शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

पंचतंत्र अन् इसापनिती

By admin | Updated: November 20, 2014 00:23 IST

बांधकाम कामगार : १ लाख मुलांना मिळणार पुस्तकांचा संच

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -राज्यात इमारत व इतर बांधकाम कामगारांची १ लाख मुले आता स्पीकवेल मराठी, पंचतंत्र व इसापनिती शिकणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मुलाला ९ पुस्तकांचा प्रत्येकी हजार रुपये किमतीचा संच दिला जाणार असून, त्याचे वाटप रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे या महत्त्वाकांक्षी योजनेची पुस्तके नवनीत एज्युकेशन लिमिटेड, मुंबई या कंपनीकडून घेण्यात आली असून, त्यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या मंडळातर्फे ३० जुलै २०१४ रोजीच्या बैठकीत इमारत बांधकाम कामगारांच्या पाल्यास प्रत्येकी हजार रुपयांचा शैक्षणिक उपयोगाच्या नऊ पुस्तकांचा संच भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या योजनेची कार्यवाही आता सुरू झाली आहे. या पुस्तक खरेदीवर कंपनीने १० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे १११५ रुपयांचा हा नऊ पुस्तकांचा संच मंडळाला १००३ रुपये ५० पैसे किमतीला प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत कामगारांच्या एक लाख मुलांना जी ९ पुस्तके दिली जात आहेत, त्यामध्ये स्पीकवेल मराठी, जनरल नॉलेज मराठी, नवनीत अ‍ॅडव्हान्स डिक्शनरी, पंचतंत्र बूक (मराठी), पंचतंत्र बुक २ (मराठी), पंचतंत्र बुक ३ (मराठी), इसापनिती बुक १ (मराठी), इसापनिती बुक २ (मराठी), इसापनिती बुक ३ (मराठी) आदी विविध पुस्तकांचा समावेश आहे. बांधकाम कामगारांची मुले वाचनापासून कायम पारखी असतात. त्यामुळे ही महत्वाकांक्षी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचा एक लाख मुलांना लाभ देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.संचानंतर हवे मूल्यमापनयोजनेतील पुस्तकांचे संच जरी कामगारांच्या मुलांना देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात त्या मुलांनी या पुस्तक संचाचा अभ्यास करून लाभ घेतला आहे काय, त्यांच्या ज्ञानात भर पडली आहे काय, याबाबतची तपासणी होणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. केवळ संच दिले व त्या पुस्तकांचा गठ्ठा तसाच ठेवला गेला तर या ज्ञानवृध्दिच्या योजनेचा उद्देशच सफल होणार नाही. त्यामुळे हे संच दिल्यानंतर त्याबाबत प्रबोधन करण्याची व त्या मुलांनी त्या पुस्तकांचे वाचन केले काय, त्यातून त्यांना काय लाभ झाला, याच्या मूल्यमापनाची गरज आहे.दहा कोटींचा खर्चरत्नागिरीतील ४२०० मुलांना योजनेचा लाभया योजनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांच्या ४२०० पेक्षा अधिक शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना हा शैक्षणिक पुस्तकांचा संच दिला जात आहे. तेवढे संच कामगार आयुक्त कार्यालयाकडे आल्याची माहिती कामगार उपायुक्त अनिल गुरव यांनी दिली. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यास याचा अधिक लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील कामगारांच्या मुलांसाठी दिलेल्या पुस्तकांसाठी ४२ लाख रुपये खर्च आला आहे. वितरणावर मंडळाची नजर...शासनाच्या योजनांमागील उद्देश नेहमीच चांगला असतो. परंतु त्या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या झाली नाही तर योजना फसते. या योजनेचे तसे होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्याला किती पुस्तक संच मिळाले, त्याचे वितरण कसे झाले, याबाबतची तपशीलवार माहितीच मंडळाने मागितली आहे. त्यामुळे शिस्तबध्दतेने या संचांचे वितरण कामगारांच्या मुलांना करावे लागणार आहे.