शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पालकमंत्र्यांचाच अनेक गावांवर अन्याय

By admin | Updated: October 15, 2015 00:53 IST

काका कुडाळकर यांचा आरोप : पर्यटन विकास आराखड्यातून भाजपलाही वगळले

कुडाळ : जिल्ह्यातील काही गावांचा पर्यटनदृष्ट्या विकास करताना पालकमंत्र्यांनी अनेक गावांवर अन्याय केला आहे. तसेच ही गावे ठरविण्याच्या बैठकीला भाजप पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी विश्वासात घेतले नाही, असे आरोप भाजपचे काका कुडाळकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर प्रसिद्धीपत्रकातून केले आहेत.कुडाळकर यांनी म्हटले आहे की, भाजपचे नेते व राज्याचे राज्यमंत्री रामराजे शिंदे यांनी ६ आॅक्टोबरला बोलाविलेल्या बैठकीनुसार काही गावांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती. ही बैठक भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिलेल्या पत्रानुसारच घेण्यात आली होती. असे असताना जिल्ह्यातील काही गावांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ज्या गावांची निवड केली आहे, ती पाहता त्यांनी बऱ्याच गावांवर अन्याय केल्याचे चित्र दिसत आहे. राज्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या या संदर्भातील बैठकीत जिल्ह्याचा पर्यटन विकासाचा आराखडा कसा असावा, याबाबत चर्चा व निर्णय झाले. त्यामुळे याबाबत या बैठकीला पालकमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे होते. मात्र, त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचे कुडाळकर यांनी म्हटले आहे. कुडाळ हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून या तालुक्यातील १७ गावांची निवड झाली. मात्र, कुडाळ शहराचा पर्यटन विकास आराखड्यात समावेश नसल्याने काका कुडाळकर यांनी खेद व्यक्त केला आहे. कुडाळ हे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर आहे. येथे भुईकोट किल्ला आहे. घोडेबाव, साई मंदिर, श्री देव कुडाळेश्वर मंदिर, भंगसाळ नदी येथील पांडवकालीन घाट, देवाचा डोंगर तसेच इतरही पर्यटनदृष्ट्या आवश्यक अशी ठिकाणे आहेत. तसेच रेल्वेस्थानक, चिपी विमानतळही जवळ आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे हे शहर पर्यटन विकास आराखड्यात सामील करावे, अशी विनंती पालकमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)आम्ही निधी आणणारया जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे कुडाळ शहर नव्हे, तर या जिल्ह्यातील जी गावे पर्यटनदृष्ट्या विकसित होणे गरजेचे आहेत, त्यांचे प्रस्ताव तयार करून भाजपचे नेते विनोद तावडे व रामराजे शिंदे यांच्यामार्फत आम्ही निधी आणणार, असा निर्धारही कुडाळकर यांनी केला.