शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कणकवलीतील मंगल कार्यालयांना नोटिसा

By admin | Updated: February 4, 2015 23:53 IST

कावीळ साथीमुळे दक्षता : सार्वजनिक विहिरींचे शुद्धीकरण

कणकवली : काविळीचे रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक विहिरींमध्ये तातडीने टीसीएल पावडर टाकून निर्जंतुकीकरण करण्यात आले. पाणी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून सर्व मंगल कार्यालयांना पाण्याचे स्त्रोत शुद्ध असल्याच्या खबरदारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नव्या इमारत बांधकामाला वेस्ट ट्रीटमेंट प्लांटशिवाय मंजुरी देणार नसल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली. काविळीचे रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने शहरातील ३० सार्वजनिक विहिरींचे पाणी नमुने गोळा केले असून टीसीएल पावडर टाकून निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच शहरातील सर्व मंगल कार्यालये आणि सामुदायिक कार्यक्रम होणाऱ्या केंद्रांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पाण्याचे स्त्रोत दूषित नाहीत याची खात्री करून घ्यावी, असेही नोटिसीत म्हटले आहे. नगरपंचायतीकडे असलेल्या टीसीएल पावडर साठ्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. क्लोरीनचे प्रमाण घटले असल्यास नवी पावडर मागवण्यात येणार आहे. खाजगी विहिरी असणाऱ्या नागरिकांनी आपल्या विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी टीसीएल पावडर घेऊन जावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी ए.ए.आठल्ये यांनी बुधवारी कणकवली संशयित मंगल कार्यालयाला भेट देऊन पाण्याच्या स्त्रोताची स्वत: चाचणी घेतली. या चाचणीत हे पाणी पिण्यासाठी लायक नसल्याचे आढळले. शहरातून गोळा केलेल्या पाणी नमुन्यांचा अहवाल ४८ तासांनंतर मिळणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी कुबेर मिठारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सांडपाणी प्रक्रिया बंधनकारक : तावडेशहरात सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था कार्यक्षम नाही. ती सुधारण्याची गरज असून आतापासूनच काळजी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी यापुढे होणाऱ्या प्रत्येक संकुलाच्या बांधकामासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था असल्याशिवाय परवानगी देण्यात येणार नाही, असे मुख्याधिकारी तावडे यांनी सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्षांकडून आढावाकावीळ रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी येथील पंचायत समिती कार्यालयात बुधवारी सकाळी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. नळयोजनेच्या पाणी साठवण टाक्यांचा सर्व्हे करा. पाणी शुद्धीकरणाच्या उपाययोजना करा साथ पसरणार नाही याची काळजी घ्या, आदी सूचना संदेश सावंत यांनी दिल्या. या बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी कुबेर मिठारी, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे तसेच खासगी विहीरीमध्ये ब्लिचींग पावडर टाकावी, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.