शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

निशाण तलावातील लोकसहभागातून गाळ काढणार

By admin | Updated: May 29, 2016 00:18 IST

वेंगुर्लेवासीय एकत्र : ३0 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कामास प्रारंभ करणार

वेंगुर्ले : ब्रिटीश काळात वेंगुर्ले शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावात पाण्याचा थेंब साठत नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या तलावाचे निकृष्ट बांधकाम केले. या मालमत्तेवर नगरपरिषदेकडून दुर्लक्ष झाल्याने उन्हाळी पाणी टंचाई झळ तीव्र झाली. त्यामुळे शनिवारी लोकसहभागातून या तलावाचा गाळ काढणे व परिसराची साफसफाई करण्यासाठी स्थानिक नागरिक एकवटले. यावेळी युवाशक्ती प्रतिष्ठान, नागरी कृती समिती व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहभागातून काम करण्याचा निर्णय विलास गावडे यांनी जाहीर केला. मात्र, या संंदर्भात प्रथम जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व चर्चा करुनच हे काम केले जाणार आहे. त्यानुसार ३0 मे रोजी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कामाची सुरुवात करण्याचा निर्णय जाहीर केला. वेंगुर्ले शहरात उन्हाळी पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याने व शासनस्तरावर नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले यांनी निशाण तलाव व नारायण तलाव या महत्वाच्या जलस्तोत्राबाबत पाठपुरावा करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वेंंगुर्लेतील नागरिक लोकसहभागातून नारायण तलावाचा गाळ काढणे व स्वच्छता करण्यासाठी पुढे सरसावले. शनिवारी वेंगुर्लेतील नागरिकांनी घेतलेल्या निर्णयास पूर्ण सहभाग व पाठींबा देण्यासाठी युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे, नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले, व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, स्थानिक ज्येष्ठ ग्रामस्थ बाली गांवकर, सामाजिक कार्यकर्ते भाई मोरजे, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, राजन गिरप, प्रदीप वेंगुर्लेकर, वैभव गावडे, अनुप गावडे, कृष्णा गांवकर, समाधान बांदवलकर, गिरगोल फर्नांडिस, श्रीराम कांदळगांवकर, गणपत चोडणकर, अंकुश मलबारी, श्रीकांत रानडे, सतेज मयेकर, महेश गांवकर, मंगेश मलबारी आदी प्रमुख नागरीकांच्या झालेल्या चर्चेत हा तलाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सध्या ताब्यात असल्याने व नगरपरिषद गेली १० वर्षे या तलावाकडे दुर्लक्ष करीत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांची येत्या ३0 मे सोमवारी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करुन तलावाच्या साफसफाईचा व गाळ काढण्याचा निर्णय निश्चित करु व ५ ते ६ दिवसांत गाळ व साफसफाईचे काम लोकसहभागातून पूर्ण करुया, असे आश्वासन युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे यांनी दिले. सोमवारी ७ जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांचेकडे या तलावाच्या गाळ काढणे व स्वच्छतेच्या लोकसहभागातील कामासाठी भेट घेईल असेही स्पष्ट करण्यात आले. नारायण तलावाची दक्षिणेकडील भिंत ही या धरणासाठी फार महत्वाची आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या धरणाच्या खोदाईत दक्षिणेकडील भिंतीची ५ फूट तलाव खोली केली. त्यावेळी त्या ५ फूटाचे बांधकाम भक्कम व मजबूत स्वरुपात केले नसल्याने पाणी पाझरुन ते वाहून जाते. या तलावाच्या उर्वरीत भिंतीचे बांधकाम करण्यापेक्षा दक्षिणेकडील धरणाची मुख्य भिंत ही नवीन व मजबुतीने बांधल्यास धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होईल, असे ज्येष्ठ ग्रामस्थ बाली गांवकर यांनी यावेळी स्पष्ट केले. वेंगुर्ले शहरात ओल्या, सुक्या, लोखंडी, काच व प्लॅस्टीक कच-याच्या स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष दिले आहे असे असताना नारायण तलाव व परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही का? शासन जलस्तोत्र विकासास सर्वप्रथम प्राधान्य दिले असे असताना नगरपरिषदेचे नारायण तलावाकडे दुर्लक्ष ही बाब गंभीर असल्याचे स्थानिक नागरीकांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)