शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आता ‘माळीण’ची पुनरावृत्ती नको

By admin | Updated: December 16, 2014 23:44 IST

प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा : निर्णयाची अंमलबजावणी रखडली, डोंगरपायथ्याच्या जमिनी न स्वीकारण्याचा केला निर्धार

रत्नागिरी : जिल्ह्यातील धरणांमुळे बेघर झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत झालेल्या निर्णयानुसार अंमलबजावणी होत नसल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आपल्या न्याय्य मागण्यांबाबत जोरदार घोषणा देत हल्लाबोल केला. पुनर्वसन करताना त्यांना डोंगरपायथ्याच्या जमिनी नको. माळीणसारखी स्थिती जिल्ह्यात उद्भवणार नाही, अशा ठिकाणी पुनर्वसन करावे.मारुती मंदिरपासून पायी निघालेल्या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सभेत रुपांतर झाले. ‘तुमचे धरण आमचे मरण’, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्यालय प्रमुख संपत देसाई यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांना निवेदन सादर केले. यावेळी मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष दिलीप गायकवाड, पोयनार धरणग्रस्तांचे नेते सुरेश खानविलकर, शेलारवाडी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी प्रवीण लांजेकर, जामदा प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम तोडकरी, अशोक आर्डे, प्रकाश आमकर, कळसवली कोष्टेवाडी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी कृष्णा निम्हणकर उपस्थित होते. जिल्ह्यात २४ प्रकल्पांचे काम सुरू असून, भूसंपादन व पुनर्वसन शाखेतील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न रखडले आहेत. राजापूर तालुक्यातील जामदा प्रकल्पग्रस्तांचे संकलन रजिस्टर तयार करणे, पुनर्वसित गावठाणापासून आठ किलोमीटर्सच्या आत शेतजमीन उपलब्ध करून देणे, संपादित केलेल्या जमिनी मागणी करणाऱ्या शेतकरी प्रकल्पग्रस्तांना पसंतीनुसार दाखवण्यात याव्यात, अशा मागण्या आहेत. राजापूरमधीलच कळसवली-कोष्टेवाडी प्रकल्पग्रस्तांचा खास बाब पुनर्वसन आराखडा तयार करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठवावा. पुनर्वसनाच्या कामाबरोबरच धरणाचे काम सुरू करावे. संगमेश्वर तालुक्यातील गड मध्यम प्रकल्प, संगमेश्वर तालुक्यातील चांदोेली अभयारण्य प्रकल्प, खेडमधील शेलारवाडी लघु प्रकल्प व पोयनार प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या उर्वरित आवश्यकतांची पूर्तता करावी. वाटप झालेल्या जमिनींचे सातबारा मिळावेत, घरांचे बांधकाम झाल्यानंतर नावांची झालेली अदलाबदल दुरुस्त करून मिळावी अशा मागण्या अपर जिल्हाधिकारी निगुडकर यांच्यासमोर मांडल्या. (प्रतिनिधी)