शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्यापुरते नको; वर्षभर हवे

By admin | Updated: January 20, 2015 00:06 IST

संजय शिंदे : वाहतूक कोंडीचे भान राखून अपघात रोखणे शक्य

रत्नागिरी : रस्ते सुरक्षा अभियान हे एक दिवस किंवा पंधरवड्यापुरते मर्यादित न राहता वाहनचालकांनी वर्षभर पाळले तर अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी झालेले दिसेल. वाहन चालवणाऱ्या सर्वांनी वाहतूक कोंडीचे भान राखून वाहन चालविल्यास अपघात रोखणे शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी केले.रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल येथे सुरक्षा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सुरक्षा अभियान कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, रत्नागिरी विभागाचे नियंत्रक के. बी. देशमुख, परिवहन विभागाचे मोटार निरीक्षक तारु, आरएसपीच्या जिल्हा समादेशक अंजली चव्हाण, पालीचे प्राचार्य जगन्नाथ विरकर आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना काळम-पाटील म्हणाले की, मानव जीवनाचे सर्वांत महत्त्वाचे तत्व म्हणजे मानवी अस्तित्व हे आहे. त्यामध्ये सुदृढ, सशक्त जीवन जगता आले पाहिजे. पण, सध्या आपण हेच मुख्य तत्व रस्ते अपघातांमुळे गमावत चाललो आहोत, हे धोकादायक आहे. त्याकरिता रस्त्यावर सुरक्षा बाळगणे हे महत्त्वाचे आहे. शालेय विद्यार्थ्यांनी विशेषत: रहदारीचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. तसेच एस. टी.चे देशमुख यांनी सांगितले की, सर्व शिकाऊ चालकांनी अत्यंत जबाबदारीने वाहन चालवल्यास अपघातांना आळा बसेल.यावेळी शिंदे म्हणाले की, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाहन चालकांनी वाहनावर आपल्या प्रिय व्यक्तीसारखे प्रेम करायला शिकले पाहिजे. त्याची योग्य देखभालही राखणे महत्त्वाचे आहे.यावेळी लांजा, पाली, संगमेश्वर येथील महामार्गांवर भरणारे आठवडा बाजार अन्यत्र हलविणार असल्याचे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना पाली हायस्कूलच्या आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा, आपत्कालीन व्यवस्था याविषयी प्रात्यक्षिके दाखविली. आभारप्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)सर्व अवैध प्रवासी वाहतूक बंद करणार. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर जर दोनपेक्षा जास्त गंभीर अपघातांची नोंद असल्यास परमीट रद्द.पाच वर्षांमध्ये प्राणांतिक अपघात करणाऱ्या चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक पोलीस, परिवहन विभाग शिफारस करणार.पुढील १० दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पोलिसांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा उपक्रम व्यापकपणे राबविणार.