शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

खंडाळ्यातील सोनालीच्या हातांमध्ये अवघ्या महाराष्ट्राची धुरा

By admin | Updated: January 21, 2016 00:23 IST

महाविद्यालयाच्या क्रिकेट संघात तिची निवड करण्यात आली. क्रिकेटची आवड असल्यामुळे वर्षभरात तिने चमकदार कामगिरी केली.

मेहरून नाकाडे -- रत्नागिरी  -पायाला पॅड बांधून एका हातात बॅट आणि दुसऱ्या हाताने डोक्यावरील हेल्मेट सावरत जेव्हा प्रचंड आत्मविश्वासाने सोनाली मैदानावर उतरते ती स्पर्धक संघाला नमवण्याचा पण करूनच! ग्रामीण भागातील खेळाडूपुढे विजय संपादन करणे हाच मुळी उद्देश आहे, त्यापैकीच एक म्हणजे सोनाली जाधव. जांभारी (ता. रत्नागिरी) येथील सोनालीने दहावीनंतर गतवर्षी खंडाळा येथील पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयाच्या क्रिकेट संघात तिची निवड करण्यात आली. क्रिकेटची आवड असल्यामुळे वर्षभरात तिने चमकदार कामगिरी केली. सध्या बारावीत शिकत असलेली सोनाली जाधव १९ वर्षे वयोगटात महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे.सोनालीचे वडील हयात नाहीत, आई मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत आहे. स्वत: अल्प शिक्षित असल्या तरी मुलीने शिकावं, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे सोनालीला त्या सतत प्रोत्साहन देत आहेत. शाळेचे क्रीडाशिक्षक राजेश जाधव व अर्चना खानविलकर यांनी सोनालीची क्रीडा संघासाठी निवड केली. सोनाली जांभारीतून कॉलेजला खंडाळ्यात येते. कॉलेजपूर्वी व कॉलेज सुटल्यावर सोनाली न चुकता सरावासाठी मैदानावर हजर असते. चपळ क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट फलंदाजी आणि अचूक गोलंदाजी ही सोनालीची खासियत आहे. त्यामुळेच तिला आॅल राऊंडर असेही संबोधले जाते. तिच्या खेळातील स्पार्कमुळे मध्यप्रदेश येथील सटाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या कर्णधारपदी सोनालीची नियुक्ती करण्यात आली.महावि-द्यालयीन संघातून सोनाली सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाली व महाविद्यालयाला विजय मिळवून दिला. परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही महाविद्यालयाच्या संघाने विजय खेचून आणला. चंदीगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही सोनाली सहभागी झाली होती. मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे कर्णधारपद सोनालीने भूषविले. तेथे विजय मिळाला नाही, चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे संघाला नमवून विजय प्राप्त केला. या स्पर्धेत सोनाली ‘वुमन आॅफ दी मॅच’ ठरली. त्याचबरोबर मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही तिला ‘वुमन आॅफ दी मॅच’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सोनाली दहावीपर्यंत शाळेच्या व्हॉलिबॉल संघातून खेळत होती. व्हॉलिबॉलही तिचा आवडीचा खेळ आहे. परंतु अकरावीपासून ती क्रिकेटकडे वळली. शैक्षणिक गुणवत्ता संपादन करून पुढे क्रिकेटमध्ये करियर करण्याचा विचार आहे. त्यासाठी सोनालीने पुढील शिक्षणासाठी मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला आहे.सोनालीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मात्र, कॉलेजने तिच्याबरोबर संघातील अन्य खेळाडंूना खेळासाठी खास गणवेश उपलब्ध करून दिले आहेत. कसून केलेला सराव आणि जिद्द, चिकाटी यामुळे सोनालीच्या हातात महाराष्ट्राचा संघ आहे. घरातून येताना आईने करून दिलेला भाजीपोळीचा डबा हाच तिचा ‘आहार’! सर प्रत्यक्ष ग्राऊंडवर त्यांचा सराव करून घेतात, त्यावेळी प्रत्येक टीप्स महत्त्वाच्या असतात व त्या स्पर्धेवेळी उपयोगी पडतात, असे सोनालीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.क्रिकेट हा तर पुरुषांचा खेळ. असे म्हणणाऱ्या लोकांना सोनालीने आपल्या खेळाने मोहिनी घातली आहे. क्रिकेटच्या मैदानावर चालणाऱ्या तिच्या हालचाली, क्षेत्ररक्षण, फलंदाजी यामुळे सोनाली एवढ्या लहान वयातच महाराष्ट्र संघाच्या मुलींच्या संघाची कप्तान बनली.कसून सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि जिद्द यामुळेच आपली एवढी प्रगती झाल्याचे सोनाली सांगते. आपल्यावर महाराष्ट्र संघाची जबाबदारी आली आहे आणि ती पेलण्याची ताकदही, असे सोनाली सांगते.