शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

..तर ठेकेदारावर कारवाई करा

By admin | Updated: July 16, 2014 23:17 IST

नगरसेवकांची मागणी : कणकवली नगरपंचायत सभा

कणकवली : कणकवली शहरातील कचरा उचलण्याबरोबरच साफसफाई करण्यामध्ये एक दिवसाचा जरी खंड पडला तरी संबंधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बुधवारी झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. आरोग्याशी निगडीत सेवेबाबत कोणताही ढिसाळपणा केला जाऊ नये, असेही यावेळी सुचविण्यात आले.येथील नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी संतोष वारूळे उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने शहरातील साफसफाईबाबतचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. साफसफाई करण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचे दोन महिन्याचे देयक का देण्यात आलेले नाही? असा प्रश्न नगरसेविका मेघा गांगण यांनी उपस्थित केला. निधी उपलब्ध नसल्याने संबंधित ठेकेदाराबरोबरच पाणीपुरवठा तसेच आरोग्य विभागाचीही देयके प्रलंबित असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. शहरातील आठवडा बाजार मंगळवारी असतो. त्यामुळे भाजी विक्रेत्यांसह अन्य विक्रेत्यांकडून टाकलेला कचरा बाजारपेठेत पडलेला असतो. हा कचरा तत्काळ साफ करणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटी कामगारांचे वेतन देण्यात न आल्याने हा कचरा साफ करण्यात आला नसल्याचे सभागृहात सांगण्यात आले. संबंधित ठेकेदाराला ठेका देताना अटी व शर्थी घालण्यात आलेल्या असतात. त्यानुसार साफसफाईचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने एक दिवसाचाही सेवेत खंड पडल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अभिजीत मुसळे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी केली. जनतेला चांगल्या सुविधा देणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र, ठेकेदारावर कारवाई केल्यानंतर सेवा ठप्प झाली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर सभेत जोरदार चर्चा करण्यात आली.अंगणवाडीमध्ये पोषण आहार शिजविण्यासाठी महिला मंडळांना परवानगी देणे, नगरपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक मशिन बसविणे, तेलीआळी येथील उषा कन्स्ट्रक्शनजवळील गटारांचा प्रश्न अशा विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. तसेच विविध निविदांना मंजुरी देण्यात आली. १४व्या वित्त आयोगाअंतर्गत कामे सुचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शहरातील एलईडी दिवे कधी बसविणार? असा प्रश्न नगरसेविका नंदिनी धुमाळे यांनी उपस्थित केला. याबाबतचे सर्व साहित्य उपलब्ध झाले असून ठेकेदार लवकरच कामाला सुरूवात करेल, असे नगराध्यक्षांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)