शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

मळगावात दीड दिवसाची नागपूजा

By admin | Updated: August 18, 2015 23:39 IST

श्रावणातील पहिला सण : गोसावी कुटुंबियांची २०० वर्षांची परंपरा

राजन वर्धन- सावंतवाडी -एक दिवसाचा, दीड दिवसाचा, तीन दिवसाचा, पाच दिवसाचा गणपती उत्सव आपण पाहिला आहे. पण बुधवारी साजरी होणारी नागपंचमी बहुधा एक दिवसाचीच असते. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे दीड दिवसाची नागपंचमी गेली दोनशे वर्षे अखंड सुरू आहे. गोसावी कुटुंबियांमार्फत सुरू असणारी ही नागपंचमी तालुक्यात चर्चेचा विषय बनून राहिली आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला महत्त्वाचे स्थान आहे. पांरपरिकसण, उत्सवातील धार्मिकता जोपासणारा व प्राणीमात्रांविषयी प्रेम निर्माण करणाऱ्या सणातील महत्त्वाचा सण म्हणूनही याकडे पाहिले जाते. नागपंचमी दिवशीपूर्वी महिला रानावनात जाऊन वारुळाजवळ जाऊन तेथे नागदेवतेची पूजा करत असत. यावेळी दुध, पातोळे असे पदार्थ नागराजासमोर ठेवून त्याला माया लावली जात असे. यातून महिला नागाला आपला भाऊ मानून त्याला वंदन करायच्या. यातून नाग व माणूस याचे एक प्रेमाचे नाते निर्माण झाले. पण या सापांना पकडून गारूडी खेळ करून पैसा मिळवून आपला उदरनिर्वाह करत. या खेळाला तस्करीने ग्रासले व सापाच्या विषाची विक्री होऊ लागली. त्यातूनच ही वारूळे कमी झाली आणि घरोघरी मातीच्या नाग मूर्तींची पूजा होऊ लागली. ती आजपर्यंत सुरू आहे. नागपंचमी दिवशी नागाची मूर्ती आणून तिला लाह्या चिकटवून दुधाचा व पातोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. सकाळी मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास त्याचे विसर्जन करण्यात येते. वडिलोपार्जित आलेल्या या परंपरेचा मान यावर्षी रामचंद्र बंडू गोसावी यांना असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गोसावी व धर्मनाथ गोसावी बंधू नागपंचमीची तयारी करत आहेत. या अनोख्या उत्सवाची जपणूक करताना नागमूर्तीची सजावट आकर्षक केली जाते. त्यादिवशी देखावाही केला जातो. शिवाय रात्री झिम्मा फुगडी, महिलांची पांरपरिक समूह गीते यांचे सादरीकरण केले जाते. त्यामुळे येथील नागपंचमी उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतून अनेकजण भेट देतात. नागपंचमी दिवशीच्या पूर्वसंध्येला ब्राम्हण भोजन, एकादशमी केली जाते. यावेळी कुलदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमी दिवशी सकाळी नागाची मूर्ती आणून सजवली जाते. यावेळी चाफी, दुर्वा, बेल यांचा वापर केला जातो. त्यानंतर विधीवत पूजा करताना दुध व लाह्यांचा नैवेद्य दिला जातो. दुपारी पातोळ्यांचा नैवेद्य दिला जातो. तर सायंकाळी पुन्हा सर्वांच्या उपस्थितीत पूजा करून रात्री उशिरापर्यंत झिम्मा-फुगड्या, समूह गीतांचा महिलांचा कार्यक्रम साजरा केला जातो. यानंतर भजन-अभंगांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी तुपातील करंज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. सायंकाळी सवाद्य मिरवणूक व फटाक्यांच्या आतषबाजीत अळवाच्या पानात विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर शेगलाची भाजी व भाकरी असा प्रसाद वाटला जातो. भावनिक वातावरणात विसर्जन केल्यानंतर घरातील महिला गहिवरतात.