शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

भविष्यात प्लास्टिकमुक्ती

By admin | Updated: March 31, 2016 00:01 IST

संग्राम प्रभूगावकर : हागणदारीमुक्त जिल्ह्याची घोषणा

सिंधुदुर्गनगरी : स्वच्छता मिशनअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी आयोजित पत्रकार परिषद घेऊन केली. पश्चिम भारतात व राज्यात पहिला जिल्हा हागणदारीमुक्त होण्यात सिंधुदुर्गने बाजी मारली आहे असे सांगतानाच जिल्हा हागणदारीमुक्तीत सातत्य राखणार असून भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टिक मुक्ती अभियान राबविणार असल्याचे द्वयींनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, वित्त व बांधकाम सभापती दिलीप रावराणे, शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल उपस्थित होते.जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमधून ४२९ ग्रामपंचायती टप्पा १ अंतर्गत हागणदारीमुक्त झाल्या आहेत तर दोडामार्ग तालुक्यातील बोडण व वैभववाडी तालुक्यातील आखवणे या दोन ग्रामपंचायती प्रकल्पबाधीत असल्याने त्याठिकाणी सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाला असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.जिल्ह्यात ८ लाख ४८ हजार एवढी लोकसंख्या असून त्यात १ लाख ८४ हजार कुटुंबे आहेत. त्यापैकी १ लाख ८२ हजार ४४५ एवढी वैयक्तिक शौचालये तर १५९५ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी झाल्याने सिंधुदुर्गात १०० टक्के कुटुंबे शौचालयाचा वापर करतात. सिंधुदुर्गातील जनता स्वच्छतेबाबत जागृत असल्याचे सांगत लोकांचे अभिनंदनही मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी केले.जिल्हा हागणदारीमुक्तीच्या शर्यतीत सिंधुुदुर्गाबरोबर सोलापूर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर व ठाणे हे जिल्हे होते. मात्र या सर्व जिल्ह्यांना मागे टाकत सिंधुदुर्गने बाजी मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर हागणदारीमुक्त जाहीर झाला असला तरी राज्यस्तरावर यावर मूल्यमापन करून जिल्हा हागणदारीमुक्त होणार आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेने प्लास्टिकमुक्ती अभियान यशस्वी करत जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एक आदर्श निर्माण केला असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले. (प्रतिनिधी)