शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

हुंबरठ येथे कायमस्वरूपी चेकपोस्ट

By admin | Updated: August 11, 2015 23:34 IST

संजय साबळे : दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी ७ आरामबस चालकांवर कारवाई

सिंधुदुर्गनगरी : प्रवासी वाहतूक करणारे आराम बसेसचे काही चालक दारु पिऊन वाहन चालवत असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कणकवली तालुक्यातील हुंबरठ तिठा येथे कायमस्वरुपी चेकपोस्ट उभारण्यात आले असून गेल्या २० दिवसांत दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी ७ आरामबस चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली. जिल्ह्यात किंवा अन्य ठिकाणी खासगी आरामबसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमालीची असते. काही बसेसचे चालक वाहने सुसाट चालवून काही तासातच मुंबईला पोहोचतात तर काही आराम बसेसचे चालक दारु पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघात घडून त्यात निष्पाप प्रवाशांचे बळी जातात. ही बाब समोर आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यात खासगी आराम बसेसच्या वाहनचालकांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथे कायमस्वरुपी चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. या चेकपोस्टवर वाहतूक शाखेचे दोन व कणकवली पोलीस ठाण्याचे दोन असे एकूण चार कर्मचारी आहेत. रात्री ८ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनचालकांची ब्रेथ अ‍ॅनालायझरमार्फत तपासणी करण्यात येत आहे. २१ आॅगस्टपासून स्थापन करण्यात आलेल्या चेकपोस्टवर अद्यापपर्यंत म्हणजेच गेल्या २० दिवसांत ७ आराम बसेसच्या वाहनचालकांवर दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली. दररोज ४० ते ५० आरामबसेसच्या दोन्ही वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या मी नेहमीच विरोधात आहे. महामार्गावर असा प्रकार घडल्यास संबंधित वाहनचालकांवर कायदेशीर कारवाईही सुरुच राहणार आहे. - संजय साबळे, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूकमहिन्याभरात ६0 चालकांवर कारवाईजिल्ह्यात महिनाभरात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांची कसून तपासणी वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात येत आहे. त्यानुसार इन्सुली येथे करण्यात आलेल्या तपासणीत १० लक्झरी बसेस चालक, आंबोली येथे १२ वाहनचालक आदी एकूण ६० वाहनचालकांवर दंडात्मक स्वरुपात कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिली.