शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

अधिकाऱ्यांनी प्रामाणिक जनसेवा करावी

By admin | Updated: October 27, 2015 23:56 IST

ग. दि. कुलथे : सिंधुदुर्गनगरी येथील ‘पगारात भागवा’ अभियानात शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याबाबत दक्ष राहून प्रामाणिक जनसेवा केली पाहिजे. खरे तर एखाद दुसऱ्या भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यामुळे संपूर्ण व्यवस्थेला गालबोट लागते. त्यामुळे सर्वसामान्य जनता प्रामाणिक अधिकाऱ्यांकडेही संशयाने पाहू लागते. हे लक्षात घेता, लोककल्याणकारी योजनांची प्रभावीरीत्या अंमलबजावणी आणि प्रशासन पारदर्शक व लोकाभिमुख ठेवण्यासाठी बहुतांशी अधिकारी व कर्मचारी कर्तव्यदक्ष आहेत, याची वस्तुनिष्ठ प्रचिती नागरिकांना आणून देणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘पगारात भागवा’ याविषयी कर्मचारी, अधिकारी वर्गाला मार्गदर्शन करताना कुलथे म्हणाले, शासकीय कामकाजातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावे व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत सामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने राज्यभर अधिकारी व कर्मचारी यांच्या पातळीवर ‘पगारात भागवा’ हे भ्रष्टाचारविरोधी प्रबोधनात्मक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. या अभियानाच्या सकारात्मक अंमलबजावणीकरिता शासन पातळीवरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सहचिटणीस सुदाम टाव्हरे व गणेश राठोड आदी उपस्थित होते.कुलथे म्हणाले, या अभियानाव्दारे राज्यभर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. या अभियानाच्या सकारात्मक परिणामाकरिता अधिकारी, कर्मचारी व जनता या सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. पगार, भत्ते, बढत्या यांसारख्या रास्त मागण्यांकरिता राज्य महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने नेहमी पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने केलेल्या विविध मागण्यांच्याबाबत शासन सकारात्मक असून आपणही जनतेप्रती असलेले आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. याकरिता या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत २२ जिल्हा प्रशासकीय पातळीवर बैठका घेण्यात आल्या आहेत. राज्यभर या अभियानाचा जागर सुरू करण्यात आला असल्याची माहितीही यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी दिली. (प्रतिनिधी)