शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामा अद्याप सुरुच

By admin | Updated: January 20, 2015 23:41 IST

काजू बाग आग प्रकरण : डिंगणेतील नुकसानीच्या आकड्याबाबत संभ्रमच

बांदा : डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवर टाकवाडी परिसरात सोमवारी रात्री लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत हजारो काजू कलमे जळाली. महसूल यंत्रणेकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.डिंगणे-टाकवाडी परिसरात काल रात्री उशिरा माळरानाला आग लागली. माळरानावर गवत मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचा भडका उडाला. या परिसरात डिंगणे गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने काजू बागायती उभी केली आहे. ही काजू बागायत आगीच्या भक्षस्थानी पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. डिंगणे येथील शशिकांत पोखरे, सुगंधा पोखरे, वामन शिरोडकर, प्रभाकर शिरोडकर, एकनाथ सावंत, सोमा सावंत या शेतकऱ्यांच्या काजू कलम बागायती आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यामध्ये हजारे काजू कलमे तसेच इतर जंगली झाडे जळून खाक झाली. आग शेकडो एकर परिसरात पसरल्याने आग विझविणे स्थानिकांसाठी कठीण बनले. टाकवाडी, धनगरवाडी, भोमवाडी हा परिसर वस्तीपासून बराच दूर असल्याने आग लागल्याचे प्रथम लक्षात आले नाही.रात्रो उशिरा डिंगणे गावातील बापू सावंत, दिनेश सावंत, आत्माराम सावंत, फटू सावंत, जयेश सावंत, विलास सावंत, माजी पोलीस पाटील यशवंत सावंत, रामचंद्र सावंत, सुदर्शन सावंत, सोमा सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी व मातीच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, माळरानावर गवत असल्याने आगीने पूर्ण बागायतीला वेढले. आगडोंब उसळल्याने आग विझविणे अशक्य बनले. याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने आग विझविण्यासाठी पाणी नेणे शक्य नव्हते. ग्रामस्थ रात्रभर आग विझविण्याचा प्रयत्न करत होते.दरम्यान, गतवर्षी देखील याच ठिकाणी रात्रीच्या सुमारास आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी महसूल यंत्रणेकडून पंचनामा करण्यात येऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी याठिकाणी आग लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (प्र्रतिनिधी)हजारो काजू कलमे जळालीमंगळवारी सकाळी डेगवे तलाठी किरण गझीनकर, कृषी सहाय्यक ए. एल. परब, कोतवाल संतोष नाईक यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा सुरू केला. मात्र, आगीत जळालेले क्षेत्र मोठे असल्याने पंचनामा करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. या आगीत शेतकऱ्यांची हजारो काजू कलमे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.