शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
2
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
3
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
4
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
5
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
6
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
7
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
8
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
9
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
10
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
11
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
12
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
13
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
14
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
15
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
16
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
17
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
18
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
19
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
20
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

‘आॅनलाईन’ने मिळाले फुकटचे मालकत्व

By admin | Updated: May 23, 2015 00:33 IST

मंडणगड तालुका : मालक एक, नोंद भलत्याच व्यक्तीची

देव्हारे : महसूल विभागाने जागेशी संबंधित सर्व कागदपत्र आॅनलाईन देण्याचे काम सुरू केले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागणार आहे. असाच एक आॅनलाईन घोळ उघडकीस आला असून, एका व्यक्तीला फुकटचे मालकत्व मिळाले आहे.जागेच्या संदर्भातील कागदपत्र आॅनलाईन मिळत असल्याने सध्या सर्वच तलाठी सजांवर कागदपत्र दिली जात नाहीत. यामधे सातबारा, आठ (अ), फेरफार व अन्य सर्व कागदपत्रांचा समावेश आहे़ त्यासाठी शेतकरीवर्गाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा महा-ई-सेवा केंद्रामध्ये हेलपाटे मारावे लागतात. मात्र, हा उपक्रम राबवण्यापूर्वी शासनाने किंवा संबंधित खात्याने त्याची पूर्ण तयारी करून केलेले काम पूर्णपणे निर्दोष आहे का? हे पाहणे गरजेचे होते. मात्र, असे दिसून येत नाही.शासनाने केलेली ही लगीनघाई सर्वसामान्य शेतकरीवर्गाला नुकसानदायक ठरत आहे. देव्हारे तलाठी सजेतील कोन्हवली या गावचा सर्व्हे नं. ४७ हिस्सा नं. १२ व सर्व्हे नं. ७४, हिस्सा नं. २६ हे दोन सातबारा कोन्हवली येथील पवार कुटुंबीयांच्या नावे आहेत. मात्र, या सातबाराची आॅनलाईन नोंदणी करताना यामध्ये देव्हारे गावचे रहिवासी प्रसाद वसंत लंके या व्यक्तीचे नाव या सातबारामध्ये टाकण्यात आले आहे. त्या जमिनीशी किंवा पवार कुटुंबाजवळ प्रसाद लंके यांचा कोणताच नातेसंबंध नसताना लंके यांना जागेचे मालकत्व देण्यात आले आहे.लंके यांची देव्हारे व कोन्हवली येथे जागा आहे. त्यांनी आपल्या सर्व जागांचे सातबारा उतारे काढल्यानंतर, ज्या जागा आपल्या नाहीत, अशा दोन सातबारा उताऱ्यांवर आपली नावे पाहून हा प्रकार समोर आला आहे. मात्र, या प्रकारामुळे पवार यांना अनेक अडचणी येणार आहेत. यापुढे जर पवार यांनी आपली जागा विक्रीसाठी काढली तर लंके यांनाही विनाकारण मोबदला द्यावा लागणार आहे. तसेच शासनाच्या मेहेरबानीमुळे झालेली चूक सुधारण्यासाठी व सातबारावरून लंके यांचे नाव कमी करण्याचा खर्च जागा मालकाला करावा लागणार आहे.शासनाने सर्व कागदपत्र आॅनलाईन देण्यापूर्वी ती योग्य प्रकारे तयार केली आहेत का? त्यामधे काही चुका झाल्यात का? हे पाहणे आवश्यक होते. मात्र, तसे झालेले दिसत नाही. शासनाची लगीन घाई सर्वसामान्य शेतकरीवर्गाला सध्यातरी तापदायक असल्याचे पाहावयास मिळत आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधीत महसूल खात्याने तत्काळ लक्ष घालून, झालेल्या सर्व चुका दुरूस्त कराव्यात अन्यथा याचा फटका अन्य शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. तसेच जमिनी संबंधीत आॅनलाईन केलेली सर्व माहिती पुन्हा तपासून घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर) शासनाची लगीनघाई सामान्य शेतकऱ्यांसाठी ठरतेय नुकसानकारक.आॅनलाईन घोळामुळे शेतकरी अडचणीत.महसूल खात्याने वेळीच चुका सुधारण्याची मागणी.गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्यास जमिनीच्या दाखल्यांमध्ये अनेक फेरफार घडण्याची भीती.शेतकऱ्यांनीही आॅनलाईन माहिती तपासून घेणे आवश्यक.नाव कमी करण्याचा खर्च जमीनमालकाच्या माथी.