शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

नदीकाठी उद्योग उभारणीस विरोध

By admin | Updated: January 20, 2015 23:43 IST

पर्यावरण खात्याची भूमिका : जलस्रोत प्रदूषित होऊ नये यासाठी निर्णय

संदीप प्रधान - मुंबई -नदीपात्राच्या दोन्ही बाजूस २ कि.मी. अंतरात उद्योग उभारणीवर असलेले निर्बंध उठविण्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने तयार केलेल्या प्रस्तावाला शिवसेनेकडील पर्यावरण विभागाने विरोध केला आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ या देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेकरिता सध्या असलेले काही निर्बंध उठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला असताना या निर्णयामुळे उद्योगांकडून होणाऱ्या प्रदूषणात भरमसाट वाढ होईल, त्यामुळे हे निर्बंध उठवण्यास पर्यावरण विभागाने प्रखर विरोध केला आहे.नदीपात्रालगत उद्योग उभे राहू नयेत व जलस्रोत प्रदूषित होऊ नये याकरिता २ कि.मी. अंतरात उद्योग उभे करण्यास बंदी होती. मात्र आता ही बंदी उठवताना नदीकाठी उद्योग उभारणीस परवानगी देण्याचे धोरण सरकारने घेतले आहे. या उद्योगांकडून प्रदूषण होऊ नये याकरिता जिल्हावार त्रयस्थ यंत्रणेमार्फत उद्योगांची तपासणी केली जाणार आहे. प्रदूषणानुसार त्यांना श्रेणी दिली जाणार आहे. कुठला उद्योग किती प्रमाणात प्रदूषण करीत आहे त्याची माहिती जाहीर केली जाणार आहे. युरोपीय देशांत नदीकाठी उद्योग उभे आहेत. नदीकाठी उद्योग उभे न करण्याच्या धोरणामुळे अतिक्रमणाचा मुद्दा प्राधान्याने चर्चेत येतो, असे मुख्यमंत्री कार्यालयाचे मत आहे.पर्यावरण विभागाने या धोरणाला विरोध केला आहे. नदी पात्रालगत उद्योग उभे करायला देण्याचा निर्णय आत्मघातकी ठरेल, असे या खात्याचे मत आहे. सध्याच्या नियमानुसार प्रदूषणकारी कारखान्यांना सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्लान्ट उभारणे सक्तीचे आहे. अनेक उद्योग ते उभेही करतात. परंतु असे प्लान्ट चालवणे हे परवडत नसल्याने बहुतांश उद्योग ते बंद ठेवतात व सांडपाणी सोडून देतात. राज्य सरकारच्या एमआयडीसीमध्ये उभारलेले बहुतांश सांडपाणी प्रक्रिया प्लान्ट बंद आहेत. तेथील अनेक उद्योग एमआयडीसीच्या प्लान्टमध्ये सांडपाणी सोडून मोकळे होतात. परिणामी, एमआयडीसी परिसरातील प्रदूषण वाढलेले आहे. हा सर्व पूर्वानुभव लक्षात घेऊन सरकारचा हा निर्णय धोकादायक ठरू शकतो, असे पर्यावरण विभागाला वाटते.+प्रदूषणाचा मुद्दा गौण नदीकाठी उद्योग उभे न करण्याच्या धोरणामुळे उद्योगांच्या अतिक्रमणाचा मुद्दा प्राधान्याने चर्चेत येतो आणि उद्योगांकडून केल्या जाणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा गौण ठरतो, असे मुख्यमंत्री कार्यालयाचे मत आहे.