शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे न झाल्याने भरपाई नाही ?

By admin | Updated: November 7, 2014 23:30 IST

खाडीपट्टा भागातील कर्जी, तळघर, अणस्पुरेतील शेतकऱ्यांनी मांडली

खाडीपट्टा : खेड तालुक्यातील भागातील बहुतांश भातशेतीवर करपा व कीडीचा प्रादुर्भाव होऊन भातपिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच परतीच्या पावसामुळे भातशेती आडवी पडलेली असताना रानडुकरांनी त्याची नासाडी केली आहे. मात्र, रोगाने आणि करप्याने बाधित झालेल्या भातशेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे न झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रफळाचा आकडा वरिष्ठ कार्यालयाकडे तालुका कृषी कार्यालयाकडून पाठवला जातो. मात्र, ग्रामीण भागातील ज्यांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवरच अवलंबून आहे, अशा गरीब शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. अद्याप ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना कृषी कार्यालय, तलाठी अगर ग्रामपंचायतीकडे तक्रार करुन शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तक्रार कशी करावी, याची माहिती नसल्याने या बाधित क्षेत्राकडे कोणाचेही लक्ष नाही किंवा याची कोणत्याच यंत्रणेने दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पिकाची आशा सोडून केवळ जनावरांसाठी पेंढा मिळावा म्हणून त्या पिकाची कापणी केली असल्याची कैफियत खाडीपट्टा भागातील कर्जी, तळघर, अणस्पुरेतील शेतकऱ्यांनी मांडली. (वार्ताहर)आता भ्रांत वर्षभराची... एकीकडे कृषी विभागाने बऱ्याच ठिकाणी औषध फवारणीसाठी आवाहन केले आहे. मात्र, फवारणी न झाल्याने या भागात ही समस्या निर्माण झाली आहे. त्यातच याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्याची आवश्यकता असल्याने वर्षभराच्या उदरनिर्वाहाची भ्रांत पडून राहिली आहे. याकडे तालुका कृषी कार्यालयाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.कृषी अधिकारी अद्याप नुकसानग्रस्त भागात फिरकलेले नाहीत. मात्र मंडळ अधिकारी यांनी मुंबके ग्रामपंचायतीच्या हद्दितील एका शेतकऱ्याच्या भातशेतीची पाहणी केली व नंतर परिसरातील भातशेतीची नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करणार असल्याचे मंडळ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.- अकबर दुदुके - सरपंच, मुंबकेतालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी शेतीच्या नुकसानाची अद्याप कोणतीही पाहणी केलेली नाही किंवा महसूल खात्यानेही नुकसानाचे कोणतेही पंचनामे केलेले नाहीत. त्यामुळे भरपाई कशी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. - मुश्ताक तांबे - सरपंच, कर्जी