शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

बोलघेवडेपणा केल्याने जनतेने नाकारले

By admin | Updated: November 9, 2015 23:25 IST

सतीश सावंत : प्रमोद जठारांवर केला आरोप

कणकवली : प्रमोद जठार यांनी आमदारकीच्या पाच वर्षांत फक्त बोलघेवडेपणा करत जनतेची दिशाभूल केली. नुुसत्या पोकळ घोषणा करणाऱ्या जठार यांनी प्रत्यक्षात काही न केल्यामुळे त्यांना येथील जनतेने नाकारले. त्यामुळे जठारांनी आमदार नीतेश राणे यांना सल्ला न देता आत्मपरीक्षण करावे, अशी टीका कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात सतीश सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जठार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. सतीश सावंत पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी लाटेत देशात सरकार आल्याची घमेंड केली जात होती. मात्र, अशी घमेंड करणाऱ्यांची बिहार येथील निवडणुकीत चांगलीच जिरली आहे. आता बदलेल्या वातावरणाचा आणि मोदी लाट उतरल्याचा जठार यांनी विचार करावा. आता आनंदवाडी प्रकल्पाचा पाठपुरावा केल्याचे सांगत असले तरी त्यांच्या आमदारकीच्या पाच वर्षांच्या कार्यकालात जठार यांनी देवगड-आनंदवाडी प्रकल्पाला विरोधच केला. नारायण राणे यांच्या प्रयत्नातून कासार्डे येथील एमआयडीसीसाठी जमिन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती. त्याला प्रमोद जठार यांनी विरोध केला. अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना विरोध करत जिल्ह्यातील विकास प्रक्रियेला विरोध करण्याचे काम केल्याचे सतीश सावंत म्हणाले. माजी आमदार जठार ज्या देवगड मतदारसंघातील पाणीप्रश्नाबाबत सांगत आहेत. त्या देवगड मतदारसंघात गेली २५ वर्षे भाजपाचा आमदार होता. तेथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भाजपाच्या आमदारांनी आपल्या कार्यकाळात कोणते प्रयत्न केले हे जठार यांनी सांगावे. प्रमोद जठार यांनी स्वत:च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या तोंडावर कासार्डे येथे डेअरी प्रकल्प आणला आणि आता तो बंद करण्यात आला आहे. असे दिशाभूल करण्याचे राजकारण करण्यात प्रमोद जठार यांचा हातखंडा आहे. नारायण राणेंनी जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी ठेवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्याकडून विविध प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न झाले. मात्र न सुरू झालेल्या प्रकल्पांना जठार यांच्यासारख्यांचा विरोध जबाबदार आहे. देशात १८ महिने आणि राज्यात वर्षभर युतीचे सरकार आहे. या काळात सरकारने देशातील जनतेला महागाई दिली. आमदार नीतेश राणे यांच्यावर टीका करण्यापेक्षा जिल्ह्यातील स्वत:च्या दु:स्थितीचा भाजपाने विचार करावे व मगच आमदार नीतेश राणे यांना सल्ला द्यावा, असे सतीश सावंत म्हणाले. (प्रतिनिधी)जठारांचा हास्यास्पद आरोप : सतीश सावंतनारायण राणे यांनी हॉटेल वाचवण्यासाठी गडकरी यांची भेट घेतल्याचे जठार सांगत आहेत. मूळात अशा गोष्टींना गडकरी साथ देतात का? हे जठार यांनी जाहीर करावे. रस्त्याच्या दुतर्फा राणे यांचीच जागा आहे. रस्ता कुठेही हलवला तरी त्यांचीच जागा जाणार आहे. चौपदरीकरणाच्या अटीशर्तींचे पालन करूनच हॉटेल बांधण्यात आले असल्याने आरोप हास्यास्पद असल्याचे सावंत म्हणाले.