शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

आता एका पावलावर विकास

By admin | Updated: June 5, 2015 00:19 IST

फेरफटका...

कोकण रेल्वेनंतर अती महत्त्वाकांक्षी असलेला चौपदरीकरणाचा प्रश्न सुटला आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणासंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण झाल्याची माहिती दिल्यानंतर सुमारे चार हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प मार्गी लागत आहे. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, अशी मागणी विविध संघटनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. राज्य सरकार, केंद्रामधील राज्याचे मंत्री महामार्ग ज्या शहरांमधून जातो आहे त्या शहरातील लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, संघर्ष समित्या, बाधीत व्यापारी, नागरिक या सर्वांनी चौपदरीकरणाच्या अनेक संकटांचा परामर्श वेळोवेळी घेतला होता. अनेक ठिकाणी नागरी वस्त्या उद्ध्वस्त होतील, अशा पद्धतीने चौपदरीकरण स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. पत्रकारांनीही या मुद्द्यावर मुख्यमंत्री, राज्यपालांची भेटही घेतली होती.यापूर्वीच्या सरकारने चौपदीकरण करणारच अशी भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्ष सत्तांतरानंतरच चौपदरीकरणात जाणाऱ्या जमिनी व अन्य घटकांसाठी देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईचे निकष ठरविण्यात आले. त्यामुळे चार टप्प्यात होणारे हे चौपदरीकरण प्रत्यक्ष सुरु झाले आहे. झारापपर्यंत जाणाऱ्या या चौपदरीकरणाला अनेकवेळा संघर्षाची धार आली आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील आमदारांची महत्वपूर्ण बैठक गडकरी यांच्या पुढाकाराने मलबार हिलला घेण्यात आली. चौपदरीकरणात येणारा प्रमुख अडसर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्र्रकाश जावडेकर यांच्या सहमतीने सुटला असल्याने आता अभयारण्यातील मार्गही सुरळीत होणार आहे. या दृष्टीने मुुंबई ते गोवा महामार्गावर प्रमुख ठिकाणी असलेल्या चौपदरीकरणाच्या विरोधाची धारही धुसर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चौपदरीकरण होत असतानाही प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारा मोबदला हा दुप्पट ते चार पट अशा प्रमाणात दिला जाणार असल्याने ज्यांचे भूसंपादन या मार्गासाठी झाले आहे. या मार्गावर अनेक व्यापाऱ्यांनी या मार्गाला काही नागरी कारणे देत विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी निर्माण होत असलेल्या संघर्ष समित्यांची समजूत घालणे जिकरीचे असल्याने व आपल्या वचननाम्यात फडणवीस सरकारने चौपदरीकरण पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे या हेतूने केंद्रीय मंत्री असलेल्या गडकरी यांनी यात पुढाकार घेतला आहे. जलपर्यटन, रस्ते वाहतूक व पुल बांधणीचा मोठा अनुभव गाठीशी असलेल्या गडकरी यांनी या मार्गात कोणतेही अडसर येऊ नयेत यासाठी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून त्यात थेट प्रश्न सोडवणुकीची भूमिका घेतली आहे.कोकणात यापूर्वी कोकण रेल्वेचा महत्वाकांक्षी जागतिक स्तरावरचा प्रकल्प पुरा करण्यासाठी अनेक वर्षे वाट पहावी लागली. स्वप्नवत असा रेल्वे मार्ग दऱ्याखोऱ्यातून काढण्यात अभियंते यशस्वी झाले. त्यावेळीही मोठा विरोध झाला होता. आज त्यानंतर कोकणात होत असलेल्या चौपदरीकरणाचा विषय तेवढाच महत्वाचा असून त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील पैसा, वेळ व अपघात टळतील आणि विकासालाही चालना मिळेल या निमित्ताने आराखडा तयार करताना गडकरी यांनी चिपळूणमध्ये उड्डाण पुल व पाली येथे बायपासला मान्यता अशा दोन गोष्टींना तत्वत: मंजूरी दिली आहे. ज्या ठिकाणी भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. तेथे तातडीने चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करावी व नियोजीत वेळी हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण करावा, अशा मनोवृत्तीतून केंद्र, राज्य सरकारांनी चौपदरीकरणाचा विषय गांभीर्याने घेतल्यामुळे जिल्ह्यासाठी आता विकास एका पावलावर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.- धनंजय काळे