शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पारकरांनी प्रसिद्धीसाठी राणेंवर टीका करू नये : समीर नलावडे यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 15:43 IST

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला कोरोनामुळे त्रास होऊ नये म्हणून आमदार नीतेश राणे यांनीच सामाजिक भान राखत अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. या काळात आता टीका करणारे संदेश पारकर कुठे बैठक घेत होते ते कणकवलीवासीयांना माहिती आहे. त्यामुळे नीतेश राणेंवर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देपारकरांनी प्रसिद्धीसाठी राणेंवर टीका करू नये : समीर नलावडे यांचा टोला नीतेश राणे यांनी सामाजिक भान राखत राबविल्या उपाययोजना

कणकवली : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला कोरोनामुळे त्रास होऊ नये म्हणून आमदार नीतेश राणे यांनीच सामाजिक भान राखत अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. या काळात आता टीका करणारे संदेश पारकर कुठे बैठक घेत होते ते कणकवलीवासीयांना माहिती आहे. त्यामुळे नीतेश राणेंवर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला आहे.संदेश पारकर यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला नलावडे यांनी उत्तर दिले. त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हावासीय कोरोनापासून दूर रहावेत यासाठी आमदार नीतेश राणे यांनी अनेक उपक्रम व उपाययोजना राबविल्या. जिल्हावासीयांच्या आरोग्याला प्राधान्य देत वेळोवेळी प्रशासनाला सूचनाही केल्या. साहित्य वाटप हे सर्व नीतेश राणे यांनी स्वखर्चातून केले.राज्य सरकार कोरोना रोखण्यासाठी सिंधुदुर्गाला एकही दमडी देत नसताना नीतेश राणे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली. पण सत्ताधारी पक्षात असलेले पारकर हे जनतेच्या काळजीपेक्षा आपल्या बैठकांमध्ये मग्न होते. त्यांच्या बैठका कुठे चालायच्या ते कणकवली शहरातील जनता जाणते. त्यामुळे राणेंवर टीका केली की प्रसिद्धी मिळते म्हणून पारकर यांचा हा खटाटोप सुरू आहे.

पारकर यांनी गेल्या अडीच महिन्यात असा कोणता सामाजिक उपक्रम राबविला किंवा कोरोनाला रोखण्यासाठी काय केले ते जाहीर करावे. शिवसेनेच्या नेत्यांच्या पदराआड राहून प्रसिद्धीत राहण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. कोरोना काळात जनतेचे हित जपण्यापेक्षा स्वत:च्या हिताचा जास्त विचार पारकर यांनी केला.ज्या कणकवली शहरातील जनतेने त्यांना सरपंच ते नगराध्यक्षपदापर्यंत पदे दिली त्या जनतेसाठी पारकर यांनी आतापर्यंत काय केले ? साधे मास्क वाटपही स्वखर्चातून त्यांना करता आले नाही. किंवा शासनामार्फतही कोणताही निधी कोरोना उपाययोजनांसाठी पारकर यांनी आणला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.पारकरांकडून जबाबदारीची अपेक्षा ठेवणे चुकीचेकोरोनाच्या काळात पारकर कणकवली शहरात खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे पारकर यांच्या मनात शहरवासीयांच्या आरोग्याची किती काळजी आहे हे दिसून येते. अशा स्थितीत पारकर यांच्याकडून जबाबदारीची अपेक्षा ठेवणे ही चुकीचेच आहे, असेही नलावडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्गSandesh Parkarसंदेश पारकरNilesh Raneनिलेश राणे