शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी नागरिक सकारात्मक

By admin | Updated: February 11, 2016 23:33 IST

देवयानी खोब्रागडे : सिंधुदुर्ग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

मालवण : भारत-पाकिस्तान या दोन शेजारील देशात संघर्ष असला तरी पाकिस्तानातील नागरिकांना भारताविषयी प्रचंड उत्सुकता आहे. पाकिस्तानातील नागरिक आपुलकी जोपासणारे आहेत. पाकिस्तानी नागरिकांच्या मानसिकतेचा विचार केला तर त्यांचा भारताशी मैत्री करण्यासाठी सदैव हात पुढे आहे. तेथील राज्यकर्ते आणि लष्कर यांच्या कठोर धोरणामुळे दोन देशातील मैत्रीचे संबंध दृढ होण्यास मोठे अडथळे निर्माण होत आहेत. असे असले तरीही पाकिस्तानी नागरिक मैत्रीतील दुरावा नष्ट करण्यासाठी सकारात्मक असल्याच्या भावना भारतीय विदेश मंत्रालयातील राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांनी व्यक्त केल्या.भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत, तसेच पर्यटनाला अधिक चालना मिळावी या हेतून पर्यटन मंत्रालयाच्या वतीने ‘स्पिरीट आॅफ इंडिया रन’ या कार्यक्रमांतर्गत आॅस्ट्रेलियाचे माजी क्रीडा मंत्री व धावपटू पॅट फार्मर हे कन्याकुमारी ते काश्मीर अशी दौड करत आहेत. गेले तीन-चार दिवस ते महाराष्ट्र राज्यात दौड करत आहेत. या अनुषंगाने विदेश मंत्रालयात महाराष्ट्र राज्याची संचालक म्हणून कार्यरत असलेल्या देवयानी खोब्रागडे सिंधुदुर्गात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला आला आहे. मात्र अद्यापही पर्यटन स्थळांचा अपेक्षित विकास झालेला नाही. देशी-विदेशी पर्यटक या ठिकाणी येत असताना त्या दर्जाची हॉटेल्स, वाहतूक आणि दळणवळणाची साधने अपुरी आहेत. त्यामुळे निसर्गसंपन्नता आणि पर्यावरण टिकून पर्यटनदृष्ट्या विकास झाला तरच पर्यटनाला चालना मिळेल, असेही खोब्रागडे यांनी सांगितले.मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे देत मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष अशोक सावंत, युवक काँग्रेसचे बाबा परब यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, डॉ. आर. एन. काटकर, बी. एच. चौगुले तसेच प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)खोब्रागडे : भारतात कुठेही असहिष्णुता नाहीभारतात समानता नांदत आहे. देशात सर्वत्रच केवळ काही महिन्यापूर्वी असहिष्णुतेबाबत रान उठवले गेले होते. मात्र, कोणी असहिष्णुता भाष्य करतो म्हणजे देशात असहिष्णुता निर्माण होत नाही. त्यामुळे भारतात कुठेही असहिष्णुता नसल्याचे खोब्रागडे यांनी सांगितले. आपण विदेश मंत्रालयात सेवा बजावत असताना जगातील सर्वच देशातील नागरिकांना अनुभवता आले आहे. पाकिस्तानबाबत विचार करता तेथील नागरिक मैत्रीतील दुरावा नष्ट करण्यासाठी फारच सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.श्रीमंती हा यशाचा मार्ग नव्हे?पैसा आणि श्रीमंती हा उच्च शिक्षणाचा पाया नसून, ध्येय आणि आत्मविश्वास हा यशाचा मार्ग आहे. विद्यार्थीदशेत ध्येय निश्चित करून यशाच्या मार्गावर जात असताना भारतातच उच्चपदाचे अधिकारी नव्हे तर विदेशातही बडे अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवावा. मुलींनीही कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता यशाच्या दिशेने वाटचाल करावी. छेडछाड, अन्याय, अत्याचाराला बळी न पडता मुलीनीही आक्रमक बनावे, असे आवाहन खोब्रागडे यांनी केले.