शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भविष्यात प्लास्टिकमुक्ती

By admin | Updated: March 31, 2016 00:01 IST

संग्राम प्रभूगावकर : हागणदारीमुक्त जिल्ह्याची घोषणा

सिंधुदुर्गनगरी : स्वच्छता मिशनअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी आयोजित पत्रकार परिषद घेऊन केली. पश्चिम भारतात व राज्यात पहिला जिल्हा हागणदारीमुक्त होण्यात सिंधुदुर्गने बाजी मारली आहे असे सांगतानाच जिल्हा हागणदारीमुक्तीत सातत्य राखणार असून भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टिक मुक्ती अभियान राबविणार असल्याचे द्वयींनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, वित्त व बांधकाम सभापती दिलीप रावराणे, शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल उपस्थित होते.जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमधून ४२९ ग्रामपंचायती टप्पा १ अंतर्गत हागणदारीमुक्त झाल्या आहेत तर दोडामार्ग तालुक्यातील बोडण व वैभववाडी तालुक्यातील आखवणे या दोन ग्रामपंचायती प्रकल्पबाधीत असल्याने त्याठिकाणी सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाला असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.जिल्ह्यात ८ लाख ४८ हजार एवढी लोकसंख्या असून त्यात १ लाख ८४ हजार कुटुंबे आहेत. त्यापैकी १ लाख ८२ हजार ४४५ एवढी वैयक्तिक शौचालये तर १५९५ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी झाल्याने सिंधुदुर्गात १०० टक्के कुटुंबे शौचालयाचा वापर करतात. सिंधुदुर्गातील जनता स्वच्छतेबाबत जागृत असल्याचे सांगत लोकांचे अभिनंदनही मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी केले.जिल्हा हागणदारीमुक्तीच्या शर्यतीत सिंधुुदुर्गाबरोबर सोलापूर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर व ठाणे हे जिल्हे होते. मात्र या सर्व जिल्ह्यांना मागे टाकत सिंधुदुर्गने बाजी मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर हागणदारीमुक्त जाहीर झाला असला तरी राज्यस्तरावर यावर मूल्यमापन करून जिल्हा हागणदारीमुक्त होणार आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेने प्लास्टिकमुक्ती अभियान यशस्वी करत जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एक आदर्श निर्माण केला असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले. (प्रतिनिधी)