शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामा अद्याप सुरुच

By admin | Updated: January 20, 2015 23:41 IST

काजू बाग आग प्रकरण : डिंगणेतील नुकसानीच्या आकड्याबाबत संभ्रमच

बांदा : डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवर टाकवाडी परिसरात सोमवारी रात्री लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत हजारो काजू कलमे जळाली. महसूल यंत्रणेकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.डिंगणे-टाकवाडी परिसरात काल रात्री उशिरा माळरानाला आग लागली. माळरानावर गवत मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचा भडका उडाला. या परिसरात डिंगणे गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने काजू बागायती उभी केली आहे. ही काजू बागायत आगीच्या भक्षस्थानी पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. डिंगणे येथील शशिकांत पोखरे, सुगंधा पोखरे, वामन शिरोडकर, प्रभाकर शिरोडकर, एकनाथ सावंत, सोमा सावंत या शेतकऱ्यांच्या काजू कलम बागायती आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यामध्ये हजारे काजू कलमे तसेच इतर जंगली झाडे जळून खाक झाली. आग शेकडो एकर परिसरात पसरल्याने आग विझविणे स्थानिकांसाठी कठीण बनले. टाकवाडी, धनगरवाडी, भोमवाडी हा परिसर वस्तीपासून बराच दूर असल्याने आग लागल्याचे प्रथम लक्षात आले नाही.रात्रो उशिरा डिंगणे गावातील बापू सावंत, दिनेश सावंत, आत्माराम सावंत, फटू सावंत, जयेश सावंत, विलास सावंत, माजी पोलीस पाटील यशवंत सावंत, रामचंद्र सावंत, सुदर्शन सावंत, सोमा सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी व मातीच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, माळरानावर गवत असल्याने आगीने पूर्ण बागायतीला वेढले. आगडोंब उसळल्याने आग विझविणे अशक्य बनले. याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने आग विझविण्यासाठी पाणी नेणे शक्य नव्हते. ग्रामस्थ रात्रभर आग विझविण्याचा प्रयत्न करत होते.दरम्यान, गतवर्षी देखील याच ठिकाणी रात्रीच्या सुमारास आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी महसूल यंत्रणेकडून पंचनामा करण्यात येऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी याठिकाणी आग लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (प्र्रतिनिधी)हजारो काजू कलमे जळालीमंगळवारी सकाळी डेगवे तलाठी किरण गझीनकर, कृषी सहाय्यक ए. एल. परब, कोतवाल संतोष नाईक यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा सुरू केला. मात्र, आगीत जळालेले क्षेत्र मोठे असल्याने पंचनामा करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. या आगीत शेतकऱ्यांची हजारो काजू कलमे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.