शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

७४ वर्षात क्रियाशील नेत्यांनाच कुडाळवासीयांकडून संधी

By admin | Updated: March 24, 2016 23:38 IST

नगरपंचायत निवडणूक : जागृत लोकशाहीचा इतिहास, पक्ष वर्चस्वाला मतदारांची कायमच बगल--कुडाळ गावाकडून नगराकडे

कुडाळ तसे पाहिल्यास जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण. वैभववाडी आणि दोडामार्ग पाठोपाठ आता कुडाळचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. येत्या १७ एप्रिलला नगरपंचायतची पहिली निवडणूक होत आहे. वैभववाडी आणि दोडामार्ग या तालुक्याच्या ठिकाणापेक्षा कुडाळ शहर फारच मोठे आहे. त्यामुळे कुडाळ ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर अगोदरच होणे आवश्यक होते. कारण सावंतवाडी, मालवण आणि वेंगुर्ले पाठोपाठ कुडाळचा क्रमांक लागतो. महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या कुडाळ शहरात नगरपंचायत निवडणूक होत आहे. सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ‘कुडाळ गावाकडून नगराकडे’ या मालिकेतून कुडाळ शहरावर टाकलेला प्रकाशझोत आजपासून.....रजनीकांत कदम ल्ल कुडाळसिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेनंतर जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कुडाळलाच सर्वमान्य पसंती मिळाली. त्यामुळे प्रशासनाची सर्वप्रमुख कार्यालये कुडाळ शहरात प्रस्थापित झाली. साहजीकच जिल्ह्याच्या आतापर्यंतच्या विकासात्मक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या या कुडाळ शहराचे राजकारणही तेवढेच कौतुकास्पद असेच मानले जाते. ग्रामपंचायतीच्या ७४ वर्षाच्या इतिहासात कुडाळवासीयांनी क्रियाशिल नेत्यांनाच संधी दिली आहे. राज्याच्या किंवा केंद्राच्या सत्तेचा विचारही केला जात नाही केवळ आमच्यासाठी जो जागतो त्यालाच आम्ही संधी देतो, अशीच जागृत लोकशाहीची व्याख्या कुडाळवासीयांनी दाखवून दिली आहे. कुडाळ ग्रामपंचायत सन १९४२ साली स्थापन झाली. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून कुडाळ शहर ग्रामपंचायतीचे १८ सरपंच येऊन गेले. यामध्ये मंगेश नाडकर्णी (१९४२-१९४३), धोंडदेव नाडकर्णी (१९४३-१९४६), मंगेश नाडकर्णी (१९४६-१९४८), धोंडदेव नाडकर्णी (१९४८-१९५२), पद्मनाभ घुर्ये (१९५२-१९५६), विठ्ठल भोगटे (१९५६-१९६१, १९६६-१९६९), वासुदेव भाट (१९६९-१९७४), मोहन बांदेकर (१९७४-१९७४), तुकाराम शिरसाट (१९७४-१९८०), रामनाथ भोगटे (१९८०-१९८३), अरविंद शिरसाट (१९८३-१९९२), नागेश शिरसाट (१९९२-१९९८), सुधा शारबिद्रे (१९९८-२००२), समता परब (२००२-२००६), कल्पना साळुंखे (२००६-२००७), आशा आळवेकर (२००७-२०१०), प्रशांत राणे (२०१०-२०१२), स्रेहल पडते (२०१२-२०१६) या मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा भार सांभाळत कृडाळच्या विकासाला चालना देण्याचे कार्य केले आहे. कुडाळ ग्रामपंचायत स्थापन झाली त्यावेळी तत्कालीन परिस्थितीत भारतावर ब्रिटीश अंमल होता. त्यामुळे स्थापनेनंतर सुरूवातीलाच विकासात्मक कारभारापेक्षा सामूहीक एकता निर्माण करून ती एकसंघपणे टिकविण्याचा मुख्य प्रश्न होता, आणि त्यावरच मुख्य भर दिला गेला. स्वातंत्र्यानंतर कुडाळच्या विकासाला सुरूवात झाली आणि अन्न, वस्त्र, निवारा या गरजांच्या पूर्तता करण्याच्या दृष्टीने सामाजिक संघटन बांधण्यात आले. सुरुवातीला त्यावेळी प्रस्थापित काँग्रेसचे वर्चस्व ग्रामपंचायतीवर राहीले, त्यानंतर जनता दलाचा अंमल मोठ्या प्रमाणात इथे सुरू झाला. १९८५ पासून मात्र कुडाळ ग्रामपंचायतीवर व्यक्तीगत नेतृत्वाचे पडसाद उमटत गेले आणि जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणाचा इथे मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होऊ लागला. शिवसेना, काँग्रेस अशी परस्पर विरोधातील लढत इथे रंगतदार होत राहीली. पण या सर्वाचा विचार करता कुडाळवासीयांच्या राजकारणाची लकब मात्र जिल्ह्यात टिकून राहीली ती केवळ आणि सजग लोकशाहीच्या उदाहरणातून इथे काम करणाऱ्यांना संधी दिली गेली आणि केवळ बोलघेवड्या गप्पा मारणाऱ्यांना येथील जनतेने लटकतच ठेवले आहे. कुडाळ शहरात कुणा एका पक्षाचे वर्चस्व कधीच अबाधित राहीले नाही. कुडाळ शहरातील विकासाचा विचार केला तर येथील ग्रामपंचायतीकडून शहरातील गटारे, नळपाणी योजना, पथदीप, कचरा व्यवस्थापन अशा प्रकारची जास्तीत जास्त व जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची विकासकामे करण्यात आलेली होती. यामध्ये संधी मिळेल त्या सरपंच उपसरपंचांनी आपली मोलीची भर टाकली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या इतिहासातून कुडाळ शहराची करण्यात आलेली पायाभरणी कधीच डावलता येणार नाही. ग्रामपंचायतीने शहराचे मंदिर बांधले आहे. आता नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीच्या माध्यमातून हे मंदिर सजविण्याचे काम होणार आहे.