शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

राणेंकडून विरोधकांचा समाचार

By admin | Updated: October 6, 2014 22:35 IST

दोडामार्गात काँगेसचा मेळावा: नाव न घेता राजन तेलींवर टीका

कसई दोडामार्ग : ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची असून यातील विजय महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांची खरी ताकद या निवडणुकीत दिसून येणार आहे. तसेच येथील विरोधकांमध्ये विकास करण्याची धमक नसल्याचे काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी दोडामार्ग येथे सांगितले.दोडामार्ग येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बाळा गावडे, प्रचार समितीचे सदस्य मधुकर भावे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, विकास सावंत, तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, विकास सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप कुडतरकर, अंकुश जाधव, एकनाथ नाडकर्णी, रमेश दळवी, चंदू मुळीक, संध्या प्रसादी आदी उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या विश्वासावर, प्रेमावर निवडणुका जिंंकल्या. ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, असे सांगतानाच राणे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मी ज्यांना मोठे केले त्यांनी सरड्याप्रमाणे रंग बदलले. गद्दारी करून आपले खरे रूप दाखविले आहे, अशी टीका राजन तेली यांचे नाव न घेता केली. शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर हे आज एका, उद्या दुसऱ्या पक्षात उडी मारत आहेत. आमदारकीच्या कालावधीत त्यांनी काय विकास केला? दहशत आहे म्हणून माझ्यावर टीका करतात, अशा शब्दात केसरकरांना फटकारले.दिल्लीत भाजपाचे सरकार आहे. परंतु मोदींनी ‘अच्छे दिन’ आणण्याऐवजी बुरे दिन आणले आहेत. ३० टक्के महागाई वाढविली. यावर मात्र मोदी आणि भाजपचे नेते बोलत नाहीत. कांंदा आणि डाळंबीची निर्यात बंद केल्याने कांदा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अमेरिकेत जाऊन जनतेसमोर भावना मांडून, हिंदीत भाषण करून उद्योगपतींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, हा देखावा आहे. (वार्ताहर)