शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

पंचनामा अद्याप सुरुच

By admin | Updated: January 20, 2015 23:41 IST

काजू बाग आग प्रकरण : डिंगणेतील नुकसानीच्या आकड्याबाबत संभ्रमच

बांदा : डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवर टाकवाडी परिसरात सोमवारी रात्री लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत हजारो काजू कलमे जळाली. महसूल यंत्रणेकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.डिंगणे-टाकवाडी परिसरात काल रात्री उशिरा माळरानाला आग लागली. माळरानावर गवत मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचा भडका उडाला. या परिसरात डिंगणे गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने काजू बागायती उभी केली आहे. ही काजू बागायत आगीच्या भक्षस्थानी पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. डिंगणे येथील शशिकांत पोखरे, सुगंधा पोखरे, वामन शिरोडकर, प्रभाकर शिरोडकर, एकनाथ सावंत, सोमा सावंत या शेतकऱ्यांच्या काजू कलम बागायती आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यामध्ये हजारे काजू कलमे तसेच इतर जंगली झाडे जळून खाक झाली. आग शेकडो एकर परिसरात पसरल्याने आग विझविणे स्थानिकांसाठी कठीण बनले. टाकवाडी, धनगरवाडी, भोमवाडी हा परिसर वस्तीपासून बराच दूर असल्याने आग लागल्याचे प्रथम लक्षात आले नाही.रात्रो उशिरा डिंगणे गावातील बापू सावंत, दिनेश सावंत, आत्माराम सावंत, फटू सावंत, जयेश सावंत, विलास सावंत, माजी पोलीस पाटील यशवंत सावंत, रामचंद्र सावंत, सुदर्शन सावंत, सोमा सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी व मातीच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, माळरानावर गवत असल्याने आगीने पूर्ण बागायतीला वेढले. आगडोंब उसळल्याने आग विझविणे अशक्य बनले. याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने आग विझविण्यासाठी पाणी नेणे शक्य नव्हते. ग्रामस्थ रात्रभर आग विझविण्याचा प्रयत्न करत होते.दरम्यान, गतवर्षी देखील याच ठिकाणी रात्रीच्या सुमारास आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी महसूल यंत्रणेकडून पंचनामा करण्यात येऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी याठिकाणी आग लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (प्र्रतिनिधी)हजारो काजू कलमे जळालीमंगळवारी सकाळी डेगवे तलाठी किरण गझीनकर, कृषी सहाय्यक ए. एल. परब, कोतवाल संतोष नाईक यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा सुरू केला. मात्र, आगीत जळालेले क्षेत्र मोठे असल्याने पंचनामा करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. या आगीत शेतकऱ्यांची हजारो काजू कलमे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.