शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आंब्रडमध्ये ऊस जमीनदोस्त

By admin | Updated: July 18, 2014 22:55 IST

तेरा हेक्टरमध्ये हानी : दहा शेतकऱ्यांचे नुकसान

कुडाळ : तालुक्यात झालेल्या जोरदार वादळवारा व मुसळधार पावसामुळे आंब्रड पंचक्रोशीतील १३ हेक्टरमधील ऊस जमीनदोस्त झाला आहे. यामुळे १० शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कुडाळ तालुक्यात गेले दोन ते तीन दिवसात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन शेती पाण्याखाली जाऊन जनतेची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे. त्याचप्रमाणे आंब्रड पंचक्रोशीमध्ये लावलेला ऊस मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंब्रड पंचक्रोशीमध्ये शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जोमाने ऊस वाढला होता. परंतु पावसात तो ऊस टिकाव धरू शकला नाही. वाढत्या वादळी वाऱ्यामुळे ऊस जमीनदोस्त झाला आहे. यामध्ये चंद्रकांत काळप, भिकाजी लाड, अरुण काबरे, वासुदेव सावंत, विजय गरूड, पांडुरंग चव्हाण, महादेव सावंत, नारायण राऊळ, भास्कर बाबाजी राऊळ, रमाकांत मुंज, पंढरी देवळी, नारायण यशवंत राऊळ, अरुण चौगुले, दत्तात्रय बंडोपंत गुरव, भास्कर परब, सचिन पुजारे, शंकर सावंत, राजेंद्र परब, रुपेश लाड या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ, मंडळ अधिकारी मधु देसाई, पूनम पालव व तलाठी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. (प्रतिनिधी) बदलत्या वातावरणाचा फटका - निर्मळ याबाबत तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ म्हणाले, सध्या पावसाची अनिश्चितता आहे. जून महिन्यात पाऊस कमी प्र्रमाणात लागल्यामुळे आणि मुबलक सूर्यप्रकाशामुळे उसाची झपाट्याने वाढ झाली. ही अकाली झालेली उसाची वाढ आणि हल्ली पडलेला जोरदार वादळी पाऊस यामुळे हा ऊस तग धरू शकला नाही आणि जमीनदोस्त झाला. ऊस पिकात घट होणार पावसामुळे जमीनदोस्त झालेल्या ऊस पिकाला आता पाळे फु टणार असून त्यामुळे कापणीच्या वेळच्या उसापासून मिळणाऱ्या उत्पन्नात २५ ते ३० टक्के एवढ्या प्रमाणात घट होणार असल्याचे मत कोल्हापूरच्या ऊस पीक तज्ज्ञांनी व्यक्त केल्याची माहिती आर. पी. निर्मळ यांनी दिली. पावसामुळे पडलेल्या उसाला पाळे फुटून त्याची वाढ खुंटणार आहे. त्यामुळे कापणीच्यावेळी या उसापासून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार असून शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याचे त्यांचे मत आहे. अन्यथा येथील शेतकरी पूर्णपणे कोलमडणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.