शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
3
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
4
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
5
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
6
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
7
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
8
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
9
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
10
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
11
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
12
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
13
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
14
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
15
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
16
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
17
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
18
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
19
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
20
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू

महामार्ग ठेकेदाराचे गलथान नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:23 IST

सुधीर राणे। कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रस्ते परिवर्तित ...

सुधीर राणे।कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रस्ते परिवर्तित करण्यात येत आहेत. मात्र, या रस्त्यांबाबत वाहन चालकांना माहिती नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराचे गलथान नियोजन याला कारणीभूत असून एकप्रकारे संबंधित स्थिती अपघाताला आमंत्रणच ठरत आहे.या स्थितीतून आपली कधी सुटका होणार? असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे. कणकवली शहरात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. मात्र, काही प्रकल्पग्रस्तांची जमीन महामार्ग चौपदरीकरणात गेली असली तरी अजूनही त्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या इमारती तोडण्यास त्यांनी हरकत घेतली आहे. याचा परिणाम म्हणजे संबंधित ठिकाणी महामार्ग ठेकेदाराला काम करणे शक्य होत नाही.त्यामुळे एकूणच कामावर परिणाम झाला आहे. कणकवली शहरात उड्डाणपुलाच्या दुतर्फा सर्व्हिस रस्ता तयार करायचा आहे. त्यापैकी काही ठिकाणी सर्व्हिस रस्ता तयार झाला आहे. मात्र, कणकवली तेलीआळी डीपी रोडपासून हॉटेल मंजुनाथपर्यंत सर्व्हिस रस्ता करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या परिसरात ठिकठिकाणी परिवर्तित रस्ता तयार करून काम करावे लागत आहे.अशीच स्थिती नरडवे रोडजवळ महाडिक कंपाऊंड येथे आहे. परिवर्तित रस्ते तयार करताना ठेकेदाराकडून योग्य ते नियोजन केले जात नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी आज परिवर्तित मार्ग असेल तिथेच दुसºया दिवशी तो असेल याबाबत खात्री नसल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांचा गोंधळ उडत आहे. यातूनच अपघाताच्या घटना घडत आहेत.त्यामुळे या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असून ठेकेदाराला या समस्येची जाणीव करून देणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित परिसरात अपघाताच्या घटना घडतच राहणार आहेत. अनेकवेळा वाहनांना ये-जा करण्यासाठी एकच परिवर्तित मार्ग असल्याने तसेच तो अरूंद असल्याने समोरासमोर वाहनांची धडक होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत.सर्व्हिस रस्त्याच्या बाजूने बनविण्यात येणाºया गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. गटारावरील स्लॅबही चांगल्या प्रतीचे साहित्य वापरून बनविले नसल्याने ते खचत आहेत. त्यामुळेही अपघात घडत आहेत.