शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पंचनामा अद्याप सुरुच

By admin | Updated: January 20, 2015 23:41 IST

काजू बाग आग प्रकरण : डिंगणेतील नुकसानीच्या आकड्याबाबत संभ्रमच

बांदा : डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवर टाकवाडी परिसरात सोमवारी रात्री लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत हजारो काजू कलमे जळाली. महसूल यंत्रणेकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.डिंगणे-टाकवाडी परिसरात काल रात्री उशिरा माळरानाला आग लागली. माळरानावर गवत मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचा भडका उडाला. या परिसरात डिंगणे गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने काजू बागायती उभी केली आहे. ही काजू बागायत आगीच्या भक्षस्थानी पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. डिंगणे येथील शशिकांत पोखरे, सुगंधा पोखरे, वामन शिरोडकर, प्रभाकर शिरोडकर, एकनाथ सावंत, सोमा सावंत या शेतकऱ्यांच्या काजू कलम बागायती आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यामध्ये हजारे काजू कलमे तसेच इतर जंगली झाडे जळून खाक झाली. आग शेकडो एकर परिसरात पसरल्याने आग विझविणे स्थानिकांसाठी कठीण बनले. टाकवाडी, धनगरवाडी, भोमवाडी हा परिसर वस्तीपासून बराच दूर असल्याने आग लागल्याचे प्रथम लक्षात आले नाही.रात्रो उशिरा डिंगणे गावातील बापू सावंत, दिनेश सावंत, आत्माराम सावंत, फटू सावंत, जयेश सावंत, विलास सावंत, माजी पोलीस पाटील यशवंत सावंत, रामचंद्र सावंत, सुदर्शन सावंत, सोमा सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी व मातीच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, माळरानावर गवत असल्याने आगीने पूर्ण बागायतीला वेढले. आगडोंब उसळल्याने आग विझविणे अशक्य बनले. याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने आग विझविण्यासाठी पाणी नेणे शक्य नव्हते. ग्रामस्थ रात्रभर आग विझविण्याचा प्रयत्न करत होते.दरम्यान, गतवर्षी देखील याच ठिकाणी रात्रीच्या सुमारास आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी महसूल यंत्रणेकडून पंचनामा करण्यात येऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी याठिकाणी आग लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (प्र्रतिनिधी)हजारो काजू कलमे जळालीमंगळवारी सकाळी डेगवे तलाठी किरण गझीनकर, कृषी सहाय्यक ए. एल. परब, कोतवाल संतोष नाईक यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा सुरू केला. मात्र, आगीत जळालेले क्षेत्र मोठे असल्याने पंचनामा करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. या आगीत शेतकऱ्यांची हजारो काजू कलमे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.