शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

करटेल गावात भातशेतीचे नुकसान

By admin | Updated: November 9, 2014 23:34 IST

जंगलातून रानटी डुकरांनी दररोज रात्री भातशेतीत घुसून नासधूस

कुंभाड : खेड तालुक्यातील आदर्श गाव करटेलमधील भातशेती रानटी डुकरांनी नष्ट केली आहे. करटेल गावापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील जंगलातून दररोज रात्री भातशेतीत घुसून मोठ्या प्रमाणात नासधूस करीत आहेत़ यामुळे गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे़खेड शहरापासून ५ किलोमीटर अंंतरावर असलेल्या गावातील श्रीकांत तुकाराम चव्हाण यांची दोन एकरातील भातशेती हातातोंडाशी आली होती. मात्र, ही भातशेती पेंढ्यासह या डुकरांनी नष्ट केली आहे़ या शेतीचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे़ डुकरांनी भात तर शिल्लक ठेवले नाहीच, तर भाताचा पेंढादेखील खाऊन फस्त करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. गेले दोन महिने येथील रानातील ही डुकरे दररोज गावातील या भातशेतीमध्ये येत आहेत. गावठी बियाण्यांपासून पाच प्रकारच्या भातबियाण्यांचा या भातशेतीमध्ये यावर्षी प्रयोग करण्यात आले होता. गावातील अन्य शेतकऱ्यांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ परतीच्या पावसाने या भातपिकाचे काहीअंशी नुकसान केले होते़ सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाल्याने उभी भातशेती आडवी झाली होती. त्यातच पाऊस झाल्याने भातपीक रूजले होते़ शेतीतील भाताचे पीक हातामध्ये येण्याची शक्यता कमी होती. गतवर्षीच्या तुलनेत ही भातशेती नगण्य असल्याने अगोदरच शेतकऱ्यांचे मनोबल कमकुवत झाले होते. अशातच रात्रीच्या सुमारास या जंगलातून डुकरांनी आपली हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे़ गेल्या दोन महिन्यांपासून हे डुक्कर या भातशेतीत घुसून दररोज नासधूस करीत आहेत़ यामुळे गावातील २० शेतकरी हताश झाले आहेत. याबाबत येथील वन अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील शेतकरी करीत आहेत. अखेर नाईलाज झाल्यानंतर शेतकऱ्यांनी येथील कृषी अधिकाऱ्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली आहे़ त्यांनी पंचनामा करून नुकसानाची माहिती घेतली. या नुकसानभरपाईचे आश्वासन दिले आहे. लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)