शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

आंब्रडमध्ये ऊस जमीनदोस्त

By admin | Updated: July 18, 2014 22:55 IST

तेरा हेक्टरमध्ये हानी : दहा शेतकऱ्यांचे नुकसान

कुडाळ : तालुक्यात झालेल्या जोरदार वादळवारा व मुसळधार पावसामुळे आंब्रड पंचक्रोशीतील १३ हेक्टरमधील ऊस जमीनदोस्त झाला आहे. यामुळे १० शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कुडाळ तालुक्यात गेले दोन ते तीन दिवसात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन शेती पाण्याखाली जाऊन जनतेची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे. त्याचप्रमाणे आंब्रड पंचक्रोशीमध्ये लावलेला ऊस मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंब्रड पंचक्रोशीमध्ये शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जोमाने ऊस वाढला होता. परंतु पावसात तो ऊस टिकाव धरू शकला नाही. वाढत्या वादळी वाऱ्यामुळे ऊस जमीनदोस्त झाला आहे. यामध्ये चंद्रकांत काळप, भिकाजी लाड, अरुण काबरे, वासुदेव सावंत, विजय गरूड, पांडुरंग चव्हाण, महादेव सावंत, नारायण राऊळ, भास्कर बाबाजी राऊळ, रमाकांत मुंज, पंढरी देवळी, नारायण यशवंत राऊळ, अरुण चौगुले, दत्तात्रय बंडोपंत गुरव, भास्कर परब, सचिन पुजारे, शंकर सावंत, राजेंद्र परब, रुपेश लाड या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ, मंडळ अधिकारी मधु देसाई, पूनम पालव व तलाठी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. (प्रतिनिधी) बदलत्या वातावरणाचा फटका - निर्मळ याबाबत तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ म्हणाले, सध्या पावसाची अनिश्चितता आहे. जून महिन्यात पाऊस कमी प्र्रमाणात लागल्यामुळे आणि मुबलक सूर्यप्रकाशामुळे उसाची झपाट्याने वाढ झाली. ही अकाली झालेली उसाची वाढ आणि हल्ली पडलेला जोरदार वादळी पाऊस यामुळे हा ऊस तग धरू शकला नाही आणि जमीनदोस्त झाला. ऊस पिकात घट होणार पावसामुळे जमीनदोस्त झालेल्या ऊस पिकाला आता पाळे फु टणार असून त्यामुळे कापणीच्या वेळच्या उसापासून मिळणाऱ्या उत्पन्नात २५ ते ३० टक्के एवढ्या प्रमाणात घट होणार असल्याचे मत कोल्हापूरच्या ऊस पीक तज्ज्ञांनी व्यक्त केल्याची माहिती आर. पी. निर्मळ यांनी दिली. पावसामुळे पडलेल्या उसाला पाळे फुटून त्याची वाढ खुंटणार आहे. त्यामुळे कापणीच्यावेळी या उसापासून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार असून शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याचे त्यांचे मत आहे. अन्यथा येथील शेतकरी पूर्णपणे कोलमडणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.