शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

कणकवलीतील मंगल कार्यालयांना नोटिसा

By admin | Updated: February 4, 2015 23:53 IST

कावीळ साथीमुळे दक्षता : सार्वजनिक विहिरींचे शुद्धीकरण

कणकवली : काविळीचे रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक विहिरींमध्ये तातडीने टीसीएल पावडर टाकून निर्जंतुकीकरण करण्यात आले. पाणी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून सर्व मंगल कार्यालयांना पाण्याचे स्त्रोत शुद्ध असल्याच्या खबरदारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नव्या इमारत बांधकामाला वेस्ट ट्रीटमेंट प्लांटशिवाय मंजुरी देणार नसल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली. काविळीचे रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने शहरातील ३० सार्वजनिक विहिरींचे पाणी नमुने गोळा केले असून टीसीएल पावडर टाकून निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच शहरातील सर्व मंगल कार्यालये आणि सामुदायिक कार्यक्रम होणाऱ्या केंद्रांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पाण्याचे स्त्रोत दूषित नाहीत याची खात्री करून घ्यावी, असेही नोटिसीत म्हटले आहे. नगरपंचायतीकडे असलेल्या टीसीएल पावडर साठ्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. क्लोरीनचे प्रमाण घटले असल्यास नवी पावडर मागवण्यात येणार आहे. खाजगी विहिरी असणाऱ्या नागरिकांनी आपल्या विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी टीसीएल पावडर घेऊन जावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी ए.ए.आठल्ये यांनी बुधवारी कणकवली संशयित मंगल कार्यालयाला भेट देऊन पाण्याच्या स्त्रोताची स्वत: चाचणी घेतली. या चाचणीत हे पाणी पिण्यासाठी लायक नसल्याचे आढळले. शहरातून गोळा केलेल्या पाणी नमुन्यांचा अहवाल ४८ तासांनंतर मिळणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी कुबेर मिठारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सांडपाणी प्रक्रिया बंधनकारक : तावडेशहरात सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था कार्यक्षम नाही. ती सुधारण्याची गरज असून आतापासूनच काळजी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी यापुढे होणाऱ्या प्रत्येक संकुलाच्या बांधकामासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था असल्याशिवाय परवानगी देण्यात येणार नाही, असे मुख्याधिकारी तावडे यांनी सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्षांकडून आढावाकावीळ रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी येथील पंचायत समिती कार्यालयात बुधवारी सकाळी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. नळयोजनेच्या पाणी साठवण टाक्यांचा सर्व्हे करा. पाणी शुद्धीकरणाच्या उपाययोजना करा साथ पसरणार नाही याची काळजी घ्या, आदी सूचना संदेश सावंत यांनी दिल्या. या बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी कुबेर मिठारी, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे तसेच खासगी विहीरीमध्ये ब्लिचींग पावडर टाकावी, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.