शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात प्लास्टिकमुक्ती

By admin | Updated: March 31, 2016 00:01 IST

संग्राम प्रभूगावकर : हागणदारीमुक्त जिल्ह्याची घोषणा

सिंधुदुर्गनगरी : स्वच्छता मिशनअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी आयोजित पत्रकार परिषद घेऊन केली. पश्चिम भारतात व राज्यात पहिला जिल्हा हागणदारीमुक्त होण्यात सिंधुदुर्गने बाजी मारली आहे असे सांगतानाच जिल्हा हागणदारीमुक्तीत सातत्य राखणार असून भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टिक मुक्ती अभियान राबविणार असल्याचे द्वयींनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, वित्त व बांधकाम सभापती दिलीप रावराणे, शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल उपस्थित होते.जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमधून ४२९ ग्रामपंचायती टप्पा १ अंतर्गत हागणदारीमुक्त झाल्या आहेत तर दोडामार्ग तालुक्यातील बोडण व वैभववाडी तालुक्यातील आखवणे या दोन ग्रामपंचायती प्रकल्पबाधीत असल्याने त्याठिकाणी सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाला असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.जिल्ह्यात ८ लाख ४८ हजार एवढी लोकसंख्या असून त्यात १ लाख ८४ हजार कुटुंबे आहेत. त्यापैकी १ लाख ८२ हजार ४४५ एवढी वैयक्तिक शौचालये तर १५९५ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी झाल्याने सिंधुदुर्गात १०० टक्के कुटुंबे शौचालयाचा वापर करतात. सिंधुदुर्गातील जनता स्वच्छतेबाबत जागृत असल्याचे सांगत लोकांचे अभिनंदनही मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी केले.जिल्हा हागणदारीमुक्तीच्या शर्यतीत सिंधुुदुर्गाबरोबर सोलापूर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर व ठाणे हे जिल्हे होते. मात्र या सर्व जिल्ह्यांना मागे टाकत सिंधुदुर्गने बाजी मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर हागणदारीमुक्त जाहीर झाला असला तरी राज्यस्तरावर यावर मूल्यमापन करून जिल्हा हागणदारीमुक्त होणार आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेने प्लास्टिकमुक्ती अभियान यशस्वी करत जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एक आदर्श निर्माण केला असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले. (प्रतिनिधी)