शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे साखरेची उचल करणार नाही

By admin | Updated: February 24, 2015 00:02 IST

वेंगुर्लेत सभा : धान्य दुकानदार संघटना आक्रमक

वेंगुर्ले : गेली कित्येक वर्षे ना नफा ना तोटा या तत्त्वावर रेशन दुकानदार पिवळ्या कार्डधारकांना लेव्ही साखर विक्री करत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने चक्क २० रुपयांचा तोटा सहन करा व साखर विक्री करा, असा फतवा काढल्याने यापुढे साखर उचल न करण्याचा एकमुखी निर्णय धान्य दुकानदार संघटनेच्या सभेत घेण्यात आला. वेंगुर्ले तालुका धान्य दुकान संघटनेची सभा सिध्दिविनायक कार्यालय, वेंगुर्ले येथे संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. या सभेस अशोक राणे, रवींद्र पेडणेकर, दादा गावडे, आपा गावडे, श्रीकांत खोत, शेखर पालयेकर, वेतोरे धान्य दुकानदार बबन कांबळी आदी उपस्थित होते. कमी दरात साखर विक्री करण्याच्या निर्णयावर व एपीएल कार्डधारकांच्या धान्यासंदर्भात यात चर्चा करण्यात आली. गेली कित्येक वर्षे ना नफा ना तोटा या तत्त्वावर रेशन दुकानदार पिवळ्या कार्डधारकांना लेव्ही साखर विक्री करीत आहेत. पण आता शासनाने कहर केला. चक्क २० रुपये तोटा सहन करा व साखर विक्री करा, असा फतवा निघाला. या संदर्भात संघटनेची सभा होऊन सर्व धान्य दुकानदारांनी साखर उचल न करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. सर्व तालुक्यातील संघटना रिबेट व मार्जिन वाढ व्हावी, याकरिता आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण शासन दाद देत नाही. भरमसाट वाढलेली वाहतुकीची भाडी (डिझेल कमी होऊनही भाडे कमी होत नाही), मनमानी हमाली या सर्व गोतावळ्यात धान्य दुकानदार डबघाईस आले आहेत. त्यात दर महिन्या-दोन महिन्यांनी नोकर असल्यासारखे वेगवेगळी कामे करायला शासन भाग पाडत आहे. त्याचा कोणताही मोबदला दिला जात नाही. मग अमूक काम अमूक दिवसात पूर्ण करा. हे फॉर्म भरा, ती रजिस्टरे तयार करा, ग्राहकांचे बँक खातेक्रमांक करा, आधारकार्ड नंबर भरा, हे सर्व आम्ही का करावे, त्यासाठी शासन पगार देते का? ही हाताशी यंत्रणा आहे, म्हणून जबरदस्तीने तिला शासन राबवतेय? जे काम तलाठ्यांनी करावयाचे ते आमच्या गळ्यात का मारले जाते? असा आरोप यावेळी करण्यात आला. वास्तविक या सर्व धान्य वितरणाच्या बाबतीत चेअरमन लोकांनी उचल घेतली पाहिजे होती. कारण धान्य दुकानातील तोटा म्हणजे ज्या रकमेतून धान्य खरेदी करतो, त्या तोट्यामुळे धान्य खरेदीचे भांडवल कमी होते, असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा संस्थेची दुकाने व संस्थेचे कर्मचारी यांना जिवंत ठेवण्यासाठी सर्व चेअरमननी आपले कर्मचारी व त्यांचे कुटुंब इतर शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे कसे जगतील, याचे प्रयत्न करावेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. (वार्ताहर)शासन अन्याय करत असल्याचा आरोपआज ना उद्या शासन न्याय देईल, या आशेवर आम्ही शासनाची बरीच कामे करीत आलोय. पण न्याय नाहीच, उलट शासन आमच्यावर अन्यायच करीत आहे. यात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दोष देणार नाही. शासनाचे आदेश येतील, त्याप्रमाणे ते आम्हाला सांगतात. यात शासनच दोषी आहे, अशा भावना धान्य दुकानदारांनी व्यक्त केल्या.