शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

टॅब नको; आधी मुख्य गरजा पूर्ण करा

By admin | Updated: May 14, 2017 22:56 IST

अंगणवाड्यांच्या निर्णयाला समितीकडून विरोध : पहिल्याच महिला व बालकल्याण सभेत विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कओरोस : अंगणवाडीमधील लहान मुले घरात मोबाईलवर खेळत असतात. त्यामुळे त्यांना अंगणवाडीतही टॅब दिल्यास ते पूर्णवेळ मोबाईलमध्येच व्यस्त राहतील. यामुळे त्यांच्या शिक्षणाकडे व खेळांकडे दुर्लक्ष होणार असल्याने महिला व बालकल्याण विभाग प्रशासनाने स्वउत्पन्न निधीतून २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील मोठी पटसंख्या असणाऱ्या अंगणवाड्यांना टॅब देण्याच्या घेतलेल्या निर्णयाला समिती सदस्यांनी तीव्र विरोध केला. तसेच अंगणवाडीमध्ये काय कमी आहे याचा सर्व्हे करून गरजेनुसार वस्तूंचे वाटप करावे, असे आदेश सभापती सायली सावंत यांनी सभेत दिले.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सहाव्या सभागृहाच्या महिला व बालकल्याण समितीची पहिली सभा सभापती सायली सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, सभा सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, सदस्या माधुरी बांदेकर, श्वेता कोरगावकर, संपदा देसाई, राजलक्ष्मी डिचवलकर, शर्वाणी गांवकर, पल्लवी राऊळ, पल्लवी झिमाळ, वर्षा कुडाळकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सदस्य व सभापती यांचे स्वागत करण्यात आले. महिला व बालकल्याण विभागाला प्राप्त होणाऱ्या अनुदानातून सहा लाख रुपये अंगणवाड्यांना टॅब वितरित करण्यासाठी ठेवण्यात आले असून, त्याला समितीने मंजुरी द्यावी, असे सोमनाथ रसाळ यांनी सांगितले. मात्र सर्वच सदस्यांनी त्याला कडाडून विरोध केला. यानंतर प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना तालुक्यातील सर्व अंगणवाड्यांचा सर्व्हे करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले. त्यानंतरच निर्णय घेण्याचे ठरविले. यावेळी जोशी व रसाळ या दोन्ही अधिकाऱ्यांनी या समितीचे अधिकार व प्राप्त निधीतून घ्यावयाच्या योजना याबाबत माहिती दिली. अनुदानविरहित पोषण आहार अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार शिजवून देणाऱ्या बचत गटांना मानधन देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून अनुदान प्राप्त नाही. तसेच सेविका व मदतनीस यांचे मार्च महिन्यापासूनचे मानधन अनुदानाअभावी थांबले होते, अशी माहिती प्रशासनाने दिली. यावेळी श्वेता कोरगावकर यांनी मुळात तुटपुंजे मानधन व तेही वेळेत मिळत नसेल तर त्या कर्मचाऱ्यांनी जगावे कसे, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मानधन रक्कम शासन देत नसेल तर आम्ही काय करायचे? असे रसाळ यांनी सांगितले.३२० कुटुंबांचे संसार या विभागाने टिकविले जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील कौटुंबिक वादावर तोडगा काढण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या संचालिका दीपाली सावंत यांनी, आतापर्यंत आपल्या केंद्राजवळ ३६० कौटुंबिक वाद आले. त्यातील ४० वाद न्यायालयात गेले, तर ३२० वाद आपल्या केंद्रात झालेल्या मार्गदर्शनामुळे सुटले, असे सांगितले.‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश२०१६-१७ या आर्थिक वर्षात ९६ टक्के अंगणवाडी मुलांची तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित चार टक्के तपासणी का करण्यात आली नाही? असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील २० व कणकवली तालुक्यातील पाच अंगणवाड्यांच्या तपासण्या करण्यात आल्या नसल्याचे पुढे आले. त्यावरती त्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुढील सभेत बोलावून घेण्याचे आदेश जोशी यांनी दिले. यावेळी रसाळ यांनी गेले सहा महिने जिल्ह्यातील २२२ अंगणवाड्या कुपोषणमुक्त ठेवण्यात यश आल्याचे सांगितले. आणखी ८० अंगणवाड्या होणार स्मार्टआपल्या विभागाने २०१६-१७ या वर्षात ५० जिल्हा परिषद मतदारसंघांतील प्रत्येकी एक याप्रमाणे ५० अंगणवाड्या स्मार्ट बनविण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये एलईडी, टीव्ही, मिनी पी.सी. व अन्य साहित्य पुरविण्यात येत आहे. आता राज्य शासनाने आदर्श अंगणवाडी ही संकल्पना सुरू केली आहे. यामधून एक लाख ६० हजार रुपये निधी दिला जाणार आहे. यात सौर संच, वजनकाटे, टीव्ही संच यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रकल्पातील किमान दहा अंगणवाड्या घेतल्या जाणार आहेत. आपल्या जिल्ह्यात दहा प्रकल्प असल्याने अजून दहा अंगणवाड्या स्मार्ट बनणार असल्याचे रसाळ यांनी यावेळी सांगितले.