शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्यापुरते नको; वर्षभर हवे

By admin | Updated: January 20, 2015 00:06 IST

संजय शिंदे : वाहतूक कोंडीचे भान राखून अपघात रोखणे शक्य

रत्नागिरी : रस्ते सुरक्षा अभियान हे एक दिवस किंवा पंधरवड्यापुरते मर्यादित न राहता वाहनचालकांनी वर्षभर पाळले तर अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी झालेले दिसेल. वाहन चालवणाऱ्या सर्वांनी वाहतूक कोंडीचे भान राखून वाहन चालविल्यास अपघात रोखणे शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी केले.रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल येथे सुरक्षा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सुरक्षा अभियान कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, रत्नागिरी विभागाचे नियंत्रक के. बी. देशमुख, परिवहन विभागाचे मोटार निरीक्षक तारु, आरएसपीच्या जिल्हा समादेशक अंजली चव्हाण, पालीचे प्राचार्य जगन्नाथ विरकर आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना काळम-पाटील म्हणाले की, मानव जीवनाचे सर्वांत महत्त्वाचे तत्व म्हणजे मानवी अस्तित्व हे आहे. त्यामध्ये सुदृढ, सशक्त जीवन जगता आले पाहिजे. पण, सध्या आपण हेच मुख्य तत्व रस्ते अपघातांमुळे गमावत चाललो आहोत, हे धोकादायक आहे. त्याकरिता रस्त्यावर सुरक्षा बाळगणे हे महत्त्वाचे आहे. शालेय विद्यार्थ्यांनी विशेषत: रहदारीचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. तसेच एस. टी.चे देशमुख यांनी सांगितले की, सर्व शिकाऊ चालकांनी अत्यंत जबाबदारीने वाहन चालवल्यास अपघातांना आळा बसेल.यावेळी शिंदे म्हणाले की, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाहन चालकांनी वाहनावर आपल्या प्रिय व्यक्तीसारखे प्रेम करायला शिकले पाहिजे. त्याची योग्य देखभालही राखणे महत्त्वाचे आहे.यावेळी लांजा, पाली, संगमेश्वर येथील महामार्गांवर भरणारे आठवडा बाजार अन्यत्र हलविणार असल्याचे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना पाली हायस्कूलच्या आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा, आपत्कालीन व्यवस्था याविषयी प्रात्यक्षिके दाखविली. आभारप्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)सर्व अवैध प्रवासी वाहतूक बंद करणार. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर जर दोनपेक्षा जास्त गंभीर अपघातांची नोंद असल्यास परमीट रद्द.पाच वर्षांमध्ये प्राणांतिक अपघात करणाऱ्या चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक पोलीस, परिवहन विभाग शिफारस करणार.पुढील १० दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पोलिसांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा उपक्रम व्यापकपणे राबविणार.