शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

करटेल गावात भातशेतीचे नुकसान

By admin | Updated: November 9, 2014 23:34 IST

जंगलातून रानटी डुकरांनी दररोज रात्री भातशेतीत घुसून नासधूस

कुंभाड : खेड तालुक्यातील आदर्श गाव करटेलमधील भातशेती रानटी डुकरांनी नष्ट केली आहे. करटेल गावापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील जंगलातून दररोज रात्री भातशेतीत घुसून मोठ्या प्रमाणात नासधूस करीत आहेत़ यामुळे गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे़खेड शहरापासून ५ किलोमीटर अंंतरावर असलेल्या गावातील श्रीकांत तुकाराम चव्हाण यांची दोन एकरातील भातशेती हातातोंडाशी आली होती. मात्र, ही भातशेती पेंढ्यासह या डुकरांनी नष्ट केली आहे़ या शेतीचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे़ डुकरांनी भात तर शिल्लक ठेवले नाहीच, तर भाताचा पेंढादेखील खाऊन फस्त करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. गेले दोन महिने येथील रानातील ही डुकरे दररोज गावातील या भातशेतीमध्ये येत आहेत. गावठी बियाण्यांपासून पाच प्रकारच्या भातबियाण्यांचा या भातशेतीमध्ये यावर्षी प्रयोग करण्यात आले होता. गावातील अन्य शेतकऱ्यांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ परतीच्या पावसाने या भातपिकाचे काहीअंशी नुकसान केले होते़ सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाल्याने उभी भातशेती आडवी झाली होती. त्यातच पाऊस झाल्याने भातपीक रूजले होते़ शेतीतील भाताचे पीक हातामध्ये येण्याची शक्यता कमी होती. गतवर्षीच्या तुलनेत ही भातशेती नगण्य असल्याने अगोदरच शेतकऱ्यांचे मनोबल कमकुवत झाले होते. अशातच रात्रीच्या सुमारास या जंगलातून डुकरांनी आपली हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे़ गेल्या दोन महिन्यांपासून हे डुक्कर या भातशेतीत घुसून दररोज नासधूस करीत आहेत़ यामुळे गावातील २० शेतकरी हताश झाले आहेत. याबाबत येथील वन अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील शेतकरी करीत आहेत. अखेर नाईलाज झाल्यानंतर शेतकऱ्यांनी येथील कृषी अधिकाऱ्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली आहे़ त्यांनी पंचनामा करून नुकसानाची माहिती घेतली. या नुकसानभरपाईचे आश्वासन दिले आहे. लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)