शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

संघटीतपणे पक्ष वाढवा

By admin | Updated: January 12, 2016 00:37 IST

चित्रा वाघ : दोडामार्गच्या राष्ट्रवादी मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन

कसई दोडामार्ग : भाकरी भाजता भाजता पाण्याची दोर तुमच्या हाती दिली. सत्तेच्या चाव्या तुमच्या हातात दिल्या. जी बाई घर चालवू शकते, ती बाई आता सत्ता चालवू शकते, असा विचार करणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. या पक्षाचे नेते शरद पवार आहेत. महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. त्यामुळे तुम्ही गावोगावी जाऊन पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दोडामार्ग येथे आयोजित महिला मेळाव्यात केले.दोडामार्ग महिला राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने येथील महाराजा हॉलमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सुरेश दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष नम्रता कुबल, युवती अध्यक्ष रंजिता वेंगुर्लेकर, पूजा कर्पे, रेखा कदम, सुचिता दळवी, उपनगराध्यक्षा साक्षी कोरगावकर, तालुकाध्यक्ष अदिती मणेरीकर, मनीषा गवस, अ‍ॅड. रेवती राणे, शोभा कोळेकर, गोपाळ गवस, महादेव बोर्डेकर आदी उपस्थित होते.चित्रा वाघ म्हणाल्या, कॉग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना विकास झाला. शरद पवार यांच्यामुळेच महिलांना ३३ टक्के आरक्षणावरून ५० टक्के आरक्षण मिळाले. हा ऐतिहासिक निर्णय झाला. शेतकऱ्यांना कर्ज माफ केले. आताचे सरकार ते करू शकत नाही. म्हणजे शेतकऱ्यांबद्दल किती त्यांना आस्था आहे, हे समजते. महिलांनी संघटीत होऊन पक्षाची ताकद वाढविणे आवश्यक आहे. आपला हक्क, न्याय यासाठी प्रत्येक महिलेने पुढे येणे आवश्यक आहे. तालुक्याच्या ठिकाणी बसून न राहता लोकांपर्यंत पोहचा. त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या समजून घ्या आणि काम करा. आज स्त्रीवर अत्याचार होतात. त्यावेळी स्त्री आवाज उठवत नाही. आज रेशन दुकानात धान्य खराब मिळते. त्याविरोधात आवाज उठवा. सार्वजनिक ठिकाणी शौचालये नाहीत. शाळा, कॉलेजमध्ये पन्नास विद्यार्थ्यांच्या मागे एक शौचालय आवश्यक आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन आहे, असे सरकार सांगते. प्रत्यक्ष मात्र अशा सोयी नाहीत. याविरूध्द आवाज उठवा. मकरसंक्रांत असल्यामुळे तिळगुळ सुरक्षा हा कार्यक्रम राबवा. ज्याठिकाणी महिला एकत्र येणार त्याठिकाणी तुमचा संपर्क वाढवा, असे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)अन्यायाविरुध्द आवाज उठवा : संपर्क वाढवारेशन दुकानात धान्य खराब मिळते. त्याविरोधात आवाज उठवा. सार्वजनिक ठिकाणी शौचालये नाहीत. शाळा, कॉलेजमध्ये पन्नास विद्यार्थ्यांमागे एक शौचालय असणे आवश्यक आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन आहे, असे सरकार सांगते. प्रत्यक्ष मात्र अशा सोयी नाहीत. याविरूध्द आवाज उठवा. मकरसंक्रांत असल्यामुळे ‘तिळगुळ सुरक्षा’ हा कार्यक्रम राबवा. ज्याठिकाणी महिला एकत्र येणार त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करा, असे आवाहन त्यांनी केले.