शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
4
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
5
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
6
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
7
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
8
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
9
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
10
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
11
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
12
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
13
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
14
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
15
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
16
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
17
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
18
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
19
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
20
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले

महामार्ग ठेकेदाराचे गलथान नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 10:23 PM

सुधीर राणे। कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रस्ते परिवर्तित ...

सुधीर राणे।कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रस्ते परिवर्तित करण्यात येत आहेत. मात्र, या रस्त्यांबाबत वाहन चालकांना माहिती नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराचे गलथान नियोजन याला कारणीभूत असून एकप्रकारे संबंधित स्थिती अपघाताला आमंत्रणच ठरत आहे.या स्थितीतून आपली कधी सुटका होणार? असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे. कणकवली शहरात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. मात्र, काही प्रकल्पग्रस्तांची जमीन महामार्ग चौपदरीकरणात गेली असली तरी अजूनही त्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या इमारती तोडण्यास त्यांनी हरकत घेतली आहे. याचा परिणाम म्हणजे संबंधित ठिकाणी महामार्ग ठेकेदाराला काम करणे शक्य होत नाही.त्यामुळे एकूणच कामावर परिणाम झाला आहे. कणकवली शहरात उड्डाणपुलाच्या दुतर्फा सर्व्हिस रस्ता तयार करायचा आहे. त्यापैकी काही ठिकाणी सर्व्हिस रस्ता तयार झाला आहे. मात्र, कणकवली तेलीआळी डीपी रोडपासून हॉटेल मंजुनाथपर्यंत सर्व्हिस रस्ता करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या परिसरात ठिकठिकाणी परिवर्तित रस्ता तयार करून काम करावे लागत आहे.अशीच स्थिती नरडवे रोडजवळ महाडिक कंपाऊंड येथे आहे. परिवर्तित रस्ते तयार करताना ठेकेदाराकडून योग्य ते नियोजन केले जात नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी आज परिवर्तित मार्ग असेल तिथेच दुसºया दिवशी तो असेल याबाबत खात्री नसल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांचा गोंधळ उडत आहे. यातूनच अपघाताच्या घटना घडत आहेत.त्यामुळे या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असून ठेकेदाराला या समस्येची जाणीव करून देणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित परिसरात अपघाताच्या घटना घडतच राहणार आहेत. अनेकवेळा वाहनांना ये-जा करण्यासाठी एकच परिवर्तित मार्ग असल्याने तसेच तो अरूंद असल्याने समोरासमोर वाहनांची धडक होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत.सर्व्हिस रस्त्याच्या बाजूने बनविण्यात येणाºया गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. गटारावरील स्लॅबही चांगल्या प्रतीचे साहित्य वापरून बनविले नसल्याने ते खचत आहेत. त्यामुळेही अपघात घडत आहेत.