शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार नाही; तर विद्यार्थ्यांना उत्तरकार्याची जेवणावळ

By admin | Updated: January 7, 2015 23:59 IST

गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पाठराखण?

खेड : शालेय पोषण आहाराबाबत विविध तक्रारी सुरु असतानाच खेडमध्ये एक विचित्रच प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यातील मुरडे ब्राह्मणवाडी येथील केंद्रीय शाळेतील विद्यार्थ्यांना ५ जानेवारी रोजी पोषण आहार न देता चक्क उत्तरकार्याचे जेवण जेवायला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यात पोषण आहाराबाबत वाढत्या तक्रारी असताना आता मुरडे येथे नवीनच प्रकार उघडकीस आला आहे. मुरडे येथे दररोज पोषण आहार दिला जातो. मात्र, दि. ५ जानेवारी रोजी शालेय पोषण आहार शिजवण्यात आला नाही. हा आहार शिजवणाऱ्या महिलेला आज आहार शिजवायचा नाही, असे सांगून तिला आहार शिजवू दिला नाही. ५ जानेवारीस शाळेलगतच असलेल्या शामसुंदर दळवी यांच्या आईच्या उत्तरकार्याची ती जेवणावळ होती. विशेष म्हणजे या पोषण आहार समितीचे अध्यक्ष सरपंच दिगंबर दळवी आहेत. त्यांना या जेवणावळीची कोणतीही माहिती या शिक्षकांनी दिली नव्हती़ या जेवणावळीचे निमंत्रण मुलांना दिल्याने पोषण आहार शिजवला नसल्याची माहिती येथील पदवीधारक शिक्षक जगताप गुरूजी यांनी आपल्याला फोनवरून दिल्याचे सरपंच दिगंबर दळवी यांनी सांगितले. मुळातच ही बाब अतिशय गंभीर आहे. केंद्रप्रमुख दराणे आणि मुख्याध्यापक मोहिते यांनी मुलांना अशा प्रकारचे जेवण दिल्याने ते सरकारच्या कोणत्या नियमांमध्ये बसते? असा सवाल उपस्थित केला आहे. सरकारने दिलेला शालेय पोषण आहार शाळेत उपलब्ध असताना एखाद्या उत्तरकार्याचे जेवण विद्यार्थ्यांना देणे हे कितपत योग्य आहे, तसेच शासनाच्या पोषण आहारासाठी असलेल्या धोरणाचे पूर्ण उल्लंघन केले आहे़ विशेष म्हणजे शाळेतील शिक्षकांच्या काही तक्रारींबाबत आपल्याकडे माहिती आली असतानाच आता हे शिक्षकांचे नवीन प्रकरण उजेडात आल्याने सरपंच दिगंबर दळवी यांनी चिंता व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पाठराखण?सोमवारी गटशिक्षणाधिकारी मंगला वाव्हळ यांच्या समवेत झालेल्या बैठकीतदेखील वाव्हळ यांनी कारवाईचे आश्वासन न देता या दोन्ही शिक्षकांना पाठीशी घालत असल्याचा दळवी यांनी आरोप केला आहे़. खेड तालुक्यात शालेय पोषण आहार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी येत असताना त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने दळवी यांनी सांगितले.केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनी गावातीलच एका उत्तरकार्याची जेवणावळ घडवल्याने संताप व्यक्त होत आहे. सरपंच दिगंबर दळवी यांनी तर या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे़ तसे निवेदन दळवी यांनी गटशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ यांना दिले आहे. याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी वाव्हळ यांनी थेट कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.