शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
3
“मोहन भागवत, PM मोदी शस्त्रपूजा करतात, सरकार ‘अर्बन नक्षल’ म्हणून कारवाई करणार का?”: आंबेडकर
4
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
5
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
6
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
7
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
8
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
10
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर, नागपंचमी एकत्र? जाणून घ्या तारखा आणि 'अशी' करा तयारी!
11
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
12
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
13
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
14
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
15
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
16
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
17
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
18
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
19
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
20
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!

रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्यापुरते नको; वर्षभर हवे

By admin | Updated: January 20, 2015 00:06 IST

संजय शिंदे : वाहतूक कोंडीचे भान राखून अपघात रोखणे शक्य

रत्नागिरी : रस्ते सुरक्षा अभियान हे एक दिवस किंवा पंधरवड्यापुरते मर्यादित न राहता वाहनचालकांनी वर्षभर पाळले तर अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी झालेले दिसेल. वाहन चालवणाऱ्या सर्वांनी वाहतूक कोंडीचे भान राखून वाहन चालविल्यास अपघात रोखणे शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी केले.रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल येथे सुरक्षा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सुरक्षा अभियान कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, रत्नागिरी विभागाचे नियंत्रक के. बी. देशमुख, परिवहन विभागाचे मोटार निरीक्षक तारु, आरएसपीच्या जिल्हा समादेशक अंजली चव्हाण, पालीचे प्राचार्य जगन्नाथ विरकर आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना काळम-पाटील म्हणाले की, मानव जीवनाचे सर्वांत महत्त्वाचे तत्व म्हणजे मानवी अस्तित्व हे आहे. त्यामध्ये सुदृढ, सशक्त जीवन जगता आले पाहिजे. पण, सध्या आपण हेच मुख्य तत्व रस्ते अपघातांमुळे गमावत चाललो आहोत, हे धोकादायक आहे. त्याकरिता रस्त्यावर सुरक्षा बाळगणे हे महत्त्वाचे आहे. शालेय विद्यार्थ्यांनी विशेषत: रहदारीचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. तसेच एस. टी.चे देशमुख यांनी सांगितले की, सर्व शिकाऊ चालकांनी अत्यंत जबाबदारीने वाहन चालवल्यास अपघातांना आळा बसेल.यावेळी शिंदे म्हणाले की, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाहन चालकांनी वाहनावर आपल्या प्रिय व्यक्तीसारखे प्रेम करायला शिकले पाहिजे. त्याची योग्य देखभालही राखणे महत्त्वाचे आहे.यावेळी लांजा, पाली, संगमेश्वर येथील महामार्गांवर भरणारे आठवडा बाजार अन्यत्र हलविणार असल्याचे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना पाली हायस्कूलच्या आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा, आपत्कालीन व्यवस्था याविषयी प्रात्यक्षिके दाखविली. आभारप्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)सर्व अवैध प्रवासी वाहतूक बंद करणार. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर जर दोनपेक्षा जास्त गंभीर अपघातांची नोंद असल्यास परमीट रद्द.पाच वर्षांमध्ये प्राणांतिक अपघात करणाऱ्या चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक पोलीस, परिवहन विभाग शिफारस करणार.पुढील १० दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पोलिसांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा उपक्रम व्यापकपणे राबविणार.