शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

पाकिस्तानी नागरिक सकारात्मक

By admin | Updated: February 11, 2016 23:33 IST

देवयानी खोब्रागडे : सिंधुदुर्ग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

मालवण : भारत-पाकिस्तान या दोन शेजारील देशात संघर्ष असला तरी पाकिस्तानातील नागरिकांना भारताविषयी प्रचंड उत्सुकता आहे. पाकिस्तानातील नागरिक आपुलकी जोपासणारे आहेत. पाकिस्तानी नागरिकांच्या मानसिकतेचा विचार केला तर त्यांचा भारताशी मैत्री करण्यासाठी सदैव हात पुढे आहे. तेथील राज्यकर्ते आणि लष्कर यांच्या कठोर धोरणामुळे दोन देशातील मैत्रीचे संबंध दृढ होण्यास मोठे अडथळे निर्माण होत आहेत. असे असले तरीही पाकिस्तानी नागरिक मैत्रीतील दुरावा नष्ट करण्यासाठी सकारात्मक असल्याच्या भावना भारतीय विदेश मंत्रालयातील राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांनी व्यक्त केल्या.भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत, तसेच पर्यटनाला अधिक चालना मिळावी या हेतून पर्यटन मंत्रालयाच्या वतीने ‘स्पिरीट आॅफ इंडिया रन’ या कार्यक्रमांतर्गत आॅस्ट्रेलियाचे माजी क्रीडा मंत्री व धावपटू पॅट फार्मर हे कन्याकुमारी ते काश्मीर अशी दौड करत आहेत. गेले तीन-चार दिवस ते महाराष्ट्र राज्यात दौड करत आहेत. या अनुषंगाने विदेश मंत्रालयात महाराष्ट्र राज्याची संचालक म्हणून कार्यरत असलेल्या देवयानी खोब्रागडे सिंधुदुर्गात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला आला आहे. मात्र अद्यापही पर्यटन स्थळांचा अपेक्षित विकास झालेला नाही. देशी-विदेशी पर्यटक या ठिकाणी येत असताना त्या दर्जाची हॉटेल्स, वाहतूक आणि दळणवळणाची साधने अपुरी आहेत. त्यामुळे निसर्गसंपन्नता आणि पर्यावरण टिकून पर्यटनदृष्ट्या विकास झाला तरच पर्यटनाला चालना मिळेल, असेही खोब्रागडे यांनी सांगितले.मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे देत मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष अशोक सावंत, युवक काँग्रेसचे बाबा परब यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, डॉ. आर. एन. काटकर, बी. एच. चौगुले तसेच प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)खोब्रागडे : भारतात कुठेही असहिष्णुता नाहीभारतात समानता नांदत आहे. देशात सर्वत्रच केवळ काही महिन्यापूर्वी असहिष्णुतेबाबत रान उठवले गेले होते. मात्र, कोणी असहिष्णुता भाष्य करतो म्हणजे देशात असहिष्णुता निर्माण होत नाही. त्यामुळे भारतात कुठेही असहिष्णुता नसल्याचे खोब्रागडे यांनी सांगितले. आपण विदेश मंत्रालयात सेवा बजावत असताना जगातील सर्वच देशातील नागरिकांना अनुभवता आले आहे. पाकिस्तानबाबत विचार करता तेथील नागरिक मैत्रीतील दुरावा नष्ट करण्यासाठी फारच सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.श्रीमंती हा यशाचा मार्ग नव्हे?पैसा आणि श्रीमंती हा उच्च शिक्षणाचा पाया नसून, ध्येय आणि आत्मविश्वास हा यशाचा मार्ग आहे. विद्यार्थीदशेत ध्येय निश्चित करून यशाच्या मार्गावर जात असताना भारतातच उच्चपदाचे अधिकारी नव्हे तर विदेशातही बडे अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवावा. मुलींनीही कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता यशाच्या दिशेने वाटचाल करावी. छेडछाड, अन्याय, अत्याचाराला बळी न पडता मुलीनीही आक्रमक बनावे, असे आवाहन खोब्रागडे यांनी केले.