शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

जगण्यावर शतदा प्रेम करणारा मराठीतील कवी गेला

By admin | Updated: December 31, 2015 00:26 IST

पुलोत्सव पुरस्काराचेही निमित्त : साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रंगलेली रत्नागिरीतील भेट

रत्नागिरी : जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवणारा, प्रेम जगणारा तरूण मनाचा कवी गेला, अशा अनेक प्रतिक्रिया रत्नागिरीतील विविध क्षेत्रातील व्यक्तिंनी पद्मभूषण कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच व्यक्त केल्या आहेत.मंगेश पाडगावकर यांचे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रत्नागिरीत येणे झाले होते. आॅक्टोबर २०१३मध्ये आर्ट सर्कलने आयोजित केलेल्या पुलोत्सवात त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या हस्ते सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावेळी पाटगावकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या कवितांवर आधारित ‘माझे जीवन गाणे’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनोगत व्यक्त करताना पाडगावकर यांनी ‘मला मृत्युचे सावट आजुबाजुला असल्याचे वाटते. मृत्यूची आता मला भीती वाटते, असे निराशाजनक उद्गार त्यांनी काढले होते. महाराष्ट्रातील लोकांना, रसिक जनतेला आणि अबालवृद्धांना कवितेने समृद्ध करणारे महान कवी मंगेश पाडगावकर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. निधनाचे वृत्त कळताच अनेक क्षेत्रातून त्यांच्या काव्यप्रतिभेबाबत अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. व्हॉट्सअ‍ॅपवरूनही पाडगावकर यांच्या सलाम आणि प्रेम म्हणजे प्रेम असतं, या प्रसिद्ध कविता शेअर करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाडगावकर यांच्या आठवणी अजूनही रत्नागिरीकरांच्या स्मरणात आहेत. (प्रतिनिधी)मराठी कवितेतला शुक्रतारा अस्ताला गेलामंगेश पाडगावकर यांच्या रुपाने माणसावर, निसर्गावर आणि जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकविणारा एक ‘जिप्सी’ कवी गेला. पाडगावकरांनी आयुष्यभर सौंदर्याचं गाण गायलं आणि महाराष्ट्राला प्रेम करायला शिकवलं. मानवी भावनांचा नितळपणा आणि निसर्गाचे सौंदर्य यांची त्यांनी सांगड घातली. वेंगुर्ल्यात जन्म घेतलेल्या पाडगावकरांनी कोकणवर आणि मालवणी बोलीवर अतिशय प्रेम केलं. विंदा, बापट आणि पाडगावकरांनी काव्यवाचनाने रसिकांना महाराष्ट्राला कविता शिकविली. कोमसापच्या चिपळूण येथील पहिल्या साहित्य संमेलनात पाडगावकरांची प्रकट मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी ‘श्रावणात घन निळा बरसला ’ व ‘सलाम’ या दोन्ही कवितांमधील खरे पाडगावकर कोणते, असा प्रश्न मी विचारला असता त्यांनी उत्तर दिले, ‘दोन्ही’. मराठी कवितेतील ‘शुक्रतारा’ आता अस्ताला गेला आहे. या प्रतिभावान मराठी कवीला मानाचा ‘सलाम’.- अ‍ॅड. विलास पाटणे, रत्नागिरीआनंदयात्रीला सलाम !ज्यांच्या कवितांचं बोट धरून आम्ही बालपणी पावलं टाकली, तारूण्यात प्रेम केलं, प्रौढत्वात अंतर्मुख झालो, त्या आनंदयात्रीला सलाम! मंगेशाचं देणं आम्हाला श्रीमंत करून गेलं.- दीप्ती कानविंदे, रत्नागिरी