शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

समाजमंदिरांसाठी विशेष निधी देऊ

By admin | Updated: April 15, 2015 23:56 IST

सामाजिक सप्ताहाचा समारोप : सिंधुदुर्गनगरी येथे दीपक केसरकर यांचे आश्वासन

सिंधुदुर्गनगरी : समाजमंदिरे ही विकासाचा केंद्रबिंदू तयार व्हावा. तरुणांना उत्तम ज्ञान मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीने घ्यावी यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत ग्रामविकास, वित्त राज्यमंत्री तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलेसिंधुदुर्गनगरी येथील सामाजिक न्यायभवनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम सामाजिक सप्ताह समारोप कार्यक्रमात दीपक केसरकर बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, पोलीस उपअधीक्षक अनंत आरोसकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कणकवलीच्या छाया नाईक, सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांच्यासह इतर अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.केसरकर म्हणाले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी केलेल्या कार्याचे मोल नाही. जागतिक दर्जाचे व्यक्तिमत्त्व आणि फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भूषण होते. डॉ. बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यावसाठी ज्या ठिकाणी समाजमंदिरे आहेत त्या ठिकाणी छोटीशी ग्रंथालये उभारण्याचा विचारही केसरकर यांनी व्यक्त केला. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शासन दुर्बल व वंचित घटकांसाठी अनेक चांगल्या योजना राबवीत आहे. समाजकल्याण विभागाने शासनाच्या प्रत्येक योजनांची चांगल्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धीे करून तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवाव्यात. दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना दारिद्र्यरेषेवर आणण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मतही दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड म्हणाले, सामाजिक सप्ताहाच्या निमित्ताने गेले सहा दिवस विविध उपक्रम राबविण्यात आले. यामधून समाजकल्याण विभागाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि त्यांची जिल्हास्तरावर करण्यात आलेली अंमलबजावणी ही चांगल्या प्रकारे करण्यात आली असून, अशा उपक्रमांचे सातत्य राखणेही गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)विभागासाठी स्वतंत्र वेळकेसरकर म्हणाले, समाजकल्याण विभागातर्फे विविध योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी व त्यांचे सबलीकरण होण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना विशेष मागासवर्गासाठी राबविण्यात येतात. योजना राबविणाऱ्या यंत्रणांनी यांची काटेकोर अंमलबजावणी करावी. समाजकल्याण विभागासाठी स्वतंत्र वेळ देऊन या विभागातील योजना व त्यांंची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही केसरकर यावेळी म्हणाले.