शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

पंचतंत्र अन् इसापनिती

By admin | Updated: November 20, 2014 00:23 IST

बांधकाम कामगार : १ लाख मुलांना मिळणार पुस्तकांचा संच

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -राज्यात इमारत व इतर बांधकाम कामगारांची १ लाख मुले आता स्पीकवेल मराठी, पंचतंत्र व इसापनिती शिकणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मुलाला ९ पुस्तकांचा प्रत्येकी हजार रुपये किमतीचा संच दिला जाणार असून, त्याचे वाटप रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे या महत्त्वाकांक्षी योजनेची पुस्तके नवनीत एज्युकेशन लिमिटेड, मुंबई या कंपनीकडून घेण्यात आली असून, त्यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या मंडळातर्फे ३० जुलै २०१४ रोजीच्या बैठकीत इमारत बांधकाम कामगारांच्या पाल्यास प्रत्येकी हजार रुपयांचा शैक्षणिक उपयोगाच्या नऊ पुस्तकांचा संच भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या योजनेची कार्यवाही आता सुरू झाली आहे. या पुस्तक खरेदीवर कंपनीने १० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे १११५ रुपयांचा हा नऊ पुस्तकांचा संच मंडळाला १००३ रुपये ५० पैसे किमतीला प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत कामगारांच्या एक लाख मुलांना जी ९ पुस्तके दिली जात आहेत, त्यामध्ये स्पीकवेल मराठी, जनरल नॉलेज मराठी, नवनीत अ‍ॅडव्हान्स डिक्शनरी, पंचतंत्र बूक (मराठी), पंचतंत्र बुक २ (मराठी), पंचतंत्र बुक ३ (मराठी), इसापनिती बुक १ (मराठी), इसापनिती बुक २ (मराठी), इसापनिती बुक ३ (मराठी) आदी विविध पुस्तकांचा समावेश आहे. बांधकाम कामगारांची मुले वाचनापासून कायम पारखी असतात. त्यामुळे ही महत्वाकांक्षी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचा एक लाख मुलांना लाभ देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.संचानंतर हवे मूल्यमापनयोजनेतील पुस्तकांचे संच जरी कामगारांच्या मुलांना देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात त्या मुलांनी या पुस्तक संचाचा अभ्यास करून लाभ घेतला आहे काय, त्यांच्या ज्ञानात भर पडली आहे काय, याबाबतची तपासणी होणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. केवळ संच दिले व त्या पुस्तकांचा गठ्ठा तसाच ठेवला गेला तर या ज्ञानवृध्दिच्या योजनेचा उद्देशच सफल होणार नाही. त्यामुळे हे संच दिल्यानंतर त्याबाबत प्रबोधन करण्याची व त्या मुलांनी त्या पुस्तकांचे वाचन केले काय, त्यातून त्यांना काय लाभ झाला, याच्या मूल्यमापनाची गरज आहे.दहा कोटींचा खर्चरत्नागिरीतील ४२०० मुलांना योजनेचा लाभया योजनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांच्या ४२०० पेक्षा अधिक शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना हा शैक्षणिक पुस्तकांचा संच दिला जात आहे. तेवढे संच कामगार आयुक्त कार्यालयाकडे आल्याची माहिती कामगार उपायुक्त अनिल गुरव यांनी दिली. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यास याचा अधिक लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील कामगारांच्या मुलांसाठी दिलेल्या पुस्तकांसाठी ४२ लाख रुपये खर्च आला आहे. वितरणावर मंडळाची नजर...शासनाच्या योजनांमागील उद्देश नेहमीच चांगला असतो. परंतु त्या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या झाली नाही तर योजना फसते. या योजनेचे तसे होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्याला किती पुस्तक संच मिळाले, त्याचे वितरण कसे झाले, याबाबतची तपशीलवार माहितीच मंडळाने मागितली आहे. त्यामुळे शिस्तबध्दतेने या संचांचे वितरण कामगारांच्या मुलांना करावे लागणार आहे.