शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

मोटार दरीत कोसळून वृद्ध दाम्पत्य ठार

By admin | Updated: May 16, 2016 00:37 IST

चौघे गंभीर : संगमेश्वर तालुक्यातील वांद्रीजवळ दुर्घटना; जखमी सर्व एकाच कुटुंबातील

देवरूख : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील वांद्रीजवळ अल्टो कार दरीत कोसळून एकाच कुटुंबातील दोनजण ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले. रविवारी दुपारी पावणे दोन वाजता हा अपघात झाला. अपघातग्रस्त शिर्के कुटुंब मीरा रोडहून कुर्णे (लांजा) येथे आपल्या मूळ गावी चालले होते. बाळकृष्ण सखाराम शिर्के (वय ६०), राजश्री बाळकृष्ण शिर्के (५५) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध दाम्पत्याची नावे असून, गाडीतील अन्य आनंदा बाळकृष्ण शिर्के (३५), मधुरा आनंदा शिर्के (३०), हर्षली आनंदा शिर्के (४) व वर्णवी आनंदा शिर्के (३) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी शिर्के कुटुंबीय मीरा रोडवरून कोकणात सुटीसाठी आपल्या मूळ गावी कुर्णे येथे अल्टो कार (एमएच-४ जीजे ३१५८)ने चालले होते. दुपारी १.३० च्या दरम्यान ते वांद्री येथील सप्तलिंगी नदीपुलाजवळ आले असता त्यांची मोटार विरुद्ध दिशेला जाऊन १५ फूट खोल दरीत कोसळली व शेवटी ती एका झाडावर आदळली. अपघाताचे वृत्त कळताच नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्याचे चालक धनेश केतकर यांनी वाहतूक पोलिस, स्थानिकांच्या मदतीने मृत व जखमींना दरीतून बाहेर काढले. त्याचदरम्यान शासनाची १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी आली. दोन्हींतून मृतदेह व जखमींना रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी सारे दृश्य हृदयद्रावक होते. आजी-आजोबांचा जागीच झालेला मृत्यू, मुलांनी फोडलेला टाहो बघ्यांचे हृदय पिळवटून टाकत होता. (प्रतिनिधी)