शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

यापुढे साखरेची उचल करणार नाही

By admin | Updated: February 24, 2015 00:02 IST

वेंगुर्लेत सभा : धान्य दुकानदार संघटना आक्रमक

वेंगुर्ले : गेली कित्येक वर्षे ना नफा ना तोटा या तत्त्वावर रेशन दुकानदार पिवळ्या कार्डधारकांना लेव्ही साखर विक्री करत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने चक्क २० रुपयांचा तोटा सहन करा व साखर विक्री करा, असा फतवा काढल्याने यापुढे साखर उचल न करण्याचा एकमुखी निर्णय धान्य दुकानदार संघटनेच्या सभेत घेण्यात आला. वेंगुर्ले तालुका धान्य दुकान संघटनेची सभा सिध्दिविनायक कार्यालय, वेंगुर्ले येथे संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. या सभेस अशोक राणे, रवींद्र पेडणेकर, दादा गावडे, आपा गावडे, श्रीकांत खोत, शेखर पालयेकर, वेतोरे धान्य दुकानदार बबन कांबळी आदी उपस्थित होते. कमी दरात साखर विक्री करण्याच्या निर्णयावर व एपीएल कार्डधारकांच्या धान्यासंदर्भात यात चर्चा करण्यात आली. गेली कित्येक वर्षे ना नफा ना तोटा या तत्त्वावर रेशन दुकानदार पिवळ्या कार्डधारकांना लेव्ही साखर विक्री करीत आहेत. पण आता शासनाने कहर केला. चक्क २० रुपये तोटा सहन करा व साखर विक्री करा, असा फतवा निघाला. या संदर्भात संघटनेची सभा होऊन सर्व धान्य दुकानदारांनी साखर उचल न करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. सर्व तालुक्यातील संघटना रिबेट व मार्जिन वाढ व्हावी, याकरिता आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण शासन दाद देत नाही. भरमसाट वाढलेली वाहतुकीची भाडी (डिझेल कमी होऊनही भाडे कमी होत नाही), मनमानी हमाली या सर्व गोतावळ्यात धान्य दुकानदार डबघाईस आले आहेत. त्यात दर महिन्या-दोन महिन्यांनी नोकर असल्यासारखे वेगवेगळी कामे करायला शासन भाग पाडत आहे. त्याचा कोणताही मोबदला दिला जात नाही. मग अमूक काम अमूक दिवसात पूर्ण करा. हे फॉर्म भरा, ती रजिस्टरे तयार करा, ग्राहकांचे बँक खातेक्रमांक करा, आधारकार्ड नंबर भरा, हे सर्व आम्ही का करावे, त्यासाठी शासन पगार देते का? ही हाताशी यंत्रणा आहे, म्हणून जबरदस्तीने तिला शासन राबवतेय? जे काम तलाठ्यांनी करावयाचे ते आमच्या गळ्यात का मारले जाते? असा आरोप यावेळी करण्यात आला. वास्तविक या सर्व धान्य वितरणाच्या बाबतीत चेअरमन लोकांनी उचल घेतली पाहिजे होती. कारण धान्य दुकानातील तोटा म्हणजे ज्या रकमेतून धान्य खरेदी करतो, त्या तोट्यामुळे धान्य खरेदीचे भांडवल कमी होते, असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा संस्थेची दुकाने व संस्थेचे कर्मचारी यांना जिवंत ठेवण्यासाठी सर्व चेअरमननी आपले कर्मचारी व त्यांचे कुटुंब इतर शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे कसे जगतील, याचे प्रयत्न करावेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. (वार्ताहर)शासन अन्याय करत असल्याचा आरोपआज ना उद्या शासन न्याय देईल, या आशेवर आम्ही शासनाची बरीच कामे करीत आलोय. पण न्याय नाहीच, उलट शासन आमच्यावर अन्यायच करीत आहे. यात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दोष देणार नाही. शासनाचे आदेश येतील, त्याप्रमाणे ते आम्हाला सांगतात. यात शासनच दोषी आहे, अशा भावना धान्य दुकानदारांनी व्यक्त केल्या.