शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तलाठ्यांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: May 15, 2015 23:33 IST

मुंबरकरांवरील कारवाई मागे घ्या : जिल्ह्यातील सर्व कर्मचारी एकवटले

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी, मंडल अधिकारी आणि कोतवालांचे शुक्रवारी जिल्हाधिकारी भवनासमोर लक्षणीय धरणे आंदोलन झाले. निलंबित मंडल अधिकारी मुंबरकर यांना पुन्हा रुजू करा, या मागणीसाठी ३५० कर्मचारी एकवटल्याने या कर्मचाऱ्यांची संघटनात्मक ताकद दिसली.रत्नागिरी- सिंधुदुर्ग तलाठी संघाच्या नेतृत्वाखाली ६ मेपासून जिल्ह्यातील तलाठी, मंडल अधिकारी आणि कोतवालांचे आंदोलन सुरू झाले आहे. आचरेचे प्रभारी मंडल अधिकारी बी. जे. मुंबरकर यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई अन्यायकारक आहे. वाळू किंवा गौणखनिज तसेच अन्य कोणत्याही प्रकारचे गुन्हे मंडल अधिकारी, तलाठी यांच्यामार्फत दाखल करण्यात येऊ नयेत, अशी मागणी या संघटनेने शासनाकडे पूर्वीच केलेली आहे. ज्या दिवशी वाळूची चोरी झाल्याची घटना घडली त्या दिवशी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे नायब तहसीलदारांनी हे गुन्हे दाखल करायला हवे होते. तसे न करता मंडल अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावरच १ मे रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने तलाठी, मंडल अधिकारी व कोतवाल या सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे, असेही या संघटनेचे अध्यक्ष एस. व्ही. गवस यांनी स्पष्ट केले आहे.राज्य शासनाने सन २०१० मध्ये परिपत्रक काढले आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वाळू किंवा गौणखनिज उत्खननाकरिता पर्यायांची निर्मिती कशाप्रकारे असावी? पथक प्रमुख कोण असावा? गुन्हे कोणी दाखल करावेत? हे त्या परिपत्रकात नमूद आहे. मंडल अधिकाऱ्यांनी हे गुन्हे दाखल करू नयेत, असे असतानाही वरिष्ठ अधिकारी खात्यांच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडत आहेत ही खेदाची बाब आहे, असेही मत रत्नागिरी-सिंधुदुर्ग तलाठी संघटनेचे संघटनाध्यक्ष एस. व्ही. गवस यांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)...तर बेमुदत सामूहिक रजेवरजिल्हा महसूल प्रशासनाने त्या मंडल अधिकाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडल अधिकारी आणि कोतवाल १६ मेपासून सामूहिक रजेवर जातील व पूर्णपणे कामबंद करतील, असाही इशारा या संघटनेने जाहीर केला आहे. महसुली काम ठप्पशुक्रवारी जिल्हाधिकारी भवनासमोर झालेल्या या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील ३५० कर्मचारी, तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी सहभाग घेतल्याने गावातील महसुली कामकाज ठप्प झाले आहे. जिल्हाध्यक्ष एस. व्ही. गवस, उपाध्यक्ष एस. जी. जाधव, सरचिटणीस डी. एम. पाटील, एन. जी. बांबरकर, कोदे, यादव, विलास डगरे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदनही सादर केले.