शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पारकरांनी प्रसिद्धीसाठी राणेंवर टीका करू नये : समीर नलावडे यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 15:43 IST

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला कोरोनामुळे त्रास होऊ नये म्हणून आमदार नीतेश राणे यांनीच सामाजिक भान राखत अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. या काळात आता टीका करणारे संदेश पारकर कुठे बैठक घेत होते ते कणकवलीवासीयांना माहिती आहे. त्यामुळे नीतेश राणेंवर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देपारकरांनी प्रसिद्धीसाठी राणेंवर टीका करू नये : समीर नलावडे यांचा टोला नीतेश राणे यांनी सामाजिक भान राखत राबविल्या उपाययोजना

कणकवली : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला कोरोनामुळे त्रास होऊ नये म्हणून आमदार नीतेश राणे यांनीच सामाजिक भान राखत अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. या काळात आता टीका करणारे संदेश पारकर कुठे बैठक घेत होते ते कणकवलीवासीयांना माहिती आहे. त्यामुळे नीतेश राणेंवर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला आहे.संदेश पारकर यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला नलावडे यांनी उत्तर दिले. त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हावासीय कोरोनापासून दूर रहावेत यासाठी आमदार नीतेश राणे यांनी अनेक उपक्रम व उपाययोजना राबविल्या. जिल्हावासीयांच्या आरोग्याला प्राधान्य देत वेळोवेळी प्रशासनाला सूचनाही केल्या. साहित्य वाटप हे सर्व नीतेश राणे यांनी स्वखर्चातून केले.राज्य सरकार कोरोना रोखण्यासाठी सिंधुदुर्गाला एकही दमडी देत नसताना नीतेश राणे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली. पण सत्ताधारी पक्षात असलेले पारकर हे जनतेच्या काळजीपेक्षा आपल्या बैठकांमध्ये मग्न होते. त्यांच्या बैठका कुठे चालायच्या ते कणकवली शहरातील जनता जाणते. त्यामुळे राणेंवर टीका केली की प्रसिद्धी मिळते म्हणून पारकर यांचा हा खटाटोप सुरू आहे.

पारकर यांनी गेल्या अडीच महिन्यात असा कोणता सामाजिक उपक्रम राबविला किंवा कोरोनाला रोखण्यासाठी काय केले ते जाहीर करावे. शिवसेनेच्या नेत्यांच्या पदराआड राहून प्रसिद्धीत राहण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. कोरोना काळात जनतेचे हित जपण्यापेक्षा स्वत:च्या हिताचा जास्त विचार पारकर यांनी केला.ज्या कणकवली शहरातील जनतेने त्यांना सरपंच ते नगराध्यक्षपदापर्यंत पदे दिली त्या जनतेसाठी पारकर यांनी आतापर्यंत काय केले ? साधे मास्क वाटपही स्वखर्चातून त्यांना करता आले नाही. किंवा शासनामार्फतही कोणताही निधी कोरोना उपाययोजनांसाठी पारकर यांनी आणला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.पारकरांकडून जबाबदारीची अपेक्षा ठेवणे चुकीचेकोरोनाच्या काळात पारकर कणकवली शहरात खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे पारकर यांच्या मनात शहरवासीयांच्या आरोग्याची किती काळजी आहे हे दिसून येते. अशा स्थितीत पारकर यांच्याकडून जबाबदारीची अपेक्षा ठेवणे ही चुकीचेच आहे, असेही नलावडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्गSandesh Parkarसंदेश पारकरNilesh Raneनिलेश राणे