी उपलब्ध करून पालिका आपली जबाबदारी झटकत आहे. हेच पाणी शहरात एक दिवस बंद ठेवले तरी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तत्काळ पाणीपुरवठा केला जातो. मात्र पोलिस वसाहतीत लक्ष वेधूनही २५ दिवस पाणी येत नाही म्हणजे पोलिस माणसे नाहीत का ? अशा अनेक प्रश्नांची पोलिसांनी सरबत्ती गगे यांच्यावर केली. मात्र, या प्रश्नांना ठोस उत्तरे देऊ न शकल्याने तहसीलदार दालनातून मुख्याधिकारी गगे यांनी काढता पाय घेतला. पहिली आंघोळ पाण्याविना! पोलिस कुटुबियांचाही पारा यावेळी चांगलाच चढला होता. ऐन दिवाळीत उद्भवलेल्या पाण्याच्या समस्येवर पालिकेने तोडगा काढला नसल्याने दिवाळीची पहिली आंघोळ पाण्याविना करण्याची वेळही पोलिसांवर आली आहे. कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस व त्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा आदर केला जात नाही. पाणी प्रश्नाबाबत पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनीही गगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन कट केला. त्यामुळे पोलिसांच्या समस्येवर पालिका प्रशासनाला वेळ नाही, अशी खंत पोलिसांनी व्यक्त केली. हा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेकडून अपेक्षित सहकार्य न मिळता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वसाहतीला गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने आवाज उठवून न्याय मिळत नसेल तर शुध्द पाणी पोलिसांनी प्यायचेच नाही का ? कायद्याने हात बांधले गेले असल्याने अन्याय सहन करावा लागत आहे, असे आरोप करण्यात आले.