शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

चाकोरीबध्द नव्हे; तर वेगळा विचार करण्याला महत्व

By admin | Updated: February 1, 2016 00:45 IST

अच्युत गोडबोले : स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत मार्गदर्शन

कणकवली : सोपे लिहिणे आवश्यक आहे, हे सूत्र मला माझ्या गुरूंकडून मिळाले. त्यामुळे कोणताही विषय सोपा करून लिहिण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला. मी लिहिलेले सहज आकलन होत असल्याने वाचकांना ते आवडते, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना चाकोरीबध्द राहण्यापेक्षा वेगळा विचार करण्याला महत्त्व आहे, असे प्रतिपादन लेखक आणि आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी केले. स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ‘माझा लेखनप्रवास’ या विषयावर ते बोलले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार नीतेश राणे, सिंधुरत्न फाऊंडेशनचे डॉ. जयेंद्र परूळेकर, डॉ. किरण गुजर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, गोडबोले यांनी आपल्या लेखनप्रवास उलगडून सांगतानाच जीवनातील चढउतारही सांगितले. मुलाला जडलेला गंभीर आजार हा आयुष्यातील कलाटणी देणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले. माणसाला जेव्हा कोणीही गरज भासते, तेव्हा काम करण्याची क्षमता वाढते. मुलाच्या आजारपणावर खर्च करण्यासाठी २ कोटी रूपये कसे जमा करावे, असा प्रश्न जेव्हा समोर उभा राहिला तेव्हा सर्व पर्यायांचा शोध घेतला. अभ्यास आणि वाचनातून मी घडत गेलो. प्रत्येक गोष्ट मनापासून शिकत गेलो. त्यावर प्रेम करत समजून घेत गेलो. यानंतर एक वेळ अशी आली की लिहावे, अशी जाणीव झाली. विश्वाची निर्मिती, पृथ्वी, विज्ञान, अर्थशास्त्र आदी गोष्टींची मांगडणी करताना ती अधिक सोप्या पद्धतीने लोकांना आकलन होईल, अशा रितीने मांडण्याचा प्रयत्न केला. वाचकांकडून येणारा प्रतिसाद याने मी समाधानी झालो. समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर ते म्हणाले की, आता बघे जास्त झाले आहेत. मदतीचा हात देणारे कमी झाले आहेत. नक्कल करून दुसऱ्याचे गुण मिळवता येत नाहीत. मात्र, त्यापेक्षा चांगल्या गुण आत्मसात करावेत. सध्या उद्योजक होण्याकडे कल वाढला पाहिजे. भारतात संशोधनासाठी जेवढा खर्च होतो, त्याच्या सात पट खर्च जाहिरातीवर होतो. संगणकीय किंवा अन्य क्षेत्रामध्ये भारताची स्वत:ची सॉफ्टवेअर्स किंवा संशोधन नाही, यामागे हीच कारणे आहेत. जेथून ज्ञान मिळेल तेथून ते आत्मसात करावे. हे ज्ञान योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरले गेले पाहिजे. या व्याख्यानमालेतून सिंधुदुर्गच्या विकासाची दिशा मिळावी, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी) प्रवृत्ती धोकादायक : नितेश राणे आमदार नितेश राणे म्हणाले की, तरूणांना बंदुका आणि तलवारी चालविण्याचे प्रशिक्षण देऊन अन्य धर्मियांच्या विरोधात ते हत्यार वापरण्याचे प्रकार अन्य देशांत सुरू आहेत. यामागील प्रवृत्ती धोकादायक आहेत. तरूणांना योग्य दिशा देण्याची गरज आहे, तरच तरूण पिढी वाममार्गाला जाण्याचे थांबेल, असे नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.