शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मतदारयादी प्रमाणीकरणाचा आदेश

By admin | Updated: April 10, 2015 23:50 IST

वनिता पाटील : मतदार यादीतील सदोषता घालविण्यासाठी सहकार्य करा

मालवण : मतदारयादीत ज्या मतदारांची नावे दुबार नोंद झाली आहेत. तसेच दुबार ओळखपत्र क्रमांक मिळाला आहे किंवा यादीतील नावात चुका झाल्या आहेत, अशा मतदारांच्या याद्यांचे शुद्धिकरण करणे व प्रमाणीकरण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून तहसील कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मालवण तालुक्यात या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे. ३१ जुलैपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तालुक्यातील मतदारांनी याचा फायदा घ्यावा व मतदार यादीतील सदोषता घालविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार वनिता पाटील यांनी गुरुवारी केले आहे.या कार्यक्रमांतर्गत मतदारांचे मतदार ओळखपत्राचा डाटा यूआयबीच्या आधारकार्ड डाटाशी जोडण्यात येणार आहे. दुबार नोंद झालेली नावे कमी करण्यात येणार आहेत. यादीतील नोंदीबाबत कोणत्याही चुका असल्यास पुराव्याच्या आधारावर त्या दुरूस्त केल्या जाणार आहेत. मतदार यादीत खराब फोटो असल्यास त्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. याकरिता नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांचे आधारकार्ड झेरॉक्स, भ्रमणध्वनी क्रमांक, ई मेल आयडी, पत्ता घेणार असून, मतदार यादीच्या डाटाबेसमध्ये त्याची नोंद करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने दुबार मतदार नोंदी स्वेच्छेने कमी करण्याबाबत सूचना दिल्या. मतदार यादीत दुबार नोंद ही बाब दंडनीय असल्याने मतदारांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमादरम्यान १२ एप्रिल, १७ मे, २१ जून, १२ जुलै यादिवशी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या मतदान केंद्रावर विशेष मोहिमेचे आयोजन करणार आहेत. याचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेला निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे. (प्रतिनिधी)घरोघरी जाऊन मतदारांचे आधारकार्ड झेरॉक्स, भ्रमणध्वनी क्रमांक, ई मेल आयडी, पत्ता घेणार असून, मतदार यादीच्या डाटाबेसमध्ये त्याची नोंद करण्यात येणार आहे.