शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांकडून फक्त फसव्या घोषणाच

By admin | Updated: March 25, 2016 23:41 IST

परशुराम उपरकर : सिंचनसह अन्य प्रकल्प प्रलंबित

कणकवली : सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले पालकमंत्री दीपक केसरकर अर्थराज्यमंत्री असल्याने जिल्ह्याबरोबरच कोकणच्या विकासाला चालना मिळेल, अशी आशा येथील जनतेला वाटत होती. येथील सिंचनसह अन्य प्रकल्प प्रलंबित असताना राज्याच्या अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूद होईल, असे वाटले होते. मात्र, नुसत्या फसव्या घोषणांव्यतिरिक्त पालकमंत्र्यानी काहीच न केल्याने ते कुचकामी ठरले असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे केली.येथील तेली आळीतील संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पावर पूर्वीच्या मंत्र्यांप्रमाणेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री हात वरती करण्यापुरतेच राहिले आहेत. कोकणातील अनेक सिंचन प्रकल्प प्रलंबित असून त्यासाठी निधीची तरतूद केलेली नाही. जिल्ह्यातील आरोग्य विभागाची दुर्दशा झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांत अपुरे कर्मचारी असल्याने निधी खर्च होऊ शकत नाही. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून मंजूर असताना त्याला विकास कामांसाठी निधी मिळत नाही. तर यापुढे जावून औरंगाबाद जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून दर्जा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री फक्त घोषणा करीत आहेत. ६00 कोटी, ९00 कोटी, १३00 कोटींचा निधी आणला, असे ते सांगत आहेत. मात्र, आराखड्यापेक्षा जिल्हा नियोजनचा निधी दहा कोटींनी कमी झाला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचे वजन मंत्रिमंडळात किती आहे, हे यावरून दिसून येते.कोकणात पाऊस जास्त पडत असल्याने पाण्याचा साठा करण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्यासाठी निधीची तरतूद गरजेची आहे. मात्र, विदर्भ, मराठवाडा भागासाठी मालगुजारी तलावासाठी ५000 कोटींची तरतूद केली जाते. तर याच भागातील आजारी उद्योगांसाठी २000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील आजारी उद्योग, शेतकऱ्यांसाठी निधीची तरतुदच नाही. याला काय म्हणावे?जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर दीपक केसरकर यांचे येथील विकासाकडे दुर्लक्षच झाले आहे. आताचे पालकमंत्री आणि पूर्वीचे पालकमंत्री एकसारखेच आहेत. फक्त सिंचनाला पैसे नाहीत, असे भाषणातून ओरडण्यापलीकडे पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी काहीच केलेले नाही. त्यामुळे आघाडी शासनाप्रमाणेच युती शासन कोकणच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. यापूर्वी ५३३२ कोटींचे पॅकेज कोकणसाठी जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात धरणांसाठी किती पैसे आले? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. शासनाकडून खोटी आश्वासने देऊन कोकणी माणसाला फसविण्याचे काम केले जात आहे. तर पालकमंत्री यामध्ये एक पाऊल पुढे असून त्यांचे कर्तृत्व शून्यच आहे, असेही उपरकर यावेळी म्हणाले. (वार्ताहर)