शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत झोपड्या हटविण्याच्या नोटीसा

By admin | Updated: January 23, 2016 23:16 IST

मिरकरवाडा परिसर : झोपडपट्टीधारकांची धावपळ सुरु

रत्नागिरी : शहराजवळील मिरकरवाडा जेटी परिसरातील अनधिकृत झोपड्या हटवण्याचे आदेश प्रशासनाने झोपडपट्टीधारकांना दिले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील बंदर विकासाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याने प्रशासनाकडून या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मिरकरवाडा जेटी परिसरात शेकडो झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. यापैकी अनेक झोपड्यांमध्ये मच्छिमारांचे मासेमारीचे सामान ठेवण्यात येत आहे. किनारपट्टी शेजारीच मासेमारीचे सामान ठेवणे सोयीचे ठरत असल्याने मच्छिमारांनी या झोपड्या उभारल्या आहेत. तसेच परराज्यातील कामगारांच्याही यामध्ये झोपड्या आहेत. या शेकडो अनधिकृत झोपड्या बंदर विकासासाठी अडचणीच्या ठरत आहेत. मिरकरवाडा बंदर जेटी परिसरामध्ये मच्छिमारांसाठी अनेक असुविधा असून, त्या मच्छिमारांसाठी त्रासदायक ठरत आहेत. या बंदरामध्ये मच्छिमारांसाठी पाणी, वीज आणि इतर भौतिक सुविधा नाहीत. कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारे हे राज्यातील एकमेव महत्त्वाचे बंदर असूनही विकासापासून अनेक वर्षे दुर्लक्षित राहिले. गाळाची समस्या सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने दिलेला सक्शन ड्रेझर बंद अवस्थेत पडून आहे. मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत झोपड्यांवर तीन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रांताधिकारी फरोग मुकादम यांनी बुलडोझर फिरवला होता. त्यानंतरही बंदर विकास न झाल्याने झोपड्या पुन्हा उभ्या राहिल्या होत्या. त्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वी आमदार उदय सामंत मंत्री असताना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी बंदर विकासासाठी या अनधिकृत झोपड्या हटविण्याचे आवाहन मच्छिमारांना केले होते. त्यावेळी मच्छिमारांनी सहकार्याची भूमिका घेत जेटी परिसरातील झोपड्या स्वत:हून हटवल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या बंदराचा विकास कागदावरच राहिल्याने झोपड्या उभ्या राहिल्या. नेहमीप्रमाणे यावेळी बंदर विकासाचे दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मिरकरवाडा जेटी परिसरातील अनधिकृत झोपड्या तत्काळ हटवाव्यात, अशा नोटिसा जिल्हा प्रशासनाकडून बजावण्यात आल्या आहेत. या झोपड्या २७ जानेवारीपर्यंत स्वत:हून काढून टाकाव्यात, असे झोपडीधारकांना कळवण्यात आले आहे. झोपड्या तोडण्यात येणार असल्याने त्यांची धावपळ उडाली आहे. (शहर वार्ताहर) दिखाऊ प्रयत्न : आता तरी बंदराचे प्रश्न सुटणार देशातील महत्त्वाचे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा बंदरात अनेक समस्या आहेत. बंदर विकास करण्यासाठी अनेकवेळा येथील झोपडपट्टीधारकांना हटवण्यात आले. त्यामुळे आता तरी या बंदराचे प्रश्न सुटणार का? असा सवाल करण्यात येत आहे. रखडला विकास कोट्यवधी रुपये खर्च करून मिरकरवाडा बंदराचा विकास करण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे हा विकास रखडला आहे. अनेकवेळा हा बंदराचा विकास कागदावर राहिल्याने केवळ झोपडपट्टीवर कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतर विकास रखडल्याने तेथे पुन्हा झोपड्या उभ्या राहिल्या.