शहरं
Join us  
Trending Stories
1
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
3
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
4
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
5
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
6
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
7
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
8
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
9
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
10
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
11
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
12
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
13
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
14
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
15
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
16
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
17
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
18
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
19
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
20
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच

निशाण तलावातील लोकसहभागातून गाळ काढणार

By admin | Updated: May 29, 2016 00:18 IST

वेंगुर्लेवासीय एकत्र : ३0 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कामास प्रारंभ करणार

वेंगुर्ले : ब्रिटीश काळात वेंगुर्ले शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावात पाण्याचा थेंब साठत नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या तलावाचे निकृष्ट बांधकाम केले. या मालमत्तेवर नगरपरिषदेकडून दुर्लक्ष झाल्याने उन्हाळी पाणी टंचाई झळ तीव्र झाली. त्यामुळे शनिवारी लोकसहभागातून या तलावाचा गाळ काढणे व परिसराची साफसफाई करण्यासाठी स्थानिक नागरिक एकवटले. यावेळी युवाशक्ती प्रतिष्ठान, नागरी कृती समिती व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहभागातून काम करण्याचा निर्णय विलास गावडे यांनी जाहीर केला. मात्र, या संंदर्भात प्रथम जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व चर्चा करुनच हे काम केले जाणार आहे. त्यानुसार ३0 मे रोजी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कामाची सुरुवात करण्याचा निर्णय जाहीर केला. वेंगुर्ले शहरात उन्हाळी पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याने व शासनस्तरावर नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले यांनी निशाण तलाव व नारायण तलाव या महत्वाच्या जलस्तोत्राबाबत पाठपुरावा करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वेंंगुर्लेतील नागरिक लोकसहभागातून नारायण तलावाचा गाळ काढणे व स्वच्छता करण्यासाठी पुढे सरसावले. शनिवारी वेंगुर्लेतील नागरिकांनी घेतलेल्या निर्णयास पूर्ण सहभाग व पाठींबा देण्यासाठी युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे, नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले, व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, स्थानिक ज्येष्ठ ग्रामस्थ बाली गांवकर, सामाजिक कार्यकर्ते भाई मोरजे, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, राजन गिरप, प्रदीप वेंगुर्लेकर, वैभव गावडे, अनुप गावडे, कृष्णा गांवकर, समाधान बांदवलकर, गिरगोल फर्नांडिस, श्रीराम कांदळगांवकर, गणपत चोडणकर, अंकुश मलबारी, श्रीकांत रानडे, सतेज मयेकर, महेश गांवकर, मंगेश मलबारी आदी प्रमुख नागरीकांच्या झालेल्या चर्चेत हा तलाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सध्या ताब्यात असल्याने व नगरपरिषद गेली १० वर्षे या तलावाकडे दुर्लक्ष करीत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांची येत्या ३0 मे सोमवारी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करुन तलावाच्या साफसफाईचा व गाळ काढण्याचा निर्णय निश्चित करु व ५ ते ६ दिवसांत गाळ व साफसफाईचे काम लोकसहभागातून पूर्ण करुया, असे आश्वासन युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे यांनी दिले. सोमवारी ७ जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांचेकडे या तलावाच्या गाळ काढणे व स्वच्छतेच्या लोकसहभागातील कामासाठी भेट घेईल असेही स्पष्ट करण्यात आले. नारायण तलावाची दक्षिणेकडील भिंत ही या धरणासाठी फार महत्वाची आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या धरणाच्या खोदाईत दक्षिणेकडील भिंतीची ५ फूट तलाव खोली केली. त्यावेळी त्या ५ फूटाचे बांधकाम भक्कम व मजबूत स्वरुपात केले नसल्याने पाणी पाझरुन ते वाहून जाते. या तलावाच्या उर्वरीत भिंतीचे बांधकाम करण्यापेक्षा दक्षिणेकडील धरणाची मुख्य भिंत ही नवीन व मजबुतीने बांधल्यास धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होईल, असे ज्येष्ठ ग्रामस्थ बाली गांवकर यांनी यावेळी स्पष्ट केले. वेंगुर्ले शहरात ओल्या, सुक्या, लोखंडी, काच व प्लॅस्टीक कच-याच्या स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष दिले आहे असे असताना नारायण तलाव व परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही का? शासन जलस्तोत्र विकासास सर्वप्रथम प्राधान्य दिले असे असताना नगरपरिषदेचे नारायण तलावाकडे दुर्लक्ष ही बाब गंभीर असल्याचे स्थानिक नागरीकांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)