शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आंब्रडमध्ये ऊस जमीनदोस्त

By admin | Updated: July 18, 2014 22:55 IST

तेरा हेक्टरमध्ये हानी : दहा शेतकऱ्यांचे नुकसान

कुडाळ : तालुक्यात झालेल्या जोरदार वादळवारा व मुसळधार पावसामुळे आंब्रड पंचक्रोशीतील १३ हेक्टरमधील ऊस जमीनदोस्त झाला आहे. यामुळे १० शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कुडाळ तालुक्यात गेले दोन ते तीन दिवसात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन शेती पाण्याखाली जाऊन जनतेची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे. त्याचप्रमाणे आंब्रड पंचक्रोशीमध्ये लावलेला ऊस मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंब्रड पंचक्रोशीमध्ये शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जोमाने ऊस वाढला होता. परंतु पावसात तो ऊस टिकाव धरू शकला नाही. वाढत्या वादळी वाऱ्यामुळे ऊस जमीनदोस्त झाला आहे. यामध्ये चंद्रकांत काळप, भिकाजी लाड, अरुण काबरे, वासुदेव सावंत, विजय गरूड, पांडुरंग चव्हाण, महादेव सावंत, नारायण राऊळ, भास्कर बाबाजी राऊळ, रमाकांत मुंज, पंढरी देवळी, नारायण यशवंत राऊळ, अरुण चौगुले, दत्तात्रय बंडोपंत गुरव, भास्कर परब, सचिन पुजारे, शंकर सावंत, राजेंद्र परब, रुपेश लाड या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ, मंडळ अधिकारी मधु देसाई, पूनम पालव व तलाठी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. (प्रतिनिधी) बदलत्या वातावरणाचा फटका - निर्मळ याबाबत तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ म्हणाले, सध्या पावसाची अनिश्चितता आहे. जून महिन्यात पाऊस कमी प्र्रमाणात लागल्यामुळे आणि मुबलक सूर्यप्रकाशामुळे उसाची झपाट्याने वाढ झाली. ही अकाली झालेली उसाची वाढ आणि हल्ली पडलेला जोरदार वादळी पाऊस यामुळे हा ऊस तग धरू शकला नाही आणि जमीनदोस्त झाला. ऊस पिकात घट होणार पावसामुळे जमीनदोस्त झालेल्या ऊस पिकाला आता पाळे फु टणार असून त्यामुळे कापणीच्या वेळच्या उसापासून मिळणाऱ्या उत्पन्नात २५ ते ३० टक्के एवढ्या प्रमाणात घट होणार असल्याचे मत कोल्हापूरच्या ऊस पीक तज्ज्ञांनी व्यक्त केल्याची माहिती आर. पी. निर्मळ यांनी दिली. पावसामुळे पडलेल्या उसाला पाळे फुटून त्याची वाढ खुंटणार आहे. त्यामुळे कापणीच्यावेळी या उसापासून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार असून शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याचे त्यांचे मत आहे. अन्यथा येथील शेतकरी पूर्णपणे कोलमडणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.