शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

आता बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सवरच

By admin | Updated: August 16, 2016 23:42 IST

कोकण कृषी विद्यापीठ : दुर्घटना, वेळ वाचवण्यासाठी कुलगुरूंचा निर्णय

शिवाजी गोरे -- दापोली --महाडसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यांतील रिसर्च सेंटरशी यापुढे थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याचा ऐतिहासिक निर्णय कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांनी घेतला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती व अतिवृष्टी याचा विद्यापीठातील बैठकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळदे व ठाणे जिल्ह्यातील वाडा, रायगड जिल्ह्यातील कर्जत ही वेगवेगळी टोके आहेत. या ठिकाणाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास बैठकांसाठी येणाऱ्यांचा वेळ, पैसा याचा अपव्यय होतो. त्याहीपेक्षा अतिवृष्टीच्या काळात महाडसारखी दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीसाठी दापोलीला येण्यासाठी दोन दिवस मोडण्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद सुलभ होणार आहे.दापोली कोकण कृषी विद्यापीठातील बैठकीसाठी लागणारा वेळ, पैसा त्याहीपेक्षा महाडसारखी दुर्घटना टाळण्यासाठी कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांनी हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. यापुढे दापोली कोकण कृषी विद्यापीठात बैठकीनिमित्त विभागप्रमुख, शास्त्रज्ञ यांना येण्याची गरज नाही. त्यांना विद्यापीठात आठ दिवसांनी, पंधरा दिवसांनी तसेच महिन्याला बैठकीसाठी विद्यापीठात यावे लागत होते. परंतु, आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट कुलगुरु, संचालक, कुलसचिव यांच्याशी संवाद साधता येणार आहे.कृषी विद्यापीठातील महत्वाची माहिती, आपत्कालीन बैठक, शेतकरी वर्गाला द्यावयाची माहिती, शासनाचे धोरणाबद्दलची माहिती ही शास्त्रज्ञ, विभागप्रमुख, कुलगुरु व संचालक हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार असून, तत्काळ उपाययोजना निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आधुनिक युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रगतीकडे वाटचाल होण्याच्या दृष्टीने डिजिटल इंडियाचा रोल फार महत्वाचा ठरणार आहे. कोकण कृषी विद्यापीठांतर्गत चारही जिल्ह्यातील रिसर्च सेंटर, कॉलेज यांच्याशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यासाठी खर्च अधिक होईल, असे काही लोकांचे म्हणणे होते. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्समुळे वेळ, प्रवासाचा होणारा त्रास आणि कर्मचाऱ्यांचा होणारा खर्चसुद्धा वाचणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना दुर्घटनेला सामोरे जावे लागणार नाही.कृषी विद्यापीठात बेठकीसाठी येताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दुर्दैवाने कोणालाही महाडसारख्या दुर्घटनेला सामोरे जाऊन जीव गमवावा लागू नये. या दृष्टीने कृ षी विद्यापीठातील सर्वच संशोधन केंद्र, कॉलेज यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद सुरु केला आहे.- डॉ. तपस भट्टाचार्य, कुलगुरु, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली