शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाबाबत आक्षेप; विकासाला विरोध नाही

By admin | Updated: May 20, 2015 00:14 IST

नीतेश राणे : महामार्ग चौपदरीकरणात प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे

कणकवली : माझ्यासह कणकवली मतदारसंघातील कोणत्याही ग्रामस्थाचा विकासाला विरोध नाही आहे. मात्र, प्रशासनाकडून सध्या महामार्ग चौपदरीकरणाबाबत सुरू असलेल्या भूसंपादनाला आमचा आक्षेप आहे. प्रशासन ग्रामस्थांना अंधारात ठेऊन राबवित असलेल्या भूसंपादनाला आमचा कडाडून विरोध असून असे भूसंपादन कदापी होवू देणार नाही, असा सज्जड दम आमदार नीतेश राणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंगळवारी भरला. दरम्यान, युती शासनाच्या सहा महिन्यांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्व स्तरातून विकास पूर्णपणे ठप्प झाला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नीतेश राणे म्हणाले, प्रशासन राबवित असलेल्या भूसंपादनाला आमचा आक्षेप आहे. प्रशासन लोकांना अंधारात का ठेवत आहे ? सर्व लोकांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून आपण राबवित असलेल्या मोजणी प्रक्रियेबाबत माहिती का देत नाही ? ग्रामस्थांना धमकावून, खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत ही काय हुकूमशाही आहे की काय ? प्रशासकीय अधिकारी चोरासारखे मोजणी करायला फिरत आहेत. काही ठिकाणी सकाळी ६ वाजता, रात्री अपरात्री कशाची मोजणी करता? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.युती शासनाच्या गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामे पूर्णपणे ठप्प आहेत. वाळू, मच्छिमारी, महसूलचे तलाठ्यांचे आंदोलन, भात गोडावनात सडत असलेला भातसाठा अशा अनेक प्रश्नांवर येथील शासनकर्त्यांकडे उत्तरेच नाहीत. आंबा बागायतदार, शेतकरी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे त्रस्त आहे. मात्र, याला कोणत्याही प्रकारची मदत शासनाकडून जाहीर झालेली नाही. त्यातूनच देवगड येथील एका बागायतदाराने मागील आठवड्यात आत्महत्यादेखील केली आहे. असे सर्व घडत पालकमंत्री मात्र बिअरबारच्या उद्घाटनांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे येथील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकमंत्री कोणतीही ठोस भूमिका घेत नाही, प्रशासनावर त्यांचा कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. परिणामी जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. युती शासनाच्या पाच वर्षांच्या कालावधीपैकी अवघ्या सहा महिन्यातच जनता कंटाळली असून त्यावेळी आपण चूक केली काय? असा प्रश्न आपआपसात विचारताना आढळत आहे. (प्रतिनिधी)२३ पासून प्रत्येक गावाला भेट देणारमहामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आपण २३ मे पासून भूसंपादन होणाऱ्या प्रत्येक गावात भेट देणार असून तेथील लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे. त्यानंतर या सर्व गावभेटीतून एक आवाज बनवून प्रशासनासमोर आपले म्हणणे मांडणार आहे. सध्या लोकांना विश्वासात न घेता छुप्या पद्धतीने सुरू असलेले भूसंपादन बंद पाडण्यात आले आहे. त्याबाबत आपण प्रांताधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली आहे. मात्र, यानंतर ग्रामस्थांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जोपर्र्यत प्रशासन देत नाही. तोपर्यंत कोणतेही काम सुरू करायला देणार नाही, असा दम नीतेश राणे यांनी भरला.प्रशासनाने महामार्गाच्या भूसंपादनाबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार कराव्यात. पारदर्शकपणे प्रक्रिया राबवावी. प्रत्येकाच्या मनात असलेल्या भूसंपादनाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. शंकांचे निरसन करावे. तर आणि तरच आपण लोकांना घेऊन प्रशासनाला योग्य ते सहकार्य करण्यास तयार आहे.- नीतेश राणे, आमदार, कणकवली मतदारसंघतलाठ्यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणारसिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यात मार्ग काढायचा सोडून प्रशासन ताठर भूमिका घेऊन आपले ते खरे करत आहे. या आंदोलनामुळे महसूलची गावागावातील सर्व कामे ठप्प आहेत. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी स्पष्ट केले.