शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

पोयनारचे विस्थापित अडचणीत

By admin | Updated: June 12, 2015 00:35 IST

धरणाचे काम बंद : २२९ घरे विस्थापित, दोन बैठका निष्फळ

खेड : तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत पोयनार धरणाचे काम सध्या बंद करण्यात आले आहे. तांत्रिक त्रुटीमुळे हे काम बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ३५ कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च करून हे काम करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप पुनर्वसनाचे काम सुरू झाले नसल्याने विस्थापित संकटात सापडले आहेत. प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपासाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्याने प्रकल्पग्रस्त आणि उपजिल्हाधिकारी यांच्यात मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे २२९ घरांचे विस्थापन अडचणीत आले आहे. दरम्यान, पोयनार धरणाचे काम सध्या बंद करण्यात आले असून, विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर या कामाला मुहूर्त मिळणार की नाही, याबाबत या धरणावर काम करणारे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून या धरणग्रस्तांच्या मागण्यांवर विचार करावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. मार्च २०१५मध्ये उपजिल्हाधिकारी राऊत आणि ग्रामस्थांमध्ये बैठक पार पडली होती. यावेळी ग्रामस्थांच्या सोयीनुसारच भूखंड वाटप करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरल्याने ही बैठक निष्फळ ठरली. यानंतर ७ जून २०१५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रकल्पग्रस्तांनी हाच आग्रह कायम ठेवल्याने उपजिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना बैठक अर्धवट सोडावी लागली. दोन्ही बैठकांमध्ये भूखंड वाटपाबाबत ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली. पोयनार धरणाचे अभियंता खेडेकर यांनी ही माहिती दिली. मात्र, असे असले तरीही पुन्हा याबाबत २ दिवसातच बैठक घेणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या मते अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अडचणीत आले आहे, तर अधिकाऱ्यांच्या मते प्रकल्पग्रस्तांच्या असहकार्यामुळेच पुनर्वसन संघर्षमय अवस्थेत पोहोचले आहे. परस्परविरोधी आरोप - प्रत्यारोपांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या जागा संपादित करण्यात आल्याने त्यांच्या सोयीनुसार भूखंडाचे वाटप होणे आवश्यक आहे. परंतु अधिकाऱ्यांनी ही बाब ताणून धरल्याने चर्चा निष्फळ ठरविली जात आहे. मात्र, अभियंत्यांनी प्रकल्पग्रस्तांना समजावून योग्य तो मार्ग काढला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. धरणातील ७० टक्के काम पूर्ण झाले. या धरणाचे काम सुरू होण्यापूर्वी निधी उपलब्ध झाला होता, अशी माहिती खेडेकर यांनी दिली. उर्वरित काम निधीअभावी अनेकवेळा बंद करण्यात आले होते. आता हे काम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम मंदावले होेते. पोयनार धरणामुळे पोयनार गावातील ९० घरे, फुरूस गावातील १०६ घरे आणि धामणी गावातील ३३ घरे विस्थापित होणार आहेत. २२९ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. या सर्वांना भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. याकरिता रत्नागिरी येथून कूळवहिवाट विभागाचे उपजिल्हाधिकारी राऊत आणि इतर अधिकाऱ्यांनी दोन वेळा पोयनार गावाला भेट दिली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी शासकीय नियमानुसार कारवाई सुरू केली असता ग्रामस्थांनी त्यास विरोध केला. आम्हाला हवे त्या प्रमाणात भूखंडाची मागणी ते करीत होते. यास अधिकाऱ्यांनी विरोध केला. तसे होणार नाही, असे सांगत सरकारी नियमानुसारच या भुखंडाचे वाटप होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)तांत्रिक त्रुटीमुळे काम बंद खेड तालुक्यातील लघुपाटबंधारे विभागांतर्गत अनेक वर्षे सुरू राहिले पोयनार धरणाचे काम.पस्तीस कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे हे धरण अनेक कारणांनी गाजते आहे, कधी ठेकेदार, तर कधी शासन निर्णय, कधी निधीचा फटका. धरण विस्थापितांचे प्रश्न अद्याप कायम राहिल्याने शेतकऱ्यांना वरदान ठरणारे हे धरण कायम चर्चेतच.