शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निशाण तलावातील लोकसहभागातून गाळ काढणार

By admin | Updated: May 29, 2016 00:18 IST

वेंगुर्लेवासीय एकत्र : ३0 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कामास प्रारंभ करणार

वेंगुर्ले : ब्रिटीश काळात वेंगुर्ले शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावात पाण्याचा थेंब साठत नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या तलावाचे निकृष्ट बांधकाम केले. या मालमत्तेवर नगरपरिषदेकडून दुर्लक्ष झाल्याने उन्हाळी पाणी टंचाई झळ तीव्र झाली. त्यामुळे शनिवारी लोकसहभागातून या तलावाचा गाळ काढणे व परिसराची साफसफाई करण्यासाठी स्थानिक नागरिक एकवटले. यावेळी युवाशक्ती प्रतिष्ठान, नागरी कृती समिती व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहभागातून काम करण्याचा निर्णय विलास गावडे यांनी जाहीर केला. मात्र, या संंदर्भात प्रथम जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व चर्चा करुनच हे काम केले जाणार आहे. त्यानुसार ३0 मे रोजी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कामाची सुरुवात करण्याचा निर्णय जाहीर केला. वेंगुर्ले शहरात उन्हाळी पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याने व शासनस्तरावर नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले यांनी निशाण तलाव व नारायण तलाव या महत्वाच्या जलस्तोत्राबाबत पाठपुरावा करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वेंंगुर्लेतील नागरिक लोकसहभागातून नारायण तलावाचा गाळ काढणे व स्वच्छता करण्यासाठी पुढे सरसावले. शनिवारी वेंगुर्लेतील नागरिकांनी घेतलेल्या निर्णयास पूर्ण सहभाग व पाठींबा देण्यासाठी युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे, नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले, व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, स्थानिक ज्येष्ठ ग्रामस्थ बाली गांवकर, सामाजिक कार्यकर्ते भाई मोरजे, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, राजन गिरप, प्रदीप वेंगुर्लेकर, वैभव गावडे, अनुप गावडे, कृष्णा गांवकर, समाधान बांदवलकर, गिरगोल फर्नांडिस, श्रीराम कांदळगांवकर, गणपत चोडणकर, अंकुश मलबारी, श्रीकांत रानडे, सतेज मयेकर, महेश गांवकर, मंगेश मलबारी आदी प्रमुख नागरीकांच्या झालेल्या चर्चेत हा तलाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सध्या ताब्यात असल्याने व नगरपरिषद गेली १० वर्षे या तलावाकडे दुर्लक्ष करीत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांची येत्या ३0 मे सोमवारी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करुन तलावाच्या साफसफाईचा व गाळ काढण्याचा निर्णय निश्चित करु व ५ ते ६ दिवसांत गाळ व साफसफाईचे काम लोकसहभागातून पूर्ण करुया, असे आश्वासन युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गावडे यांनी दिले. सोमवारी ७ जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांचेकडे या तलावाच्या गाळ काढणे व स्वच्छतेच्या लोकसहभागातील कामासाठी भेट घेईल असेही स्पष्ट करण्यात आले. नारायण तलावाची दक्षिणेकडील भिंत ही या धरणासाठी फार महत्वाची आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या धरणाच्या खोदाईत दक्षिणेकडील भिंतीची ५ फूट तलाव खोली केली. त्यावेळी त्या ५ फूटाचे बांधकाम भक्कम व मजबूत स्वरुपात केले नसल्याने पाणी पाझरुन ते वाहून जाते. या तलावाच्या उर्वरीत भिंतीचे बांधकाम करण्यापेक्षा दक्षिणेकडील धरणाची मुख्य भिंत ही नवीन व मजबुतीने बांधल्यास धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होईल, असे ज्येष्ठ ग्रामस्थ बाली गांवकर यांनी यावेळी स्पष्ट केले. वेंगुर्ले शहरात ओल्या, सुक्या, लोखंडी, काच व प्लॅस्टीक कच-याच्या स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष दिले आहे असे असताना नारायण तलाव व परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही का? शासन जलस्तोत्र विकासास सर्वप्रथम प्राधान्य दिले असे असताना नगरपरिषदेचे नारायण तलावाकडे दुर्लक्ष ही बाब गंभीर असल्याचे स्थानिक नागरीकांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)