शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आजारपण, गरीबीमुळे वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवेंगुर्ले : परिस्थिती बेताचीच.. त्यातच वयोवृद्ध पत्नीचे भयावह आजारपण... त्याला लागणारे सततचे पैसे यामुळे त्रासलेल्या शिरोडा शिसामुणगेवाडी येथील वृद्ध दाम्पत्याने घरातच एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. सुरेश राजाराम मयेकर (वय ७५) व सुनीता मयेकर (६९) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. याबाबत ...

लोकमत न्यूज नेटवर्कवेंगुर्ले : परिस्थिती बेताचीच.. त्यातच वयोवृद्ध पत्नीचे भयावह आजारपण... त्याला लागणारे सततचे पैसे यामुळे त्रासलेल्या शिरोडा शिसामुणगेवाडी येथील वृद्ध दाम्पत्याने घरातच एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. सुरेश राजाराम मयेकर (वय ७५) व सुनीता मयेकर (६९) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयेकर दाम्पत्य शिरोडा शिसामुणगेवाडी येथील घरात राहत होते. कोणाचाच आधार नसल्याने ते एकाकी पडले होते. त्यातच सुनीता या गेली कित्येक वर्षे आजारी होत्या. त्या नेहमी अंथरुणालाच खिळून असायच्या. त्यामुळे मोलमजुरी करून सुरेश यांना पत्नी सुनीताचीही देखभाल करावी लागत होती. मोलमजुरी करीत असल्याने त्यांच्याकडे जेमतेम पैसे असायचे. त्यामुळे पत्नीच्या औषधोपचारासाठी लागणारा खर्च करण्याएवढीही त्यांची परिस्थिती नव्हती. मूलबाळ नसल्याने त्यांना आपल्या चुलत नातेवाइकांकडेच मदत मागावी लागे. या सर्व गोेष्टीला कंटाळून सोमवारी सकाळी त्या दोघांनी आपल्या राहत्या घरात एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.सकाळी मयेकर दाम्पत्य बाहेर न दिसल्याने तसेच त्यांचा काही आवाज ऐकू न आल्याने शेजाºयांनी घरात पाहिले असता मयेकर दाम्पत्य गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. या घटनेची माहिती सुरेश मयेकर यांचा भाऊ सीताराम मयेकर यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर शिरोडा दूरक्षेत्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक महादेव कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेबाबत माहिती घेतली.शिरोडा परिसरात हळहळमयेकर दाम्पत्याने अचानक जीवन संपविण्याच्या घेतलेल्या निर्णयाने शिरोडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आजारपणाला कंटाळून पती-पत्नीने जीवन संपविले असले तरी या दोघांना मागे बघण्यासाठी कोणीही नव्हते. त्यातच पत्नीच्या आजारपणासाठी लागणारे पैसे कोठून आणायचे असा प्रश्न सुरेश यांना सतत भेडसावत होता. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला.