शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अर्थकारणाची ‘पालखी’ अन् व्यापाऱ्यांची ‘दिवाळी’

By admin | Updated: November 13, 2015 23:38 IST

ऐतिहासिक मालवण बाजारपेठ : लाखोंची उलाढाल; व्यापारीवर्गात चैतन्य

मालवण : मालवण शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. जाणकारांच्या सांगण्यानुसार बाजारपेठेत ‘पूर्वीच्या काळी सोन्याचा धूर निघायचा’. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवणनगरीला शिवकालीन परंपरा लाभलेली आहे. दिवाळी पाडवा म्हणजे मालवण बाजारपेठेची व्यापारी वर्षाची सुरुवातच. दिवाळी पाडव्या दिवशी ३५० वर्षांची शिवकालीन पार्श्वभूमी असलेली ग्रामदेवता श्री रामेश्वर-नारायण पालखी सोहळा. या सोहळ्याला व्यापारी वर्गात विशेष महत्व असून मालवणच्या ‘अर्थकारणाची पालखी’ म्हणून संबोधल्यास वावगे ठरणार नाही. दिवाळीची चाहूल लागली की शहरातील दुकाने सजायला लागतात. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी असलेल्या पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचे औचित्य साधून व्यापारी वर्गात मोठी धांदल उडालेली असते. व्यापारी वर्षाची सुरुवात दणक्यात करण्यासाठी व्यापारी सज्ज झालेले असतात. मालवणात पूर्वीच्या काळी सोन्याचा धूर निघायचा असे जाणकारांकडून सांगितले जाते. त्यामुळे पूर्वीच्या काळी बाजारपेठ वैभवशाली होती. त्यानंतर काळाच्या ओघात शहराचे वैभव मागे पडत असल्याचे वाटत असताना पर्यटन विकसित होऊ लागले. आणि पर्यटनाच्या जोडीने मालवण बाजारपेठ पुन्हा एकदा देशी-विदेशी पर्यटकांच्या खरेदीने वैभवशाली बाजारपेठेकडे वाटचाल करीत आहे. गतवर्षी वरूणराजाचे दिवाळीत संकट ओढवले होते. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांची आर्थिक उलाढाल कोलमडली होती.लाखोंची उलाढालविविधरंगी आकाशकंदील, स्थानिक आणि चिनी बनावटीच्या पणत्या, रांगोळीच्या विविध रंगांचा मेळ, तयार कपडे, चायनीज तोरणे, विविध साहित्याने भरलेली इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, फटक्यांची दुकाने, दिवाळीचे गोडधोड पदार्थ, त्यासाठी लागणारी कडधान्ये, तयार पिठ, तेल, लाडू, चकल्या, करंज्या, शंकरपाळी आदी पदार्थ यांची मागणी मोठी असते. त्यामुळे एका रात्रीत लाखो रुपयांची उलाढाल सहजशक्य होते. ई कॉमर्सचा काहीसा फटका येथील बाजारपेठेतला बसला आहे. (प्रतिनिधी)पालखी सोहळ्याचे बाजारपेठेत नवचैतन्यगतवर्षी पाऊस बरसल्याने खरेदी कमी प्रमाणात झाली होती. त्यामुळे साधारण वर्षभर बाजारपेठेत मंदीचे सावट होते. त्यामुळे ग्रामदेवता श्री देव रामेश्वर-नारायण यांच्या आशीर्वादाने यावर्षी बाजारपेठ सजली. ऐतिहासिक पालखीचे महत्व सर्वदूर पसरले आहे. त्यामुळे यादिवशी जिल्हाभरातून भाविक दाखल होतात. तसेच मुंबईस्थित मालवणकरही आवर्जून हजेरी लावतात. या सर्वांवर बाजारपेठ अवलंबून असते. यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने पालखी सोहळ्याला हजारो भाविकांनी हजेरी लावली. यानिमित्ताने मालवण बाजारपेठेवर आलेले मंदीचे सावट दूर झाले. दिवाळी पाडवा व्यापारी वर्गासाठी नूतन वर्ष असते. यावर्षी व्यापारी वर्षाची सलामी चांगली झाली असल्याचे भावना व्यापारी वर्गातून व्यक्त करण्यात आली.