शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

बस-कार अपघातात एक ठार

By admin | Updated: June 22, 2015 22:16 IST

भुर्इंजनजीक अपघात : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौघे गंभीर जखमी

भुर्इंज : पुणे-बंगळूर महामार्गावर भुर्इंज नजीक रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका कारला आरामबसने पाठीमागून दिलेल्या धडकेत कारमधील एकजण ठार तर चौघे गंभीर जखमी झाले. मृत व जखमींमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून जखमींवर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास भुर्इंजनजीक एका कारचा (एमएच ०४ डब्लू ४९३९) टायर पंक्चर झाला. पंक्चर काढण्यासाठी कार महामार्गावर रस्त्याकडेला उभी होती. कारची दुरुस्ती सुरू असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आरामबसने (एमएच ०४ एफके ९९२९) कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पराग गणपती गुंजाटे (वय ५३, रा. जामसंडे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) हे जागीच ठार झाले. सुनील राजाराम पांगम, रविकांत विष्णू मिस्त्री, प्रमोद राजाराम ठाकूर, शिवाजी दत्तात्रय मडवळ (सर्व, रा. कणकवली, सिंधुदुर्ग) गंभीररीत्या जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृत पराग गुंजाटे यांचे शवविच्छेदन भुर्इंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. दरम्यान, अपघातातील मृत व जखमी ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. (वार्ताहर)