शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

पालकमंत्र्यांकडून फक्त फसव्या घोषणाच

By admin | Updated: March 25, 2016 23:41 IST

परशुराम उपरकर : सिंचनसह अन्य प्रकल्प प्रलंबित

कणकवली : सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले पालकमंत्री दीपक केसरकर अर्थराज्यमंत्री असल्याने जिल्ह्याबरोबरच कोकणच्या विकासाला चालना मिळेल, अशी आशा येथील जनतेला वाटत होती. येथील सिंचनसह अन्य प्रकल्प प्रलंबित असताना राज्याच्या अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूद होईल, असे वाटले होते. मात्र, नुसत्या फसव्या घोषणांव्यतिरिक्त पालकमंत्र्यानी काहीच न केल्याने ते कुचकामी ठरले असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे केली.येथील तेली आळीतील संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पावर पूर्वीच्या मंत्र्यांप्रमाणेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री हात वरती करण्यापुरतेच राहिले आहेत. कोकणातील अनेक सिंचन प्रकल्प प्रलंबित असून त्यासाठी निधीची तरतूद केलेली नाही. जिल्ह्यातील आरोग्य विभागाची दुर्दशा झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांत अपुरे कर्मचारी असल्याने निधी खर्च होऊ शकत नाही. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून मंजूर असताना त्याला विकास कामांसाठी निधी मिळत नाही. तर यापुढे जावून औरंगाबाद जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून दर्जा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री फक्त घोषणा करीत आहेत. ६00 कोटी, ९00 कोटी, १३00 कोटींचा निधी आणला, असे ते सांगत आहेत. मात्र, आराखड्यापेक्षा जिल्हा नियोजनचा निधी दहा कोटींनी कमी झाला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचे वजन मंत्रिमंडळात किती आहे, हे यावरून दिसून येते.कोकणात पाऊस जास्त पडत असल्याने पाण्याचा साठा करण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्यासाठी निधीची तरतूद गरजेची आहे. मात्र, विदर्भ, मराठवाडा भागासाठी मालगुजारी तलावासाठी ५000 कोटींची तरतूद केली जाते. तर याच भागातील आजारी उद्योगांसाठी २000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील आजारी उद्योग, शेतकऱ्यांसाठी निधीची तरतुदच नाही. याला काय म्हणावे?जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर दीपक केसरकर यांचे येथील विकासाकडे दुर्लक्षच झाले आहे. आताचे पालकमंत्री आणि पूर्वीचे पालकमंत्री एकसारखेच आहेत. फक्त सिंचनाला पैसे नाहीत, असे भाषणातून ओरडण्यापलीकडे पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी काहीच केलेले नाही. त्यामुळे आघाडी शासनाप्रमाणेच युती शासन कोकणच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. यापूर्वी ५३३२ कोटींचे पॅकेज कोकणसाठी जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात धरणांसाठी किती पैसे आले? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. शासनाकडून खोटी आश्वासने देऊन कोकणी माणसाला फसविण्याचे काम केले जात आहे. तर पालकमंत्री यामध्ये एक पाऊल पुढे असून त्यांचे कर्तृत्व शून्यच आहे, असेही उपरकर यावेळी म्हणाले. (वार्ताहर)