शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

केवळ नऊ महिन्यात ११ खून, ३७ बलात्कार

By admin | Updated: November 9, 2015 23:22 IST

रत्नागिरी जिल्हा : आवळतोय गुन्हेगारीचा विळखा

राजेंद्र यादव-- रत्नागिरी -वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणाबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे विदारक चित्र उघडकीस येत आहे. गेल्या नऊ महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात ११ खून झाले असून, ३७ महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याशिवाय चोऱ्या, दरोडे व घरफोड्यांमध्ये वाढ झाली आहे.राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कोकणात गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. पोलिसांच्या दृष्टीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्हे हे तणावमुक्त जिल्हे म्हणून ओळखले जायचे. आता मात्र ही ओळख पुसली जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात महिलांवर होणारे अत्याचार, चोरी, घरफोडी व खून यांसारख्या गंभीर गुन्ह्याच्या प्रमाणात गेल्या नऊ महिन्यात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर या अवघ्या नऊ महिन्यात बलात्काराचे ३७ गुन्हे संंबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. सन २०१४मध्ये ही संख्या ३५ इतकी होती. जिल्ह्यातील गुन्ह्यांसंदर्भात पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यापासून अन्य गुन्ह्यांची संख्या १३१२ इतकी आहे. गतवर्षी ती १४४९ इतकी होती. २०१४ मध्ये खुनाचे ११ गुन्हे दाखल होते. चालू वर्षी नऊ महिन्यामध्ये खुनाचे ११ गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न झाल्याच्या घटना १० झाल्या आहेत, तर सदोष मनुष्य वधाखाली दोन गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी दोन दरोडे पडले, तर या नऊ महिन्यांमध्ये चार दरोडे पडल्याची नोंद आहे. एकूण जबरी चोरीच्या घटना ३९ घडल्या, तर ८८ घरफोड्या झाल्या आहेत. चोरीच्या २५१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गर्दी, मारामारीप्रकरणी ६७ गुन्हे नोंद आहेत.याशिवाय दुखापतप्रकरणी १३१ गुन्हे दाखल आहेत. वाहनांचा प्राणांतिक अपघात व अन्य गुन्हे धरुन हा गुन्ह्यांचा आकडा १३१२ इतका नोंद झाला आहे.गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ : शांत रत्नागिरीची ओळख बदलतेयगुन्हेगारी वाढण्यामागे झपाट्याने होणारे शहरीकरण हेच कारणीभूत असल्याचे प्रामुख्याने पुढे येत आहे. अर्थात गुन्हेगारी घटनांची संख्या वाढली असली तरी रत्नागिरीत टोळीयुद्धाच्या घटना घडत नाहीत, ही महत्त्वाची बाब. तेवढ्याबाबत रत्नागिरी जिल्हा शांत आहे. मात्र गुन्हेगारी घटना रोखण्याचे पोलिसांसमोरील आव्हानही मोठे आहे.परप्रांतीय अधिकरत्नागिरी जिल्ह्यात दरोडे, चोरीच्या घटनांमध्ये परप्रांतीयच जास्त गुंतल्याचे दिसून येते. चोऱ्यांच्या गुन्ह्यात अनेक आरोपी हे परजिल्ह्यातील असल्याचे दिसून आले. काही चोऱ्यांचा तपास अजूनही पूर्ण व्हायचा आहे.