शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

जगण्यावर शतदा प्रेम करणारा मराठीतील कवी गेला

By admin | Updated: December 31, 2015 00:26 IST

पुलोत्सव पुरस्काराचेही निमित्त : साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रंगलेली रत्नागिरीतील भेट

रत्नागिरी : जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवणारा, प्रेम जगणारा तरूण मनाचा कवी गेला, अशा अनेक प्रतिक्रिया रत्नागिरीतील विविध क्षेत्रातील व्यक्तिंनी पद्मभूषण कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच व्यक्त केल्या आहेत.मंगेश पाडगावकर यांचे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रत्नागिरीत येणे झाले होते. आॅक्टोबर २०१३मध्ये आर्ट सर्कलने आयोजित केलेल्या पुलोत्सवात त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या हस्ते सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावेळी पाटगावकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या कवितांवर आधारित ‘माझे जीवन गाणे’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनोगत व्यक्त करताना पाडगावकर यांनी ‘मला मृत्युचे सावट आजुबाजुला असल्याचे वाटते. मृत्यूची आता मला भीती वाटते, असे निराशाजनक उद्गार त्यांनी काढले होते. महाराष्ट्रातील लोकांना, रसिक जनतेला आणि अबालवृद्धांना कवितेने समृद्ध करणारे महान कवी मंगेश पाडगावकर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. निधनाचे वृत्त कळताच अनेक क्षेत्रातून त्यांच्या काव्यप्रतिभेबाबत अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. व्हॉट्सअ‍ॅपवरूनही पाडगावकर यांच्या सलाम आणि प्रेम म्हणजे प्रेम असतं, या प्रसिद्ध कविता शेअर करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाडगावकर यांच्या आठवणी अजूनही रत्नागिरीकरांच्या स्मरणात आहेत. (प्रतिनिधी)मराठी कवितेतला शुक्रतारा अस्ताला गेलामंगेश पाडगावकर यांच्या रुपाने माणसावर, निसर्गावर आणि जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकविणारा एक ‘जिप्सी’ कवी गेला. पाडगावकरांनी आयुष्यभर सौंदर्याचं गाण गायलं आणि महाराष्ट्राला प्रेम करायला शिकवलं. मानवी भावनांचा नितळपणा आणि निसर्गाचे सौंदर्य यांची त्यांनी सांगड घातली. वेंगुर्ल्यात जन्म घेतलेल्या पाडगावकरांनी कोकणवर आणि मालवणी बोलीवर अतिशय प्रेम केलं. विंदा, बापट आणि पाडगावकरांनी काव्यवाचनाने रसिकांना महाराष्ट्राला कविता शिकविली. कोमसापच्या चिपळूण येथील पहिल्या साहित्य संमेलनात पाडगावकरांची प्रकट मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी ‘श्रावणात घन निळा बरसला ’ व ‘सलाम’ या दोन्ही कवितांमधील खरे पाडगावकर कोणते, असा प्रश्न मी विचारला असता त्यांनी उत्तर दिले, ‘दोन्ही’. मराठी कवितेतील ‘शुक्रतारा’ आता अस्ताला गेला आहे. या प्रतिभावान मराठी कवीला मानाचा ‘सलाम’.- अ‍ॅड. विलास पाटणे, रत्नागिरीआनंदयात्रीला सलाम !ज्यांच्या कवितांचं बोट धरून आम्ही बालपणी पावलं टाकली, तारूण्यात प्रेम केलं, प्रौढत्वात अंतर्मुख झालो, त्या आनंदयात्रीला सलाम! मंगेशाचं देणं आम्हाला श्रीमंत करून गेलं.- दीप्ती कानविंदे, रत्नागिरी