शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

चाकोरीबध्द नव्हे; तर वेगळा विचार करण्याला महत्व

By admin | Updated: February 1, 2016 00:45 IST

अच्युत गोडबोले : स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत मार्गदर्शन

कणकवली : सोपे लिहिणे आवश्यक आहे, हे सूत्र मला माझ्या गुरूंकडून मिळाले. त्यामुळे कोणताही विषय सोपा करून लिहिण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला. मी लिहिलेले सहज आकलन होत असल्याने वाचकांना ते आवडते, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना चाकोरीबध्द राहण्यापेक्षा वेगळा विचार करण्याला महत्त्व आहे, असे प्रतिपादन लेखक आणि आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी केले. स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ‘माझा लेखनप्रवास’ या विषयावर ते बोलले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार नीतेश राणे, सिंधुरत्न फाऊंडेशनचे डॉ. जयेंद्र परूळेकर, डॉ. किरण गुजर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, गोडबोले यांनी आपल्या लेखनप्रवास उलगडून सांगतानाच जीवनातील चढउतारही सांगितले. मुलाला जडलेला गंभीर आजार हा आयुष्यातील कलाटणी देणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले. माणसाला जेव्हा कोणीही गरज भासते, तेव्हा काम करण्याची क्षमता वाढते. मुलाच्या आजारपणावर खर्च करण्यासाठी २ कोटी रूपये कसे जमा करावे, असा प्रश्न जेव्हा समोर उभा राहिला तेव्हा सर्व पर्यायांचा शोध घेतला. अभ्यास आणि वाचनातून मी घडत गेलो. प्रत्येक गोष्ट मनापासून शिकत गेलो. त्यावर प्रेम करत समजून घेत गेलो. यानंतर एक वेळ अशी आली की लिहावे, अशी जाणीव झाली. विश्वाची निर्मिती, पृथ्वी, विज्ञान, अर्थशास्त्र आदी गोष्टींची मांगडणी करताना ती अधिक सोप्या पद्धतीने लोकांना आकलन होईल, अशा रितीने मांडण्याचा प्रयत्न केला. वाचकांकडून येणारा प्रतिसाद याने मी समाधानी झालो. समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर ते म्हणाले की, आता बघे जास्त झाले आहेत. मदतीचा हात देणारे कमी झाले आहेत. नक्कल करून दुसऱ्याचे गुण मिळवता येत नाहीत. मात्र, त्यापेक्षा चांगल्या गुण आत्मसात करावेत. सध्या उद्योजक होण्याकडे कल वाढला पाहिजे. भारतात संशोधनासाठी जेवढा खर्च होतो, त्याच्या सात पट खर्च जाहिरातीवर होतो. संगणकीय किंवा अन्य क्षेत्रामध्ये भारताची स्वत:ची सॉफ्टवेअर्स किंवा संशोधन नाही, यामागे हीच कारणे आहेत. जेथून ज्ञान मिळेल तेथून ते आत्मसात करावे. हे ज्ञान योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरले गेले पाहिजे. या व्याख्यानमालेतून सिंधुदुर्गच्या विकासाची दिशा मिळावी, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी) प्रवृत्ती धोकादायक : नितेश राणे आमदार नितेश राणे म्हणाले की, तरूणांना बंदुका आणि तलवारी चालविण्याचे प्रशिक्षण देऊन अन्य धर्मियांच्या विरोधात ते हत्यार वापरण्याचे प्रकार अन्य देशांत सुरू आहेत. यामागील प्रवृत्ती धोकादायक आहेत. तरूणांना योग्य दिशा देण्याची गरज आहे, तरच तरूण पिढी वाममार्गाला जाण्याचे थांबेल, असे नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.