शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

केवळ नऊ महिन्यात ११ खून, ३७ बलात्कार

By admin | Updated: November 9, 2015 23:22 IST

रत्नागिरी जिल्हा : आवळतोय गुन्हेगारीचा विळखा

राजेंद्र यादव-- रत्नागिरी -वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणाबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे विदारक चित्र उघडकीस येत आहे. गेल्या नऊ महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात ११ खून झाले असून, ३७ महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याशिवाय चोऱ्या, दरोडे व घरफोड्यांमध्ये वाढ झाली आहे.राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कोकणात गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. पोलिसांच्या दृष्टीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्हे हे तणावमुक्त जिल्हे म्हणून ओळखले जायचे. आता मात्र ही ओळख पुसली जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात महिलांवर होणारे अत्याचार, चोरी, घरफोडी व खून यांसारख्या गंभीर गुन्ह्याच्या प्रमाणात गेल्या नऊ महिन्यात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर या अवघ्या नऊ महिन्यात बलात्काराचे ३७ गुन्हे संंबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. सन २०१४मध्ये ही संख्या ३५ इतकी होती. जिल्ह्यातील गुन्ह्यांसंदर्भात पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यापासून अन्य गुन्ह्यांची संख्या १३१२ इतकी आहे. गतवर्षी ती १४४९ इतकी होती. २०१४ मध्ये खुनाचे ११ गुन्हे दाखल होते. चालू वर्षी नऊ महिन्यामध्ये खुनाचे ११ गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न झाल्याच्या घटना १० झाल्या आहेत, तर सदोष मनुष्य वधाखाली दोन गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी दोन दरोडे पडले, तर या नऊ महिन्यांमध्ये चार दरोडे पडल्याची नोंद आहे. एकूण जबरी चोरीच्या घटना ३९ घडल्या, तर ८८ घरफोड्या झाल्या आहेत. चोरीच्या २५१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गर्दी, मारामारीप्रकरणी ६७ गुन्हे नोंद आहेत.याशिवाय दुखापतप्रकरणी १३१ गुन्हे दाखल आहेत. वाहनांचा प्राणांतिक अपघात व अन्य गुन्हे धरुन हा गुन्ह्यांचा आकडा १३१२ इतका नोंद झाला आहे.गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ : शांत रत्नागिरीची ओळख बदलतेयगुन्हेगारी वाढण्यामागे झपाट्याने होणारे शहरीकरण हेच कारणीभूत असल्याचे प्रामुख्याने पुढे येत आहे. अर्थात गुन्हेगारी घटनांची संख्या वाढली असली तरी रत्नागिरीत टोळीयुद्धाच्या घटना घडत नाहीत, ही महत्त्वाची बाब. तेवढ्याबाबत रत्नागिरी जिल्हा शांत आहे. मात्र गुन्हेगारी घटना रोखण्याचे पोलिसांसमोरील आव्हानही मोठे आहे.परप्रांतीय अधिकरत्नागिरी जिल्ह्यात दरोडे, चोरीच्या घटनांमध्ये परप्रांतीयच जास्त गुंतल्याचे दिसून येते. चोऱ्यांच्या गुन्ह्यात अनेक आरोपी हे परजिल्ह्यातील असल्याचे दिसून आले. काही चोऱ्यांचा तपास अजूनही पूर्ण व्हायचा आहे.