शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या कारवाईने संभ्रम

By admin | Updated: August 13, 2014 23:31 IST

बेकायदा वृक्षतोड : जप्त केलेला लाकूडसाठा महिन्याभरात गायब

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील रांगव येथे धरण परिसरात बेकायदा वृक्षतोड होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्यानंतर १५ जानेवारी २०१४ रोजी वन विभागाकडून या परिसरात ४० घनमीटर म्हणजे जवळजवळ १६ ट्रक एवढा मोठा लाकूडसाठा जप्त करण्यात आला होता. मात्र, आठ महिन्यांनंतरही वन विभागाकडून कारवाई चालू असल्याचे सांगण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेला लाकूडसाठा मात्र जप्तीनंतर महिनाभरातच गायब असल्याचे समोर येत आहे. यामुळे वन विभागाच्या कारवाईबाबत संभ्रम निर्माण होत आहे.संगमेश्वर तालुक्यातील रांगव हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर झाला आहे. मात्र, या परिसरात लघुपाटबंधारे विभागाच्या धरण भागात वृक्षाची बेसुमार कत्तल होत असल्याचे लोकमतमधून उघड झाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने १६ ट्रक एवढा लाकूड साठा जप्त केला होता. लोकमतने हा प्रश्न उजेडात आणला आणि त्यामुळे वन विभाग खडबडून जागा झाला. या भागातील वृक्षतोड ही १६ ट्रकची सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र शेकडो ट्रक लाकूड या भागातून नेण्यात आले होते. १५ ते २० एकराचा हा परिसर उजाड करण्यात आला होता. वृक्षांची एवढी बेसुमार कत्तल होत असताना वन विभागाला याची पुसटशी कल्पनाही नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. लोकमतच्या दणक्यानंतर वन विभागाने या भागात फळबाग लागवडीसाठी ४८ झाडांची तोड करण्यास परवानगी दिल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानंतर हा लाकूडसाठा कडवई व रांगव अशा दोन ठिकाणी जप्त करुन संबंधित पोलीसपाटलांच्या ताब्यात देण्यात आला होता. मात्र, जप्तीनंतर काही दिवसांतच हा लाकूडसाठा संबंधित व्यापाऱ्यांकडून लंपास करण्यात आला होता.मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनीही वन विभागाकडे तक्रार दाखल केली होती. परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी यांनी १७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या लेखी माहितीनुसार पंचनाम्याप्रमाणे संबंधित खातेदार व हिस्सेदार यांचे जाबजबाब नोंदीचे काम वनपाल स्तरावर चालू असून, लाकूडसाठा जप्तस्थितीत असल्याचे स्पष्ट केले होते.पर्यावरणदृृष्ट्या संवेदनशील भागात आणि धरण परिसरात अशा प्रकारची बेकायदा वृक्षतोड झाली. मात्र, याबाबत तक्रार करून आठ महिने उलटल्यानंतरही कारवाईची दिशा स्पष्ट होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत परिक्षेत्र वन अधिकारी अशोक लाड यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण प्रांताधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या परिसरात वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी नसल्याचेही लाड यांनी स्पष्ट केले आहे.कारवाई होत नसल्याने बडे लाकूड व्यापारी वन कायदा पायदळी तुडवत असल्याचे दिसून येत आहे. वन विभागाच्या परवानगीनंतर करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीवर काम करणारे कामगार हेही स्थानिक असणे गरजेचे आहे. त्यांचे जॉबकार्ड असणे आवश्यक असताना या सर्व नियमांकडे वन खात्याचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत वन विभाग मात्र फारसा गंभीर नसल्याने एकूणच या कारवाईच्या भोवतीही संशयाचे जाळे निर्माण झाले आहे. (वार्ताहर)कारवाईची गाडी अडली कुठे ?पंचयादीबाबत संभ्रमपंचनाम्यानुसार ही वृक्षतोड ज्या परिसरात झाली आहे, त्यातील ७९/४, ७९/१ या सातबारावरुन या भागात रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड केली असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रत्यक्षात मात्र वृक्षतोड झालेल्या भागात काजू किंवा इतर कोणतेही फळझाड दिसून येत नाही, तर संपूर्ण परिसर उजाड झाल्याचे दिसून येते. यामुळे या संपूर्ण पंचयादीबाबतच संभ्रम निर्माण होत आहे.