शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

भूसंपादनाबाबत आक्षेप; विकासाला विरोध नाही

By admin | Updated: May 20, 2015 00:14 IST

नीतेश राणे : महामार्ग चौपदरीकरणात प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे

कणकवली : माझ्यासह कणकवली मतदारसंघातील कोणत्याही ग्रामस्थाचा विकासाला विरोध नाही आहे. मात्र, प्रशासनाकडून सध्या महामार्ग चौपदरीकरणाबाबत सुरू असलेल्या भूसंपादनाला आमचा आक्षेप आहे. प्रशासन ग्रामस्थांना अंधारात ठेऊन राबवित असलेल्या भूसंपादनाला आमचा कडाडून विरोध असून असे भूसंपादन कदापी होवू देणार नाही, असा सज्जड दम आमदार नीतेश राणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंगळवारी भरला. दरम्यान, युती शासनाच्या सहा महिन्यांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्व स्तरातून विकास पूर्णपणे ठप्प झाला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नीतेश राणे म्हणाले, प्रशासन राबवित असलेल्या भूसंपादनाला आमचा आक्षेप आहे. प्रशासन लोकांना अंधारात का ठेवत आहे ? सर्व लोकांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून आपण राबवित असलेल्या मोजणी प्रक्रियेबाबत माहिती का देत नाही ? ग्रामस्थांना धमकावून, खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत ही काय हुकूमशाही आहे की काय ? प्रशासकीय अधिकारी चोरासारखे मोजणी करायला फिरत आहेत. काही ठिकाणी सकाळी ६ वाजता, रात्री अपरात्री कशाची मोजणी करता? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.युती शासनाच्या गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामे पूर्णपणे ठप्प आहेत. वाळू, मच्छिमारी, महसूलचे तलाठ्यांचे आंदोलन, भात गोडावनात सडत असलेला भातसाठा अशा अनेक प्रश्नांवर येथील शासनकर्त्यांकडे उत्तरेच नाहीत. आंबा बागायतदार, शेतकरी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे त्रस्त आहे. मात्र, याला कोणत्याही प्रकारची मदत शासनाकडून जाहीर झालेली नाही. त्यातूनच देवगड येथील एका बागायतदाराने मागील आठवड्यात आत्महत्यादेखील केली आहे. असे सर्व घडत पालकमंत्री मात्र बिअरबारच्या उद्घाटनांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे येथील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकमंत्री कोणतीही ठोस भूमिका घेत नाही, प्रशासनावर त्यांचा कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. परिणामी जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. युती शासनाच्या पाच वर्षांच्या कालावधीपैकी अवघ्या सहा महिन्यातच जनता कंटाळली असून त्यावेळी आपण चूक केली काय? असा प्रश्न आपआपसात विचारताना आढळत आहे. (प्रतिनिधी)२३ पासून प्रत्येक गावाला भेट देणारमहामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आपण २३ मे पासून भूसंपादन होणाऱ्या प्रत्येक गावात भेट देणार असून तेथील लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे. त्यानंतर या सर्व गावभेटीतून एक आवाज बनवून प्रशासनासमोर आपले म्हणणे मांडणार आहे. सध्या लोकांना विश्वासात न घेता छुप्या पद्धतीने सुरू असलेले भूसंपादन बंद पाडण्यात आले आहे. त्याबाबत आपण प्रांताधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली आहे. मात्र, यानंतर ग्रामस्थांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जोपर्र्यत प्रशासन देत नाही. तोपर्यंत कोणतेही काम सुरू करायला देणार नाही, असा दम नीतेश राणे यांनी भरला.प्रशासनाने महामार्गाच्या भूसंपादनाबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार कराव्यात. पारदर्शकपणे प्रक्रिया राबवावी. प्रत्येकाच्या मनात असलेल्या भूसंपादनाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. शंकांचे निरसन करावे. तर आणि तरच आपण लोकांना घेऊन प्रशासनाला योग्य ते सहकार्य करण्यास तयार आहे.- नीतेश राणे, आमदार, कणकवली मतदारसंघतलाठ्यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणारसिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यात मार्ग काढायचा सोडून प्रशासन ताठर भूमिका घेऊन आपले ते खरे करत आहे. या आंदोलनामुळे महसूलची गावागावातील सर्व कामे ठप्प आहेत. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी स्पष्ट केले.