शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बोलघेवडेपणा केल्याने जनतेने नाकारले

By admin | Updated: November 9, 2015 23:25 IST

सतीश सावंत : प्रमोद जठारांवर केला आरोप

कणकवली : प्रमोद जठार यांनी आमदारकीच्या पाच वर्षांत फक्त बोलघेवडेपणा करत जनतेची दिशाभूल केली. नुुसत्या पोकळ घोषणा करणाऱ्या जठार यांनी प्रत्यक्षात काही न केल्यामुळे त्यांना येथील जनतेने नाकारले. त्यामुळे जठारांनी आमदार नीतेश राणे यांना सल्ला न देता आत्मपरीक्षण करावे, अशी टीका कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात सतीश सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जठार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. सतीश सावंत पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी लाटेत देशात सरकार आल्याची घमेंड केली जात होती. मात्र, अशी घमेंड करणाऱ्यांची बिहार येथील निवडणुकीत चांगलीच जिरली आहे. आता बदलेल्या वातावरणाचा आणि मोदी लाट उतरल्याचा जठार यांनी विचार करावा. आता आनंदवाडी प्रकल्पाचा पाठपुरावा केल्याचे सांगत असले तरी त्यांच्या आमदारकीच्या पाच वर्षांच्या कार्यकालात जठार यांनी देवगड-आनंदवाडी प्रकल्पाला विरोधच केला. नारायण राणे यांच्या प्रयत्नातून कासार्डे येथील एमआयडीसीसाठी जमिन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती. त्याला प्रमोद जठार यांनी विरोध केला. अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना विरोध करत जिल्ह्यातील विकास प्रक्रियेला विरोध करण्याचे काम केल्याचे सतीश सावंत म्हणाले. माजी आमदार जठार ज्या देवगड मतदारसंघातील पाणीप्रश्नाबाबत सांगत आहेत. त्या देवगड मतदारसंघात गेली २५ वर्षे भाजपाचा आमदार होता. तेथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भाजपाच्या आमदारांनी आपल्या कार्यकाळात कोणते प्रयत्न केले हे जठार यांनी सांगावे. प्रमोद जठार यांनी स्वत:च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या तोंडावर कासार्डे येथे डेअरी प्रकल्प आणला आणि आता तो बंद करण्यात आला आहे. असे दिशाभूल करण्याचे राजकारण करण्यात प्रमोद जठार यांचा हातखंडा आहे. नारायण राणेंनी जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी ठेवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्याकडून विविध प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न झाले. मात्र न सुरू झालेल्या प्रकल्पांना जठार यांच्यासारख्यांचा विरोध जबाबदार आहे. देशात १८ महिने आणि राज्यात वर्षभर युतीचे सरकार आहे. या काळात सरकारने देशातील जनतेला महागाई दिली. आमदार नीतेश राणे यांच्यावर टीका करण्यापेक्षा जिल्ह्यातील स्वत:च्या दु:स्थितीचा भाजपाने विचार करावे व मगच आमदार नीतेश राणे यांना सल्ला द्यावा, असे सतीश सावंत म्हणाले. (प्रतिनिधी)जठारांचा हास्यास्पद आरोप : सतीश सावंतनारायण राणे यांनी हॉटेल वाचवण्यासाठी गडकरी यांची भेट घेतल्याचे जठार सांगत आहेत. मूळात अशा गोष्टींना गडकरी साथ देतात का? हे जठार यांनी जाहीर करावे. रस्त्याच्या दुतर्फा राणे यांचीच जागा आहे. रस्ता कुठेही हलवला तरी त्यांचीच जागा जाणार आहे. चौपदरीकरणाच्या अटीशर्तींचे पालन करूनच हॉटेल बांधण्यात आले असल्याने आरोप हास्यास्पद असल्याचे सावंत म्हणाले.